शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
3
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
4
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
5
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
6
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
7
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
8
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
9
मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!
10
शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, ५६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; Infosys मध्ये घसरण, 'या' शेअर्समध्ये तेजी
11
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
12
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा
13
मुंबईत १६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड, गुन्हा दाखल
14
Swami Samartha: राग, चिडचिड, नैराश्य घालवण्याचा रामबाण उपाय म्हणजे 'हा' स्वामी संदेश!
15
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
16
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
17
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
18
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
19
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
20
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप

बंडखोर सारस्वत - गिरीश कर्नाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2019 03:19 IST

पुण्या-मुंबईत शिक्षण होऊनही गिरीश कर्नाड यांचे प्रमुख लिखाण कन्नड भाषेतून राहिले

पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड दिल्यानंतर त्याची कशी उत्कृष्ट नवनिर्मिती होऊ शकते याचा प्रत्यय गिरीश कर्नाड यांच्या साहित्याने साऱ्या देशाला दिला आहे. दिग्दर्शन असो, अभिनय, नाटक, लेखन अशा विविध क्षेत्रांत मनमुराद आणि बुद्धिनिष्ठ मुशाफिरी करणाºया गिरीश कर्नाड यांच्या निधनाने भारतीय साहित्य आणि कलेचा एक तारा निखळला आहे. गेली ५० वर्षे भारतीय रंगभूमीच्या केंद्रस्थानी असलेले गिरीश कर्नाड यांच्या निधनाने मराठीतील सजग कलाप्रेमीही हळहळले. केवळ भाषेपुरते नव्हे, त्यांचे एकूण साहित्यातील योगदान मराठी साहित्यिकांना नेहमीच प्रेरणादायी ठरले आहे.

पुण्या-मुंबईत शिक्षण होऊनही गिरीश कर्नाड यांचे प्रमुख लिखाण कन्नड भाषेतून राहिले आणि इंग्रजी भाषांतरामुळे ते जगभर गाजले. कर्नाड यांना उत्तम मराठी येत होते. नगरच्या साहित्य संमेलनातील त्यांचे भाषण आजही कित्येकांच्या स्मरणात आहे. पौराणिक संदर्भ घेत त्यांनी समकालीन नाट्यलेखन केले. परंपरेशी जखडलेल्या विचारांची साखळी त्यांनी नाटकातून तोडली. विशेषत: त्यांनी उभी केलेली आधुनिक स्त्री पात्रे त्यांच्या बंडखोर विचारांची साक्ष देत होती. नागमंडल, हयवदन, ययाती अशा विविध नाटकांतून त्यांनी उभी केलेली पात्रे कालानुरूप असली तरी काळाच्या पुढचा विचार मांडणारी, पारंपरिकतेची चौकट मोडणारी, विचारांच्या मूळ गाभ्याला आव्हान देणारी, अस्वस्थ करणारी अशीच त्यांची मांडणी होती. बदललेल्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक घटनांची नोंद घेत त्यांचे नाटक पुढे सरकत असे. त्यांच्या तुघलक, तलेदंड, टिपू सुलतान या नाटकांतून त्यांनी पौराणिक व ऐतिहासिक पात्रांना उभे केले आणि समकालीन बदलांचा विचार मांडला. विशेषत: ७० च्या दशकात भारतीय कलेने कात टाकायला सुरुवात केली होती त्याचे पडसाद कर्नाड यांच्या लेखनातून स्पष्ट दिसतात. कर्नाड यांनी विचारपूर्वक नाटकामध्ये नवीन फॉर्म्स आणले. ती मांडणी रंगभूमीला नवी दिशा देणारी ठरली.

पारंपरिकतेची चौकट मोडणारी विचारसरणी असल्याने ते नेहमीच वादाच्या केंद्रस्थानी राहिले. त्यांचा नवा विचार समजावून न घेता त्यांना अनेकदा टीकेचे लक्ष्य केले गेले. तरीही गिरीश कर्नाड कुठेही अस्वस्थ झाले नाहीत. त्यांनी अतिशय संयमितपणे स्थिती हाताळत आरोपांना उत्तर दिले. त्यांना अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्याही आल्या. परंतु लोकशाहीत विचारांना विचारांनीच उत्तर द्यायला हवे या भूमिकेवर ते शेवटपर्यंत ठाम राहिले. त्यांच्या भाषणांतून त्यांनी अनेकदा ‘शहरी नक्षलवादा’चा पुरस्कार केला असा त्यांच्यावर आरोप केला गेला. बदलत्या आर्थिक आणि सामाजिक घडीची वैचारिक मांडणी करताना असा वाद उद्भवणे स्वाभाविक होते. परंतु कर्नाड यांनी कधीही कुठल्याही भाषणात अथवा लेखनात हिंसेचे समर्थन केले नाही. नवसमाज रचनेची मांडणी करताना प्रत्येक माणसाचा हक्क त्याला मिळालाच पाहिजे यावर ते ठाम असायचे. तरीही ते कडव्या हिंदुत्ववाद्यांच्या ‘हिट लिस्ट’वर राहिले. विशेषत: गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर त्यांचा धोका वाढला होता. सुरक्षा यंत्रणांनी तसा अहवालही दिला होता. परंतु कर्नाड कुठेही विचलित झाले नाहीत. कडव्या धार्मिक ताठरतेच्या विरोधात ठाम भूमिका मांडत राहिले. २०१४ मध्येही पंतप्रधान मोदींच्या विरोधात त्यांनी भूमिका घेतली. त्यांच्यावर टीका करणाऱ्यांची त्यांनी कधीही फिकीर केली नाही. नवा बंधमुक्त विचारच नवी शाश्वत वैचारिक बैठक निर्माण करू शकतो, यावर त्यांचा ठाम विश्वास होता. म्हणूनच विविध क्षेत्रांतील इतके सर्वोच्च पुरस्कार मिळूनही मूळ विचारांची नाळ तुटू न देता ते नवी मांडणी करीत राहिले. आयुष्यभर विचारांचा संघर्ष वाट्याला आला तरी कुठेही न डगमगता नाटक, अभिनय, दिग्दर्शन, लेखन क्षेत्रात मनमुराद मुशाफिरी केली. प्रतिभेचा अलौकिक स्पर्श असल्यामुळेच त्यांच्या हातून उत्कृष्ट निर्मिती होत गेली. ही निर्मितीच आता एक अमीट इतिहास बनून राहणार, यात शंका नाही.

मराठी नाटकाचा इतिहास विजय तेंडुलकर यांच्याशिवाय पूर्ण होणार नाही; तसेच गिरीश कर्नाड यांचे नाव कर्नाटक रंगभूमीवर सुवर्णाक्षराने कोरून ठेवले जाईल. इतकी दर्जेदार निर्मिती त्यांनी करून ठेवली आहे.

टॅग्स :Girish Karnadगिरिश कर्नाडMarathi Natya Sammelanमराठी नाट्य संमेलनKarnatakकर्नाटक