शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

राजगृह : मानव कल्याणाच्या ज्ञानकेंद्राची धगधगती मशाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 4:25 AM

अंगबळापेक्षा ज्ञानबळ असणे महत्त्वाचे आहे, हे बाबासाहेबांनी ओळखले होते. जगातल्या कोणत्याही ग्रंथालयाच्या तोडीचे ग्रंथालय आपल्या संग्रही पाहिजे, असे त्यांना वाटत असे.

- धनाजी कांबळे । वरिष्ठ उपसंपादक, लोकमतराजगृह वास्तू नव्हे, ऐतिहासिक ठेवा आहे. कोट्यवधी भारतीयांच्या काळजावर कोरून ठेवलेला राजमुकुट आहे. अंधाऱ्या वस्तीत उजेड पेरणा-या मानव कल्याणाची प्रकाशज्योत इथेच निर्माण झाली आणि हजारो वर्षांपासूनच्या गुलामगिरीला सुरुंग लावला गेला. महामानव प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर राऊंड टेबल कॉन्फरन्सच्या तिसºया अधिवेशनातील ऐतिहासिक कामगिरी बजावून भारतात आले. मुंबईत आल्यावर परळ येथील पोयबावाडीच्या सिमेंटच्या चाळीत ते राहत. तब्बल २५ वर्षे ते या चाळीत राहत होते.अंगबळापेक्षा ज्ञानबळ असणे महत्त्वाचे आहे, हे बाबासाहेबांनी ओळखले होते. जगातल्या कोणत्याही ग्रंथालयाच्या तोडीचे ग्रंथालय आपल्या संग्रही पाहिजे, असे त्यांना वाटत असे. ज्ञानाची मक्तेदारी एका वर्गाकडे असताना बाबासाहेबांनी ज्ञानाच्या लढाईतील एखाद्या किल्ल्याप्रमाणे राजगृह उभे केले. त्यासाठी त्यांनी बँकेचे कर्ज काढले. जानेवारी १९३४ मध्ये काम पूर्ण झाले. बाबासाहेबांनी दामोदर हॉलमधून आपले ग्रंथालय राजगृहात हलवले आणि सहकुटुंब ते इथे राहण्यासाठी आले.

बाबासाहेबांच्या जीवनात राजगृहाचे स्थान अनन्यसाधारण आहे. अर्थशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, धर्म, कायदा, संरक्षण, राज्यशास्त्र, चरित्रे, आत्मचरित्रे, परदेश नीती, बालशास्त्र, भूगोल, तत्त्वज्ञान, युद्ध, राज्यघटना, चलन, मानववंशशास्त्र असे वेगवेगळे विभाग करून राजगृहात पुस्तकांची मांडणी केली होती. कोणीही विद्वान, गर्भश्रीमंत, भांडवलदार एवढेच काय एखादा राज्यकर्ता, बादशहादेखील थक्क होईल, एवढी हजारो पुस्तके बाबासाहेबांच्या ग्रंथालयात होती. पंडित मदनमोहन मालवीय यांनी हे ग्रंथालय पाहिल्यानंतर कित्येक लाख रुपयांना त्यांनी विकत मागितले. परंतु, बाबासाहेबांनी नकार दिला. बाबासाहेब म्हणाले, ‘तुम्ही तर माझी शक्तीच विकत घ्यावयास मागता, ती मी कशी देईन?’ या प्रसंगावरून बाबासाहेब आणि राजगृहातील ग्रंथालयाचे नाते स्पष्ट होते. गौतम बुद्धांच्या जीवनातील एक महत्त्वाचे धम्मस्थळ म्हणजे राजगृह. या स्थळातून व या नावातून बाबासाहेबांना धम्म इतिहासाची स्फूर्ती मिळत होती, त्यामुळे त्यांनी राजगृह हे नाव निवडले, असे बी. सी. कांबळे यांनी समग्र आंबेडकर चरित्रात लिहिले आहे.

बाबासाहेबांनी आपल्या ग्रंथालयास एखाद्या पॉवर हाऊसचे स्वरूप दिले होते. जगातील अस्सल ज्ञानभांडार त्यांनी राजगृहात मोठ्या काळजीने संग्रहित केले. चैैत्यभूमीवर आलेले अनुयायी दरवर्षी राजगृहालाही भेट देतात. बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या वास्तूचे दर्शन घेतात. याच राजगृहासमोर कुणा माथेफिरूने तोडफोड केली. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्यासाठी अस्मितेच्या प्रतिकांवर हल्ला केला जातो. किंबहुना राजकीय स्वार्थासाठी समाजात तेढ निर्माण केली जाते. अशावेळी आंबेडकर कुटुंबीयांनी दाखवलेला संयम आणि घेतलेली संयत भूमिका महत्त्वपूर्ण म्हणायला हवी. कुणाच्याही सत्ताकांक्षेसाठी बहुजन समाजाने बळी का जायचे? या दूरदृष्टीने घेतलेला निर्णय साकल्याचा ठरला आहे. या दरम्यान समाजमाध्यमांवर दोन प्रवाह दिसले. ज्यात सरकारी मालमत्तेचा मुद्दा होता. मुळात आतापर्यंत जे लोक वारसाहक्काने हजारो एकर शेती, धनदौलत, संपत्ती स्वत:कडे घेऊन बसले आहेत, त्यांच्या मालमत्तांचा प्रश्न याआधी कुणी उपस्थित केल्याचे वाचनात आले नाही. बाबासाहेबांनी जी हजारो पुस्तके संग्रही ठेवली, त्यांचे डिजिटालायजेशन करणे, पुस्तकांचे जतन करणे याबद्दल कुणी काही केल्याचेही दिसले नाही. स्वत:चे झाकून ठेवून दुसºयाकडे बोट दाखवणाºया काही प्रवृत्ती या निमित्ताने उजेडात आल्या.

राजगृह तत्त्वज्ञानगृह आहे. त्याची जपणूक करण्याची जबाबदारी जशी कुटुंबीयांची, समाजाची आहे, तशीच ती सरकारचीदेखील आहे. मानवी जीवनाच्या व्यवस्थांतराची धगधगती प्रयोगशाळा म्हणजे राजगृह...इतर सत्ता येतात आणि जातात, पण ग्रंथसत्तेचा सूर्य उगवतो आणि कधीच अस्ताला जात नाही. उजेडाची क्षितिजे निर्माण करणाºया जगातल्या सर्वच ग्रंथांचे संघटित निवासस्थान म्हणजे राजगृह...असे प्रसिद्ध कवी यशवंत मनोहर म्हणतात. यातून या दुष्ट प्रवृत्तींनी बोध घ्यावा. राजगृहातील पुस्तके ही भारतीय समाजाची मिळकत आहे. प्रत्येकाने हा वारसा जतन केला पाहिजे. जमलं तर स्वत:च्या आयुष्यात वृद्धिंगत केला पाहिजे. नालंदा, तक्षशिलाप्रमाणे हा अमूल्य ठेवा भारतीय संस्कृतीची ओळख आहे. विचारांची लढाई विचारांनी लढता येत नाही, तेव्हा प्रतिकांवर हल्ले केले जातात. मात्र, कुणी कितीही हल्ला केला तरी भीमाचा किल्ला आजही मजबूत आहे आणि उद्याही राहील...

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर