शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
4
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
5
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
6
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
7
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
8
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
9
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
10
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
11
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
12
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
13
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
14
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
15
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
16
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
17
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
18
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
19
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
20
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...

ती जबाबदारी सरकारची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 00:16 IST

‘जम्मू भागात लष्करी छावण्यांवर हल्ला करून सहा जवानांसह एका नागरिकाचा बळी घेणा-या पाकिस्तानी घुसखोरांना योग्य तो धडा शिकविण्याची’ आता सर्वांना पाठ झालेली पांचट भाषा आपले लष्करप्रमुख विपीन रावत यांनी पुन: एकवार वापरली आहे.

‘जम्मू भागात लष्करी छावण्यांवर हल्ला करून सहा जवानांसह एका नागरिकाचा बळी घेणा-या पाकिस्तानी घुसखोरांना योग्य तो धडा शिकविण्याची’ आता सर्वांना पाठ झालेली पांचट भाषा आपले लष्करप्रमुख विपीन रावत यांनी पुन: एकवार वापरली आहे. लष्करी जवानांचा उत्साह वाढविण्यासाठी आणि सीमावर्ती भागातील जनतेचे मनोबल वाढविण्यासाठी अशी ‘जोरकस’ भाषा वापरणे उपयोगाचे असले तरी तिचा सतत केला जाणारा वापर परिणामशून्य व प्रसंगी हास्यास्पद वाटावा असा होतो. वास्तव हे की अशी भाषा देशाच्या राजकीय नेतृत्वाने वा संरक्षण मंत्र्याने बोलायची. पण ते देशातील आपल्या राजकीय विरोधकांवर तोंड सोडण्यात जास्तीचे गुंतले असल्याने विपीन रावतांनी त्यांची ही जबाबदारी घेतली असावी. आम्ही सर्जिकल स्ट्राइक करून एक धडा पाकिस्तानला दिला आहे. आणखीही असे धडे व पर्यायी उपाय योजायला आम्ही सिद्ध आहोत, हे सांगून तरी या रावतांनी काय मिळविले आहे. २०१७ या एकाच वर्षात पाकिस्तानने भारताच्या सीमेचा भंग ८६० वेळा केला. तर त्याआधीच्या २०१६ या वर्षीही त्याने २७१ वेळा केला आहे. आपला सर्जिकल स्ट्राइक किती परिणामकारक ठरला, याची साक्ष देणारी ही आकडेवारी आहे. शत्रूला भाषणाने तोंड द्यायचे नसते. त्यास जरब बसेल अशी जबरदस्त अद्दल घडवायची असते. ते राहिले बाजूला आणि त्याऐवजी युद्धविषयक कविताच त्याला ऐकवण्याचे धोरण आपण आखले असेल तर ते देशाच्याही करमणुकीचा विषय होणार आहे. पाकिस्तान सरळ युद्ध करीत नाही. तो आपल्या घुसखोर टोळ्या भारतात घुसवितो व त्यांना शस्त्रबळ पुरवितो. जम्मू आणि काश्मिरात त्यास मदत करणाºया फुटीरतावादी टोळ्याही आहेत. त्यातून काश्मीरचे सरकार व त्या राज्यातील सगळे प्रमुख पक्ष पाकिस्तानशी समोरासमोरची बोलणी करण्याची मागणी करीत आहे. पाकिस्तानला चीनची छुपी मदत व उघड म्हणावे असे आर्थिक साहाय्य आहे. ही स्थिती गुंतागुंतीची आहे. ती घाईघाईची नसून राजनयाने वाटचाल करण्याची गरज सांगणारी आहे. मात्र भारताने अशी बोलणी आता बंद केली आहेत आणि त्यामुळे चर्चेचे मार्ग संपले आहेत. घुसखोरांच्या कारवाया थांबत नाहीत आणि फुटीरतावाद्यांचे उपद्व्यापही तसेच राहिले आहेत. ही स्थिती फार काळ चालणे काश्मिरी जनतेचा सुरक्षावरील विश्वास उडविणारी आणि आपल्या लष्करी बळाविषयी तिच्या मनात संशय उत्पन्न करणारी आहे. विपीन रावत दिल्लीत असताना धमक्या देतात आणि श्रीनगरला गेले की तेथेही तीच भाषा बोलतात. त्यांच्या व सरकारच्या अडचणी साºयांना समजणाºया आहेत. ७० वर्षांएवढा जुना प्रश्न एका कारवाईने सुटेल असे नाही आणि भारतासारखेच पाकिस्तान आता अण्वस्त्रधारी बनलेले राष्ट्र आहे. पण त्यांच्यापुढे गुरकावण्याची भाषा हे या स्थितीवरचे उत्तर ठरू शकत नाही. राजकीय वाटाघाटी, प्रश्नाबाबतचा खुलेपणा आणि त्यामागे लष्कराच्या बळाचे उभे असणे हा या स्थितीवरचा तोडगा काढण्याचा बहुमुखी मार्ग आहे. पाकिस्तान हा देश काश्मीरवर त्याचा हक्क सांगणारा आहे आणि ते राज्य हा भारताचा अविभाज्य भाग असल्याची आपली भूमिका आहे. या परस्परविरोधी भूमिकांवरचा तोडगा लष्करी असणार नाही. तो राजकीयच असावा लागेल. असा तोडगा काढणे हे रावतांचे काम नाही. ते मोदींचे व सरकारचे उत्तरदायित्व आहे. किमान पाकिस्तानच्या राजकीय नेतृत्वाशी अनौपचारिक संबंध राखू शकणारे सध्याचे राजकारण ते उत्तरदायित्व पार पाडू शकणारेही आहे. सबब लष्कराने बोलू नये. ती सरकारची जबाबदारी आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरPakistanपाकिस्तान