शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

वावदूक विधाने करण्यापेक्षा विराटने बोलावे फक्त ‘बॅट’ने!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2019 03:19 IST

विराट कोहलीचा समावेश सध्या जगातल्या सर्वोत्तम तीन फलंदाजांमध्ये होतो. जगभरच्या मैदानांवर आणि क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये गेली काही वर्षे विराट ज्या सातत्याने धावा करतोय, ते पाहता सर्वाधिक शतके, सर्वाधिक धावा वगैरे अनेक विक्रम तो लीलया मागे टाकेल यात शंका नाही.

- सुकृत करंदीकर (सहसंपादक, लोकमत, पुणे) विराट कोहलीचा समावेश सध्या जगातल्या सर्वोत्तम तीन फलंदाजांमध्ये होतो. जगभरच्या मैदानांवर आणि क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये गेली काही वर्षे विराट ज्या सातत्याने धावा करतोय, ते पाहता सर्वाधिक शतके, सर्वाधिक धावा वगैरे अनेक विक्रम तो लीलया मागे टाकेल यात शंका नाही. केवळ फलंदाज म्हणूनच नव्हे, तर चपळ क्षेत्ररक्षक म्हणूनही विराटची कामगिरी चमकदार आहे. कर्णधारपदाची जबाबदारी आल्यानंतरही त्याच्या ओझ्याखाली विराट नावाचे ‘रन मशिन’ मंदावले नाही. सचिन तेंडुलकरला हे जमले नव्हते. कर्णधारपदाच्या ताणामुळे फलंदाजीचा बहर ओसरू लागल्याने सचिनला हे पद सोडून देण्याचा निर्णय घ्यावा लागला होता. विराट हा विजिगिषू वृत्तीचा, प्रचंड कष्टाळू आणि कमालीचा शिस्तबद्ध खेळाडू आहे. प्रत्येक सामन्यात भारत जिंकलाच पाहिजे, ही स्वत:मध्ये असणारी आग-ईर्ष्या संघातल्या प्रत्येक खेळाडूमध्ये रुजविण्याचा प्रयत्न विराट करतो. याचा परिणाम म्हणूनच विराटकडे कर्णधारपद आल्यापासून भारत तिन्ही क्रिकेट प्रकारांमध्ये सातत्याने जिंकतो आहे. कर्णधार आणि फलंदाज म्हणून विराटचा प्रवास सार्वकालिकश्रेष्ठांच्या मांदियाळीत विराजमान होण्याकडे चालू आहे.विराटचे हे थोरपण मान्य केल्यानंतर मात्र, त्याने नुकत्याच उधळलेल्या मुक्ताफळांचा समाचार घेणे भाग आहे. विराटच्या संघाने बांगलादेशविरुद्धची कसोटी क्रिकेट मालिका २-० ने खिशात घातली. एवढेच नव्हे, तर सलग चार कसोटी सामने एका डावाने जिंकण्याचा विश्वविक्रमही नोंदविला. त्यानंतर विराटने दावा केला की, माजी कर्णधार सौरव गांगुलीने भारतीय क्रिकेटमध्ये ‘विनिंग कल्चर’ रुजविले. गांगुलीच्या कोलकात्यात बोलत असल्याने विराट असे म्हणाला का? भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा अध्यक्ष असलेल्या गांगुलीच्या मर्जीत राहण्यासाठी विराट असे बोलला का? की केवळ भारतीय क्रिकेटच्या उज्ज्वल इतिहासाबद्दल घोर अज्ञान असल्याने विराट असे बोलून गेला? यातली तिसरी शक्यता सर्वाधिक आहे. अन्यथा विराटकडून एवढा ‘खराब फटका’ खेळला गेला नसता.सौरव गांगुलीच्या संघाने भारतीय क्रिकेटला चांगले दिवस दाखविले हे खरे आहे. आॅस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड या कठीण मानल्या जाणाऱ्या देशांमध्ये गांगुलीच्या संघाने अनेक अविश्वसनीय विजय मिळविले. सन २००३ मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारत पोहोचला, हा कर्णधार म्हणून गांगुलीच्या कारकिर्दीतला सर्वोच्च क्षण होता. सचिन, द्रविड, लक्ष्मण. वीरेंद्र सेहवाग, कुंबळे, युवराज, झहीर, हरभजन अशा दर्जेदार खेळाडूंच्या सोबतीने गांगुलीने भारतीय क्रिकेटला शिखरावर नेले, पण ती सुुरुवात मात्र नक्कीच नव्हती. गांगुलीसारखे जिगरबाज कर्णधार आणि गांगुलीच्या संघाइतकेच विजयाची भूक ठेवणारे संघ भारतीय क्रिकेटने त्याच्याही आधी पाहिले.१९८३चा एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप जिंकून देणारा कपिल देवचा संघ आताच्या विराट कोहलीच्या किंवा दीड दशकापूर्वीच्या गांगुलीच्या संघाच्या तुलनेत कोणत्याच बाबतीत कमी नव्हता. अजित वाडेकरांच्या संघाने वेस्ट इंडिजमध्ये जाऊन जिंकलेली कसोटी मालिका हा भारतीय क्रिकेटने कूस बदलण्याची सुरुवात ठरली. अगदीच तुलना करायची, तर विराट सध्या मिळवित असलेल्या यशापेक्षा साठ-सत्तरच्या दशकातले विजय अधिक महत्त्वाचे होते. त्याचे साधे कारण म्हणजे त्यावेळच्या गोलंदाजांचा दर्जा आणि आताच्या तुलनेत फलंदाजांना मिळणारे कमी संरक्षण याचा विचार केला, तर साठ-सत्तरच्या दशकातले विदेशातले भारताचे विजय जास्त अवघड आणि म्हणूनच जास्त महत्त्वाचे होते. सुनील गावस्कर, गुंडप्पा विश्वनाथ, दिलीप वेंगसरकर, कपिल देव, इरापल्ली प्रसन्ना, बिशनसिंग बेदी यासारख्या अनेकांच्या व्यक्तिगत कामगिरीचा ठसा देश-विदेशात उमटला होता. किंबहुना, सुनील गावस्करांची बॅट तळपली म्हणूनच सचिन तेंडुलकर उदयाला आला. सचिन मैदान गाजवत राहिला, त्यातूनच सेहवाग-रोहित-विराट अशा पुढच्या पिढ्या येत राहिल्या. कपिल देवची जिगरी गोलंदाजी पाहूनच भारतीय गोलंदाजांच्या पुढच्या पिढ्या घडल्या. मागच्या पिढीच्या कर्तृत्वाचा आदर्श घेतच पुढची पिढी त्यापुढचे पाऊल टाकत असते. अजित वाडेकर, कपिल देव, मोहम्मद अझरुद्दीन, सौरव गांगुली, महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली ही विजयी कर्णधारांची वाटचाल त्यांच्या पूर्वासुरींच्या पायावर उभी आहे. वर्तमान गाजविणाºया विराटने इतिहासाचे भान ठेवले नाही, तरी चालेल; पण त्याने मग वावदूक विधाने करण्याऐवजी फक्त ‘बॅट’नेच बोलत राहावे.

टॅग्स :Virat Kohliविराट कोहलीIndian Cricket Teamभारतीय क्रिकेट संघ