शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

बेसुमार वाळूउपशामुळे नद्यांचे झाले गटार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 04:37 IST

नद्या कोरड्या पडायला आणि पाऊस-पाणी निघून जायला एकमात्र कारण आणि ते म्हणजे, वाळूउपसा. हे कारण म्हणून कुणालाच स्वीकारावेसे वाटत नाही. कारण वाळू प्रत्येकाला हवी आहे.

- प्रमोद पवार आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी यमुना किनारी विश्व सांस्कृतिक समारंभाचे आयोजन केले आणि त्यात १५५ देशांतील सद्भाविकांनी सहभाग नोंदवून संस्कृतीची देवाण-घेवाण केली. पंतप्रधानांनी कार्यक्रमाचे महत्त्व प्रतिपादन करताच, यमुनेचा खोटा कैवार असणाऱ्यांनी कोल्हेकुई सुरू केली. इतर वेळी यांना नद्यांशी काहीही घेणे-देणे नसते. खासगी कार्यक्रमासाठी सैनिकांचा वापर केला, यमुनेचे पात्र बदलले, खोदकाम केले, (वाळूतली म्हणायला तोंडच नाय) म्हणून मातीतली जैवविविधता नष्ट केली आणि अशी एक ना दोन अच्छे को बुरा साबित करण्यासासाठी, प्रतिमा मलीन करण्यासाठी खोडसाळबुद्धीला जी-जी कारणे सुचतील, ती-ती हरित लवादासमोर मांडण्याचा हिरिरीने मांडण्याचा प्रयत्न केला, पण दूरदूरपर्यंत किमान दिडशे किमीच्या पट्ट्यात वाळूउपसा करणाºयांनी नदीचे गटार केले, म्हणून कुणी एकजुटीने पुढे आलेले दिसले नाहीत किंवा दिसतही नाहीत. जानेवारी-फेब्रुवारीपासूनच कोरड्या पडणाºया नदीकाठी आम्ही झाडे लावू , नव्हे-नव्हे बारमाही प्रवाहीत करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करू, त्यात पाणी भरण्यासाठी डॉ. राजेंद्र सिंहांचा जोहड पॅटर्न राबवू, असे तळमळीने ना श्री श्री म्हणाले, ना कांगावा करणारे, ना लवादाला हे सुचले.नद्या कोरड्या पडायला आणि पाऊस-पाणी निघून जायला एकमात्र कारण आणि ते म्हणजे, वाळूउपसा. हे कारण म्हणून कुणालाच स्वीकारावेसे वाटत नाही. कारण वाळू प्रत्येकाला हवी आहे. वाळूउपसा- रेती उत्खनन ही आता केवळ एका राज्याची समस्या नसून, ज्या-ज्या राज्यांनी अधिकृत आणि अनधिकृत बांधकामांना प्रोत्साहन दिले, सिमेंटची जंगले वाढवून शायनिंगचा वसा घेतला, तिथे-तिथे ही समस्या ‘आ’ वासून उभी राहिली आहे आणि तिने तक्रारदार शेतकºयांपासून ते पोलीस, तहसीलदार-जिल्हाधिकाºयांपर्यंतच्या कर्तव्यदक्ष-निरापराधांचे शेकडो बळी घेतले आहेत.यमुनेच्या डोहातली सुमारे दीडशे ते दोनशे किमी पट्ट्यातील अवैध रेतीची तस्करी निदर्शनास आणूनदेखील लवाद दुर्लक्ष करतो, तर दुसरीकडे अनावश्यक गोष्टीत लक्ष घालून त्रास देण्याची भूमिका बजावतो. कृष्णा- नर्मदा ६० टक्के लहान झाल्यात, तर कावेरी ४० टक्के आणि गोदावरी २० टक्के लहान झालीय. हजारो वर्षांपासून अव्व्याहत वाहणाºया या जीवनदायिनी फक्त पावसाळ्यातच वाहू लागल्या आहेत. तीच अवस्था गेल्या १५ ते २० वर्षांत या मोठ्या नद्यांची होताना दिसतेय. पुढील १५ ते २० वर्षांत पावसाबरोबर लोंढे आले तसे मुरून जातील. आताच जानेवारी- फेब्रुवारीमध्ये नद्या सुकू लागल्यात, गोदावरी-भीमेची पात्र खोदून लोक पाणी शोधू लागलेत. यमुना, कावेरी, कृष्णेची माळराने झालीत. सुजलाम सुफलाम देशाच्या २५ टक्के भूभागाचे माळरान झालेय. मी ‘माळरान’ शब्द का वापरतोय कळतेय ना? कारण वाळवंट म्हणायला नदीत वाळू असावी लागते.वाळूच जलस्तर कायम राखू शकते. मातीत पाणी धारण करण्याची क्षमता नसते आणि जैवविविधतेचे सृजन वाळूच्या पाण्यातच होते, सुकलेल्या यमुनेच्या पात्रात नव्हे. आजमितीला बारमाही वाहणारी कृष्णा नदी चार महिने समुद्रापर्यंत पोहोचू शकत नाही, तर कावेरी तीन ते साडेतीन महिने समुद्रापासून दूर असते. या पुढच्या पिढीसाठी धोक्याच्या घंटा नाहीत का? हजारो-लाखो वर्षे खळखळ-धोधो वाहणाºया या नद्या शायनिंगच्या नादात सिमेंटच्या जंगलापायी बांधकाम माफिया, जंगल माफिया-वाळूमाफियांबरोबरच हातमिळवणी करून, आपल्या एका पिढीनेच नष्ट करून टाकल्या. यातून निर्माण होणारा धोका आता तरी ओळखायला हवा.

(लेखक सामाजिक कार्यकर्ते आहेत) 

टॅग्स :riverनदीwater shortageपाणीटंचाई