शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीत नवी समीकरणे; बहुजन विकास आघाडी अन् मनसेची युती होणार? नेते म्हणाले...
2
अंजली दमानियांकडून राजीनाम्याची मागणी; मला योग्य वाटेल ते मी करेन, अजित पवारांची प्रतिक्रिया
3
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
4
डरानेवालो को डराओ! 'शिवतीर्थ'समोर बॅनरबाजी; उत्तर भारतीय सेनेने मनसे प्रमुख राज ठाकरेंना डिवचलं
5
KL Rahul: द.आफ्रिकेविरुद्ध केएल राहुल इतिहास रचणार? मोठ्या विक्रमापासून फक्त १५ धावा दूर!
6
पार्थ पवारांच्या कंपनीकडून आणखी एक फसवणूक; जमीन खरेदीचा १४७ कोटींचा नजराणाही बुडवला
7
कर्मचाऱ्यांना दररोज ऑफिसला येण्याचा आदेश, ६०० जणांनी राजीनामा दिला; कंपनीला बसला ₹१,५३५ कोटींचा फटका
8
२० क्विंटल स्फोटकांची खरेदी अन् पैशांवरुन वाद; ४ शहरांमध्ये IED हल्ला करण्याचा होता दहशतवाद्यांचा प्लॅन
9
Share Market Today: Nifty ची सुस्त सुरुवात, सेन्सेक्सच्या ३ दिवसांच्या तेजीवर ब्रेक; IT शेअर्स धडाम
10
दिल्ली कार हल्ल्याचा मास्टरमाईंड डॉ. उमर कुणाकडून घेत होता आदेश? धक्कादायक माहिती आली समोर
11
Groww IPO Listing: Google सारखीच आहे Groww ची कहाणी! एक चूक आणि बनलं ओळखीचं नाव, शेअर बाजारातही केलं अवाक्
12
दिल्ली स्फोटाचे गुपित उघडले; कारमधील मृतदेह डॉ. उमर नबीचाच, DNA रिपोर्ट समोर
13
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
14
'३ इडियट्स'मधील मिलीमीटर पत्नीसोबत दिसला दिल्लीच्या रस्त्यावर, १६ वर्षांनंतर त्याला ओळखणं झालं कठीण
15
“नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्यावर असेल भर, सत्तेची नाही विचारांची लढाई”: सपकाळ
16
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
17
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
18
वोटचोरीसह सरकार नोकरी चोर निघाले, वर्षाला २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासनाचे काय?: काँग्रेस
19
FREE मध्ये अपडेट होतंय Aadhaar Card, वर्षभरासाठी माफ झाली फी; पाहा कोणाला मिळणार फायदा?
20
Dharmendra Health Update : "आता सगळं देवाच्या हातात आहे...", धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत बोलताना हेमा मालिनी भावुक, म्हणाल्या- "मुलं रात्रभर..."

कंत्राटीकरणाचा धोका! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2023 06:57 IST

कंत्राटी पद्धतीने खासगी संस्थांचे कर्मचारी पाेलिस दलाचे काम करणार असतील तर गाेपनीयतेचे खूप मुद्दे उपस्थित हाेऊ शकतात. याबाबतही राज्यपालांनी राज्य सरकारचे लक्ष वेधायला हवे. किंबहुना नाशिक दाैऱ्यात महाराष्ट्र आराेग्य विज्ञान विद्यापीठात राज्यपालांनी घडवून आणलेल्या चर्चेची नोंद राज्य सरकारने घ्यायला हवी.

महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांच्या परीक्षेतील घाेटाळे थांबण्याचे नाव घेत नाहीत. परिणामी परीक्षा रद्द हाेणे किंवा पुढे ढकलण्यासारखे निर्णय घ्यावे लागतात. अशा घाेटाळ्यांवर आळा घालण्याची गरज असताना महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांचे पदसिद्ध कुलपती असलेले राज्यपाल रमेश बैस यांनी एक उत्तम सल्ला दिला आहे. नाशिक येथे पंचवीस वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र आराेग्य विज्ञान विद्यापीठास त्यांनी भेट दिली. तेव्हा विद्यापीठांच्या कामकाजाची चर्चा करताना कंत्राटी पद्धतीने नेमलेल्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती परीक्षा विभागात करण्यात येऊ नये, असा माैलिक सल्ला दिला आहे. 

परीक्षा विभागाचे काम हे मुळात गाेपनीय आणि जाेखमीचे असते. त्या निरपेक्ष झाल्या पाहिजेत, अशी परीक्षार्थींची अपेक्षा असते. कंत्राटी कर्मचारी एखाद्या खासगी संस्थेमार्फत नियुक्त केले जाऊ शकतात. त्यांना विद्यापीठाचे कर्मचारी मानले जात नाही. त्यांना पुरेसा माेबदलाही दिला जात नाही. परिणामी त्यांच्यामध्ये उत्तरदायित्वाची तसेच विश्वासार्हतेची भावना कमी असू शकते. त्यांची बांधिलकी देखील राहत नाही. राज्यपाल महाेदयांनी परीक्षा विभागाच्या कामाचे महत्त्व जाणून नेमकेपणावर बाेट ठेवले आहे. राज्य सरकारच्या विविध विभागात माेठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत. तशी आराेग्य विज्ञान विद्यापीठ, कृषी विद्यापीठ आणि इतर विषयांच्या सर्वच विद्यापीठात असंख्य पदे रिक्त आहेत. शिवाय राज्य सरकारच्या विविध विभागातही सुमारे एक लाख पदे रिक्त आहेत. ही सर्व पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 

यासाठी कर्मचारी पुरवठा करणाऱ्या संस्थांची निवड करण्याची प्रक्रिया चालू आहे. या निर्णयास विद्यार्थी आणि युवकांचा विराेध असतानाही ताे जुमानायचा नाही, असाच निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. गेल्या चार-पाच दिवसात राज्य सरकारच्या चार विभागात सुमारे ११ हजार २०३ पदे भरण्याची प्रक्रियादेखील सुरू करण्यात आली आहे. लाेकशाहीच्या चार स्तंभांपैकी प्रशासन हा एक आहे. पारदर्शी कारभार चालवून लाेककल्याणकारी राज्याची कल्पना प्रत्यक्षात उतरविण्याची जबाबदारी प्रशासनाची असते. त्यासाठी राज्य सरकारशी बांधिलकी मानणारा कर्मचारी वर्ग असावा लागताे. अन्यथा राज्य सरकारने कितीही उत्तम याेजना आखून त्यांचा लाभ राज्यातील जनतेला व्हावा, अशी अपेक्षा करीत असाल तर त्यासाठी तितक्याच आत्मीयतेने काम करणारे प्रशासन असावे लागते. 

राज्यपाल महाेदयांनी हेच मुद्दे मांडत विद्यापीठांच्या परीक्षा घेण्याची संपूर्ण प्रक्रिया राबविणे ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी असते. ती पार पाडण्याचे काम सेवा पुरवठादार खासगी कंपन्यांच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांवर साेपविणे, ही माेठी जाेखीम ठरू शकते. परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या गुणांचे मूल्यमापन करणारी प्रक्रिया आहे. ती राबविणाऱ्या यंत्रणेतील माणसं भाडाेत्री असतील तर ते काम पारदर्शी हाेईल का? अशीच शंका राज्यपाल रमेश बैस यांनी उपस्थित केली आहे. महाराष्ट्र आराेग्य विज्ञान विद्यापीठासमाेरदेखील रिक्त पदांची समस्या आहे. काळाबराेबर राहण्यासाठी विविध प्रकारचे नवनवे अभ्यासक्रम सुरू करावे लागतात. 

राज्य सरकारने सलग दहा वर्षांपेक्षा अधिक काळ कर्मचारी भरतीवर बंदी घातली असेल तर कामे कशी हाेणार? अशी विद्यापीठे चालवायची कशी? राज्यपालांनी उपस्थित केलेली शंका रास्त आहे. याचा विचार राज्य सरकारने गांभीर्याने करायला हवा आहे. हा विषय केवळ महाराष्ट्र आराेग्य विज्ञान विद्यापीठापुरता किंवा अकृषी तसेच कृषी विद्यापीठांपुरता मर्यादित राहत नाही. राज्य सरकार कंत्राटी पद्धतीने सुमारे एक लाख पदे भरू इच्छित आहे. त्यात गृह विभागासारखा महत्त्वाचा विभागही आहे. 

कंत्राटी पद्धतीने खासगी संस्थांचे कर्मचारी पाेलिस दलाचे काम करणार असतील तर गाेपनीयतेचे खूप मुद्दे उपस्थित हाेऊ शकतात. याबाबतही राज्यपालांनी राज्य सरकारचे लक्ष वेधायला हवे. किंबहुना नाशिक दाैऱ्यात महाराष्ट्र आराेग्य विज्ञान विद्यापीठात राज्यपालांनी घडवून आणलेल्या चर्चेची नोंद राज्य सरकारने घ्यायला हवी. आराेग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग असे अनेक महत्त्वाचे  विभाग आहेत. तेथे गाेपनीयता महत्त्वाची मानली जाते. कंत्राटी कर्मचारी परीक्षा विभागात काम करताना त्या परीक्षांमध्ये घाेटाळे हाेण्याची शक्यता अधिक आहे. विद्यापीठाशी बांधिलकी मानणारे स्वत:च्या नियुक्तीचे कर्मचारी असतील तर त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे साेपे जाणार आहे. राज्यपालांचा माैलिक सल्ला आणि कंत्राटीकरणाचे संभाव्य धाेकेही गांभीर्याने लक्षात घेण्याची गरज आहे.

टॅग्स :State Governmentराज्य सरकारEmployeeकर्मचारीjobनोकरीChief Ministerमुख्यमंत्रीGovernmentसरकार