शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

Sachin Vaze: ठाकरे सरकारला ठरवावं लागेल; सचिन वाझे महत्त्वाचा की कोरोना?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 02:30 IST

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून पोलीस आणि राजकीय नेते यांच्यात जी जुंपली आहे. त्यावर नैतिक चर्चा करण्याची गरज नाही. गुंड प्रवृत्तीचा पोलीस अधिकारी सचिन वाझेला डोक्यावर चढविण्याचा दुष्परिणाम सरकारला भोगावे लागत आहेत.

विनायक पात्रुडकर

एखाद्या पोलीस अधिकाऱ्याची मंत्र्याविरोधात लेखी तक्रार आणि तीही जाहीर करण्याची हिंमत कधी होते? एकतर त्याचे नैतिक बळ पराकोटीचे असते किंवा मंत्र्याची अंडी पिल्ली त्याला ठाऊक असतात. याही व्यतिरिक्त इतर अनेक पैलू असतात. त्या अधिकाऱ्याला असलेले राजकीय पाठबळ, नोकरी गेली तरी पुढचे आयुष्य  सुखात घालविण्याइतकी जमलेली संपत्ती, वगैरे. 

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून पोलीस आणि राजकीय नेते यांच्यात जी जुंपली आहे. त्यावर नैतिक चर्चा करण्याची गरज नाही. गुंड प्रवृत्तीचा पोलीस अधिकारी सचिन वाझेला डोक्यावर चढविण्याचा दुष्परिणाम सरकारला भोगावे लागत आहेत. सुरुवातीला केवळ स्फोटके ठेवण्याच्या घटनेनंतर वाझेपुरती घटना केंद्रीत झाली होती. त्यावेळी भाजपाकडून विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शिवसेनेला लक्ष्य करून टीका केली जात होती. त्यावेळी महाविकास आघाडीचे इतर दोन पक्ष राष्ट्रवादी आणि काॅंग्रेस थोडे मजा घेण्याच्या ‘मूड’मध्ये होते. परंतु परमबीर सिंग यांच्यावर कारवाई झाल्यानंतर त्यांनी थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटीचा बॉम्ब टाकला आणि वाझे आणि त्यांचे संबंध उघड केले. त्यानंतर महाविकास आघाडी खडबडून जागी झाली.

एकट्या पडलेल्या शिवसेनेलाही थोडे बळ आले. सरकारची प्रतिष्ठा वाचविण्यासाठी तिन्ही पक्षनेते आक्रमक झाले. परंतु तोपर्यंत बरीच बेअब्रु झालेली होती. काँग्रेसच्या वरिष्ठांनीही दखल घेत सरकारची पडझड थांबविण्याचा प्रयत्न केला.  महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षातील महत्त्वाचा  दोष  म्हणजे यांचा प्राधान्यक्रम पहिल्यांदा पक्ष वाचविणे आणि त्यानंतर सरकार वाचविणे असा दिसतो आहे. 

धनंजय मुंडे, संजय राठोड या प्रकरणाची चर्चा पक्षाच्या प्रतिमेभोवती घुटमळत राहिली. त्यामुळे सरकारी निर्णय घेताना दमछाक होताना दिसते. विरोधकांकडून होणारा राजकीय हल्ला सरकारचा न मानता पक्षावरचा मानण्याची मानसिकता झाल्याने या तीन चाकी सरकारची वाटचाल डळमळीत होताना दिसते. याचाच गैरफायदा परमबीर सिंगसारख्या कसलेल्या पोलीस अधिकाऱ्याकडून होताना दिसतो. प्रशासनावर घट्ट पकड नसल्याने अधिकाऱ्याची अशी  बेधडक हिंमत वाढताना दिसते. 

महाराष्ट्राच्या राजकीय घटनेकडे केंद्राकडून कायम सापत्न वागणूक मिळाल्याचेही चित्र दिसते. सुशांत सिंग, टीआरपी घोटाळा त्याआधी भीमा कोरेगाव ही प्रकरणे ज्या वेगाने राष्ट्रीय  तपास यंत्रणेकडे (एनआयए) देण्यात आली त्यावरून राज्य सरकारकडे पाहण्याचा आकसही दिसून येतो. परमबीर सिंग या दुखावलेल्या अधिकाऱ्याने सीबीआय चौकशीसाठी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. अर्थात त्यांना पुन्हा उच्च न्यायालयात परतावे लागले ही गोष्ट वेगळी. सरकारला कोंडीत पकडण्याची एकही संधी न सोडणा-या विरोधी पक्षाने केंद्राच्या भक्कम पाठिंब्यामुळे महाविकास आघाडीची प्रतिमा डागाळण्यात तूर्त यशस्वी झाल्याचे चित्र दिसते. परंतु महाविकास आघडीचे सरकार ही खेळी कशी  उलथून टाकते ते येत्या काही दिवसात दिसेलच. 

भाजप सध्या पुन्हा सत्तेवर येण्यापेक्षा हे सरकार त्यांच्याच पायात पाय घालून कसे पडेल याची वाट पाहत आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी तर आपण सरकार विरोधी  असल्याचे वारंवार सिद्ध केले आहे. त्यामुळे राज्यपाल विरुद्ध महाराष्ट्र  सरकार हा सामना गेली वर्षभर रंगलेला आहेच. या पार्श्वभूमीवर राज्यात दर महिन्याला राष्ट्रपती राजवट लागू होणार याची चर्चा रंगलेली असते. केंद्राचे सरकार आणि त्यातील मंत्री सध्या पाच राज्यांच्या निवडणुकात व्यग्र असल्याने महाराष्ट्र सरकारवर तितक्या तडफेने राजकीय हल्ला करू शकले नाहीत. दोन मे नंतर या राज्याचे निकाल लागतील. त्यानंतर बऱ्याच राजकीय घडामोडी अपेक्षित आहेत. 

महाविकास आघाडीचे सरकार तोपर्यंत स्वतःला सावरुन घेईल आणि नव्या हल्ल्याला सामोेरे जायला तयार असेल अशी आशा तूर्त बाळगायला हरकत नाही. तोपर्यंत या राज्य सरकारने कोरोना नियंत्रित आणण्यास यश मिळविले तर राज्यात या सरकरविषयी सहानुभूती  निर्माण होऊ शकते. त्यामुळे उद्धव  सरकारने विरोधकावर शक्ती खर्च करण्यापेक्षा राज्याचे आरोग्य सुधारण्याकडे लक्ष दिले तर त्याचा राजकीय फायदा नक्कीच होईल. तूर्त एवढेच. (लेखक लोकमतच्या मुंबई आवृत्तीचे कार्यकारी संपादक आहेत.)

टॅग्स :sachin Vazeसचिन वाझेcorona virusकोरोना वायरस बातम्याMukesh Ambaniमुकेश अंबानीAnil Deshmukhअनिल देशमुखBJPभाजपा