शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

बेसुमार वाळूउपशामुळे नद्यांचे झाले गटार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 04:37 IST

नद्या कोरड्या पडायला आणि पाऊस-पाणी निघून जायला एकमात्र कारण आणि ते म्हणजे, वाळूउपसा. हे कारण म्हणून कुणालाच स्वीकारावेसे वाटत नाही. कारण वाळू प्रत्येकाला हवी आहे.

- प्रमोद पवार आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी यमुना किनारी विश्व सांस्कृतिक समारंभाचे आयोजन केले आणि त्यात १५५ देशांतील सद्भाविकांनी सहभाग नोंदवून संस्कृतीची देवाण-घेवाण केली. पंतप्रधानांनी कार्यक्रमाचे महत्त्व प्रतिपादन करताच, यमुनेचा खोटा कैवार असणाऱ्यांनी कोल्हेकुई सुरू केली. इतर वेळी यांना नद्यांशी काहीही घेणे-देणे नसते. खासगी कार्यक्रमासाठी सैनिकांचा वापर केला, यमुनेचे पात्र बदलले, खोदकाम केले, (वाळूतली म्हणायला तोंडच नाय) म्हणून मातीतली जैवविविधता नष्ट केली आणि अशी एक ना दोन अच्छे को बुरा साबित करण्यासासाठी, प्रतिमा मलीन करण्यासाठी खोडसाळबुद्धीला जी-जी कारणे सुचतील, ती-ती हरित लवादासमोर मांडण्याचा हिरिरीने मांडण्याचा प्रयत्न केला, पण दूरदूरपर्यंत किमान दिडशे किमीच्या पट्ट्यात वाळूउपसा करणाºयांनी नदीचे गटार केले, म्हणून कुणी एकजुटीने पुढे आलेले दिसले नाहीत किंवा दिसतही नाहीत. जानेवारी-फेब्रुवारीपासूनच कोरड्या पडणाºया नदीकाठी आम्ही झाडे लावू , नव्हे-नव्हे बारमाही प्रवाहीत करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करू, त्यात पाणी भरण्यासाठी डॉ. राजेंद्र सिंहांचा जोहड पॅटर्न राबवू, असे तळमळीने ना श्री श्री म्हणाले, ना कांगावा करणारे, ना लवादाला हे सुचले.नद्या कोरड्या पडायला आणि पाऊस-पाणी निघून जायला एकमात्र कारण आणि ते म्हणजे, वाळूउपसा. हे कारण म्हणून कुणालाच स्वीकारावेसे वाटत नाही. कारण वाळू प्रत्येकाला हवी आहे. वाळूउपसा- रेती उत्खनन ही आता केवळ एका राज्याची समस्या नसून, ज्या-ज्या राज्यांनी अधिकृत आणि अनधिकृत बांधकामांना प्रोत्साहन दिले, सिमेंटची जंगले वाढवून शायनिंगचा वसा घेतला, तिथे-तिथे ही समस्या ‘आ’ वासून उभी राहिली आहे आणि तिने तक्रारदार शेतकºयांपासून ते पोलीस, तहसीलदार-जिल्हाधिकाºयांपर्यंतच्या कर्तव्यदक्ष-निरापराधांचे शेकडो बळी घेतले आहेत.यमुनेच्या डोहातली सुमारे दीडशे ते दोनशे किमी पट्ट्यातील अवैध रेतीची तस्करी निदर्शनास आणूनदेखील लवाद दुर्लक्ष करतो, तर दुसरीकडे अनावश्यक गोष्टीत लक्ष घालून त्रास देण्याची भूमिका बजावतो. कृष्णा- नर्मदा ६० टक्के लहान झाल्यात, तर कावेरी ४० टक्के आणि गोदावरी २० टक्के लहान झालीय. हजारो वर्षांपासून अव्व्याहत वाहणाºया या जीवनदायिनी फक्त पावसाळ्यातच वाहू लागल्या आहेत. तीच अवस्था गेल्या १५ ते २० वर्षांत या मोठ्या नद्यांची होताना दिसतेय. पुढील १५ ते २० वर्षांत पावसाबरोबर लोंढे आले तसे मुरून जातील. आताच जानेवारी- फेब्रुवारीमध्ये नद्या सुकू लागल्यात, गोदावरी-भीमेची पात्र खोदून लोक पाणी शोधू लागलेत. यमुना, कावेरी, कृष्णेची माळराने झालीत. सुजलाम सुफलाम देशाच्या २५ टक्के भूभागाचे माळरान झालेय. मी ‘माळरान’ शब्द का वापरतोय कळतेय ना? कारण वाळवंट म्हणायला नदीत वाळू असावी लागते.वाळूच जलस्तर कायम राखू शकते. मातीत पाणी धारण करण्याची क्षमता नसते आणि जैवविविधतेचे सृजन वाळूच्या पाण्यातच होते, सुकलेल्या यमुनेच्या पात्रात नव्हे. आजमितीला बारमाही वाहणारी कृष्णा नदी चार महिने समुद्रापर्यंत पोहोचू शकत नाही, तर कावेरी तीन ते साडेतीन महिने समुद्रापासून दूर असते. या पुढच्या पिढीसाठी धोक्याच्या घंटा नाहीत का? हजारो-लाखो वर्षे खळखळ-धोधो वाहणाºया या नद्या शायनिंगच्या नादात सिमेंटच्या जंगलापायी बांधकाम माफिया, जंगल माफिया-वाळूमाफियांबरोबरच हातमिळवणी करून, आपल्या एका पिढीनेच नष्ट करून टाकल्या. यातून निर्माण होणारा धोका आता तरी ओळखायला हवा.

(लेखक सामाजिक कार्यकर्ते आहेत) 

टॅग्स :riverनदीwater shortageपाणीटंचाई