शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

रिबेरोंची व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 03:36 IST

ज्युलिओ रिबेरो हे देशाचे एक मानांकित सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आहेत. सरकारसमोरची संकटे दूर करायला त्यांनी वेळोवेळी आपली बुद्धिमत्ता, कार्यक्षमता व संरक्षण कौशल्य पणाला लावले आहे.

ज्युलिओ रिबेरो हे देशाचे एक मानांकित सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आहेत. सरकारसमोरची संकटे दूर करायला त्यांनी वेळोवेळी आपली बुद्धिमत्ता, कार्यक्षमता व संरक्षण कौशल्य पणाला लावले आहे. पंजाबात भिंद्रानवाल्याचे थैमान सुरू असतानाच केंद्राने त्यांना बोलावले. मुंबईतील दंगलीही त्यांनीच आटोक्यात आणल्या. लोकांच्या आदराला पात्र असलेल्या या अधिकाऱ्याला आज मात्र देशातील धार्मिक आतंकाच्या व धर्मविद्वेषी राजकारणाच्या कळांनी व्यथित केले आहे. रिबेरो हे त्यांच्या धर्मनिरपेक्ष व सर्वधर्मसमभावी वृत्तीसाठी देशात सर्वमान्य आहे. आताच्या बहुसंख्याकवादाने व्यथित झालेल्या रिबेरोंना ‘मी देशभक्त ख्रिश्चन आहे’ हे जाहीररीत्या पण कमालीच्या व्यथित मनाने देशाला सांगावे लागले आहे. सारेच अल्पसंख्य देशविरोधी आहे हा सध्याचा संघ परिवाराचा प्रचार देशातील २० टक्क्याहून अधिक लोकांना देशविरोधी ठरवू लागला आहे. दिल्लीचे आर्चबिशप अनिल क्युटो यांनी या धर्मांधतेविरुद्ध शांततामय प्रार्थना करण्याचे व त्यासाठी शुक्रवारी उपवास करण्याचे आवाहन देशातील रोमन कॅथलिकांना केले. त्यावर सगळ्या हिंदुत्ववाद्यांनी कमालीची विषारी टीका केली. तिला उत्तर देताना ‘तुम्ही भारताला भगवे पाकिस्तान करण्याचा प्रयत्न करीत आहात’ हे उद्गार रिबेरो यांनी काढले आहेत. तशा आशयाचा लेख त्यांनी एका राष्ट्रीय दैनिकात लिहिलाही आहे. जोसेफ मॅझिनी हा इटलीच्या स्वातंत्र्यलढ्याचा नेता राष्ट्र या संकल्पनेची व्याख्या करताना १९ व्या शतकात म्हणाला ‘एक धर्म, एक वंश, एक भाषा, एक संस्कृती व एक भूप्रदेश ज्यात आहे ते म्हणजे राष्ट्र’. मॅझिनीला जाऊन शतके लोटली आणि त्याच्या काळातील एकसंघ राष्ट्रे आता कुठेही उरली नाहीत. त्याची व्याख्या आज अमलात आणायचे ठरविले तर जगातला एकही देश त्याचे तुकडे झाल्याखेरीज राहणार नाही. जगातला कोणताही देश आज एकधर्मी वा एकभाषी नाही. सगळे देश बहुवंशी व सांस्कृतिकबहुल बनले आहेत. शिवाय जगातले काही देश तर शेकडो बेटांनी एकत्र येऊन घडविले आहेत. याला अमेरिका अपवाद नाही, इंग्लंड नाही, मध्यपूर्वेतले देश नाहीत, रशिया नाही, चीन नाही आणि भारतही नाही. भारतात हिंदी भाषेचीच चार राज्ये आहेत. शिवाय भारतातल्या अल्पसंख्याकांची संख्या अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येएवढी आहे. वास्तव हे की एक कोटीहून कमी लोकसंख्या असलेले शंभराहून अधिक देश जगात आहेत आणि भारतातील अल्पसंख्याकांची संख्या, मुसलमान १७ कोटी, शीख २ कोटी, ख्रिश्चन ५० लाख तर जैन व बुद्ध काही लाखांएवढे आहेत. असा देश एकत्र राखायचा तर त्यात भाषिक वा सांस्कृतिक विवाद उरणार नाहीत याचीच काळजी राज्यकर्त्यांच्या वर्गांना घ्यावी लागणार आहे. गांधीजी सर्वधर्मसमभाव आणि नेहरू सेक्युलॅरिजमची भाषा उगाच बोलत नव्हते. देश संघटित राखायचा तर तसे करणे आवश्यक आहे म्हणून ते बोलत होते. आताचे राज्यकर्ते बहुसंख्याकवादाचे कंकण हाताला बांधूनच सत्तेवर आले आहे. त्यांना सारे मुसलमानविरोधी आणि सगळे ख्रिश्चन धर्मपरिवर्तनवादी वाटत आहेत. त्यांना जमेल तेवढे अडचणीचे ठरणारे कायदे करायचे आणि प्रसंगी हाती कायदा घेऊन त्यांच्यावर हल्ले करायचे हा त्यांच्यातील काहींचा कार्यक्रम आहे. गोवंश हत्याबंदीचा कायदा त्यातून झाला. सुधारणांचे लक्ष्य अल्पसंख्याकांना बनविले गेले. त्यातून ओरिसातील चर्चेसची जाळपोळ, गुजरातेमधील मशिदीचा विध्वंस याही गोष्टी झाल्या. अल्पसंख्याकांची हत्याकांडे त्यातून झाली. पुढे दलितही त्यांचे लक्ष्य बनले. एवढी अत्याचारी माणसे कायद्याच्या कक्षेबाहेर राहिलेली पाहून इतर गुंडांनाही चेव आला. त्यातून बलात्कार वाढले, अल्पवयीन मुलींवर अत्याचारात वाढ झाली आणि दलितांवरचा राग शमवून घ्यायला जागोजागी हल्लेखोर संघटित झाले. ज्युलिओ रिबेरो या शूर शिपायाची व्यथा यातून आली आहे. एकेकाळी मुसलमानांनी हिरवा पाकिस्तान बनविला आता तुम्ही भारतात भगवा पाकिस्तान बनवीत आहात हे त्यांनी चिडून लिहिलेले विधान हा त्याचा परिणाम आहे. रिबेरोंची व्यथा त्याचमुळे साºया संवेदनशीलांनी समजून घेतली पाहिजे.

टॅग्स :Policeपोलिस