शहरं
Join us  
Trending Stories
1
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 
4
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
5
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
6
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
7
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
8
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
9
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
10
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
11
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
12
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
13
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
14
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
15
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
16
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
17
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
18
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
19
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई
20
Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू

ती जबाबदारी सरकारची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 00:16 IST

‘जम्मू भागात लष्करी छावण्यांवर हल्ला करून सहा जवानांसह एका नागरिकाचा बळी घेणा-या पाकिस्तानी घुसखोरांना योग्य तो धडा शिकविण्याची’ आता सर्वांना पाठ झालेली पांचट भाषा आपले लष्करप्रमुख विपीन रावत यांनी पुन: एकवार वापरली आहे.

‘जम्मू भागात लष्करी छावण्यांवर हल्ला करून सहा जवानांसह एका नागरिकाचा बळी घेणा-या पाकिस्तानी घुसखोरांना योग्य तो धडा शिकविण्याची’ आता सर्वांना पाठ झालेली पांचट भाषा आपले लष्करप्रमुख विपीन रावत यांनी पुन: एकवार वापरली आहे. लष्करी जवानांचा उत्साह वाढविण्यासाठी आणि सीमावर्ती भागातील जनतेचे मनोबल वाढविण्यासाठी अशी ‘जोरकस’ भाषा वापरणे उपयोगाचे असले तरी तिचा सतत केला जाणारा वापर परिणामशून्य व प्रसंगी हास्यास्पद वाटावा असा होतो. वास्तव हे की अशी भाषा देशाच्या राजकीय नेतृत्वाने वा संरक्षण मंत्र्याने बोलायची. पण ते देशातील आपल्या राजकीय विरोधकांवर तोंड सोडण्यात जास्तीचे गुंतले असल्याने विपीन रावतांनी त्यांची ही जबाबदारी घेतली असावी. आम्ही सर्जिकल स्ट्राइक करून एक धडा पाकिस्तानला दिला आहे. आणखीही असे धडे व पर्यायी उपाय योजायला आम्ही सिद्ध आहोत, हे सांगून तरी या रावतांनी काय मिळविले आहे. २०१७ या एकाच वर्षात पाकिस्तानने भारताच्या सीमेचा भंग ८६० वेळा केला. तर त्याआधीच्या २०१६ या वर्षीही त्याने २७१ वेळा केला आहे. आपला सर्जिकल स्ट्राइक किती परिणामकारक ठरला, याची साक्ष देणारी ही आकडेवारी आहे. शत्रूला भाषणाने तोंड द्यायचे नसते. त्यास जरब बसेल अशी जबरदस्त अद्दल घडवायची असते. ते राहिले बाजूला आणि त्याऐवजी युद्धविषयक कविताच त्याला ऐकवण्याचे धोरण आपण आखले असेल तर ते देशाच्याही करमणुकीचा विषय होणार आहे. पाकिस्तान सरळ युद्ध करीत नाही. तो आपल्या घुसखोर टोळ्या भारतात घुसवितो व त्यांना शस्त्रबळ पुरवितो. जम्मू आणि काश्मिरात त्यास मदत करणाºया फुटीरतावादी टोळ्याही आहेत. त्यातून काश्मीरचे सरकार व त्या राज्यातील सगळे प्रमुख पक्ष पाकिस्तानशी समोरासमोरची बोलणी करण्याची मागणी करीत आहे. पाकिस्तानला चीनची छुपी मदत व उघड म्हणावे असे आर्थिक साहाय्य आहे. ही स्थिती गुंतागुंतीची आहे. ती घाईघाईची नसून राजनयाने वाटचाल करण्याची गरज सांगणारी आहे. मात्र भारताने अशी बोलणी आता बंद केली आहेत आणि त्यामुळे चर्चेचे मार्ग संपले आहेत. घुसखोरांच्या कारवाया थांबत नाहीत आणि फुटीरतावाद्यांचे उपद्व्यापही तसेच राहिले आहेत. ही स्थिती फार काळ चालणे काश्मिरी जनतेचा सुरक्षावरील विश्वास उडविणारी आणि आपल्या लष्करी बळाविषयी तिच्या मनात संशय उत्पन्न करणारी आहे. विपीन रावत दिल्लीत असताना धमक्या देतात आणि श्रीनगरला गेले की तेथेही तीच भाषा बोलतात. त्यांच्या व सरकारच्या अडचणी साºयांना समजणाºया आहेत. ७० वर्षांएवढा जुना प्रश्न एका कारवाईने सुटेल असे नाही आणि भारतासारखेच पाकिस्तान आता अण्वस्त्रधारी बनलेले राष्ट्र आहे. पण त्यांच्यापुढे गुरकावण्याची भाषा हे या स्थितीवरचे उत्तर ठरू शकत नाही. राजकीय वाटाघाटी, प्रश्नाबाबतचा खुलेपणा आणि त्यामागे लष्कराच्या बळाचे उभे असणे हा या स्थितीवरचा तोडगा काढण्याचा बहुमुखी मार्ग आहे. पाकिस्तान हा देश काश्मीरवर त्याचा हक्क सांगणारा आहे आणि ते राज्य हा भारताचा अविभाज्य भाग असल्याची आपली भूमिका आहे. या परस्परविरोधी भूमिकांवरचा तोडगा लष्करी असणार नाही. तो राजकीयच असावा लागेल. असा तोडगा काढणे हे रावतांचे काम नाही. ते मोदींचे व सरकारचे उत्तरदायित्व आहे. किमान पाकिस्तानच्या राजकीय नेतृत्वाशी अनौपचारिक संबंध राखू शकणारे सध्याचे राजकारण ते उत्तरदायित्व पार पाडू शकणारेही आहे. सबब लष्कराने बोलू नये. ती सरकारची जबाबदारी आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरPakistanपाकिस्तान