शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

नदी स्वच्छता ‘मन की बात’पुरतीच राहू नये!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 03:02 IST

मोर्णा असो की चंद्रभागा किंवा वर्धेतील धाम, या सर्व नद्यांचे प्राक्तन एकच ! नद्यांच्या स्वच्छतेसाठी अभियानांच्या घोषणा खूप होतात; पण प्रत्यक्षात सरकारकडून ठोस पावले उचलली जात नाहीत.

- राजेश शेगोकारमोर्णा असो की चंद्रभागा किंवा वर्धेतील धाम, या सर्व नद्यांचे प्राक्तन एकच ! नद्यांच्या स्वच्छतेसाठी अभियानांच्या घोषणा खूप होतात; पण प्रत्यक्षात सरकारकडून ठोस पावले उचलली जात नाहीत. केवळ लोकसहभागाच्या भरवशावर नद्यांची स्वच्छता होणार नाही. सरकारच्या पातळीवर प्रत्यक्ष कृतीची गरज आहे. केवळ आराखड्यांनी काही होणार नाही.अकोल्यात सुरू झालेल्या मोर्णा नदी स्वच्छता अभियानाची नोंद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ‘मन की बात’मध्ये घेतली. अकोल्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या अभियानाला प्रशासनासोबतच स्वयंसेवी संस्था व लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पंतप्रधानांनी दखल घेतल्यानंतर, या अभियानाला आणखी उंची मिळाली आहे. मोर्णा स्वच्छतेचा हा ‘पॅटर्न’ राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये आता सुरू झाला आहे. पुण्यातील पवनाई व वर्धा शहरातील धाम या नद्यांच्या स्वच्छतेसाठी प्रशासनासोबत लोकांचा सहभाग वाढत आहे. हे चांगले संकेत आहेत; मात्र केवळ लोकसहभागातून नदी स्वच्छता अन् सौंदर्यीकरणाचा प्रश्न मिटणार नाही, तर शासनानेही पुढाकार घेऊन निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे.नद्यांच्या स्वच्छतेसाठी यापूर्वी अनेकदा प्रयत्न झाले आहेत. गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी १९९३ मध्ये कृती आराखडा तयार करण्यात आला होता. त्यावर अंदाजे २० हजार कोटी रुपये खर्च झाले होते. त्यानंतर २००९ मध्ये राष्ट्रीय गंगा खोरे प्राधिकरण स्थापन झाले व सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘ड्रीम प्रोजेक्ट’ म्हणून ‘नमामि गंगे’ अभियान सुरू आहे. दुर्दैवाने कृती आराखडा, प्राधिकरणाची स्थापना आणि ‘नमामि गंगे’ अभियानानंतरही गंगेची अवस्था ‘जैसे थे’ आहे. वारकरी संप्रदायात पंढरपुरातून वाहणाºया चंद्रभागेला विठ्ठलाएवढेच महत्त्व आहे, ते लक्षात घेऊन मध्यंतरी महाराष्ट्र शासनाने ‘नमामि गंगे’च्या धर्तीवर ‘नमामि चंद्रभागा’ अभियानाची घोषणा केली. त्यावेळी राज्यातील नद्यांच्या स्वच्छतेचा मुद्दा ऐरणीवर आला होता.पर्यावरणाच्या दृष्टीनेच नव्हे, तर भावनिक, धार्मिक, सामाजिकदृष्ट्याही मानवी संस्कृतीत नदीचे स्थान खूप वरचे आहे. नदी केवळ पाण्याचा प्रवाहच वाहून नेत नाही, तर त्या प्रदेशाची अर्थव्यवस्थाही प्रवाही करीत असते. नदीच्या काठाने वसणारे विश्व हे नदीवरच अवलंबून असणारे असते. त्यामुळेच नदी काठावरची लोकसंख्येची घनता जास्त असते. कदाचित त्यामुळेच नदी प्रदूषित होण्याची प्रक्रिया अधिक वेगाने होत असावी. नद्यांवर पाण्यासाठी उभे केलेले बंधारे, गावे व शहरांमधील संपूर्ण सांडपाण्याचा नदीत होणारा निचरा, रेतीसाठी होणारी नदी पात्रांची प्रचंड खोदाई, थेट नदी पात्रातील अतिक्रमण यामुळे नद्यांचे अस्तित्व जवळजवळ संपुष्टात येऊन तिचा नाला झालेला असतो. मोर्णा असो की चंद्रभागा किंवा वर्धेतील धाम या सर्वांचे प्राक्तन एकच! त्यामुळे सरकारने नद्यांच्या स्वच्छता अभियानांची घोषणा करून त्याला ‘नमामि’ हा ‘टॅग’ चिटकवित थेट पंतप्रधानांशी नाते सांगितले. प्रत्यक्षात मात्र सरकारकडून ठोस अशी मदत केली जात नाही, हे वास्तव आहे. नमामि चंद्रभागेसाठी बैठकांचा रतीब घालण्यात आला; पण पुढे काय? तशीच स्थिती ‘मन की बात’मध्ये उल्लेख झालेल्या मोर्णेच्या बाबतीत होऊ नये, ही अपेक्षा गैर नाही. मोर्णा नदी स्वच्छतेसाठी दानशूर व्यक्ती, संस्था व लोकप्रतिनिधी पुढे आले आहेत; परंतु नदीच्या स्वच्छता व सौंदर्यीकरणाचा आराखडा पाहता ती रक्कम अपुरी पडणार आहे. लोकसहभागातून सौंदर्यीकरणाला मर्यादा आहेत. शिवाय सांडपाण्याचा नदीतील निचरा थांबविण्याचेही आव्हान आहेच. त्यामुळे शासनाने नद्यांची स्वच्छता व सौंदर्यीकरणासाठी केवळ घोषणा व लोकसहभागाचे कौतुक करू नये, तर मदतीचा हातही देण्याची गरज आहे.

टॅग्स :riverनदी