शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
4
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
6
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
7
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
9
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
10
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
12
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
13
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
14
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
15
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
16
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
17
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
19
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
20
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान

चित्रपटसृष्टीतील राजबिंडा आणि दिलदार ‘देवमाणूस’! अशोक सराफ यांंच्या लेखणीतून...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2022 10:09 IST

रमेश देव यांनी अनेक स्थित्यंतरे पाहिली. शून्यातून विश्व उभे केले आणि शेवटपर्यंत टिकवून ठेवले. अनेकांना मोठे केले; पण त्यांच्यातला देवमाणूस कधी हरवला नाही.

अशोक सराफ

रमेश देव ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्तिमत्त्व होते. रमेशजींच्या जाण्यामुळे चित्रपट आणि रंगभूमीचे खूप मोठे नुकसान झाले आहे. नव्या आणि जुन्या अनेक कलाकरांसाठी ते खरोखरच ईश्वराचं रूप होते. त्यांच्या विद्यापीठातूनच या कलावंतांनी अभिनयाचा श्रीगणेशा केला. सहकलाकारालाही अनेक गोष्टी ते शिकवत,  प्रेमानं समजावून सांगत. त्यात आपलेपणाचा भाव खूपच मोठा होता. इतक्या कलाकारांना त्यांनी मदत केली, पण त्याचा कुठलाही गर्व किंवा मीपणा त्यांच्यात नव्हता. अखरेच्या क्षणापर्यंत तर ते कार्यरत होतेच, पण आपल्या आयुष्यात त्यांनी कधी कोणाला दुखावले असेल असे मला वाटत नाही. अभिनयात ते बाप होते, यात दुमत नाही. हिंदी चित्रपटात ते रमले; पण मराठी चित्रपटसृष्टीही त्यांनी अतिशय गाजवली. माझी आणि त्यांची चांगली मैत्री होती असे म्हणण्यापेक्षा ते मला आपला धाकटा भाऊच मानत. आम्ही मराठीत अनेक सिनेमे एकत्र केले आहेत. परंतु चित्रपटसृष्टीत माझ्या करिअरची सुरुवातच त्यांच्यासोबत झाली आहे. त्यांच्या शेवटच्या सिनेमातही मी त्यांच्यासोबत काम केले आहे. ‘दरियाला आयलंय तुफान भारी’ हा खरं तर माझा चित्रित झालेला पहिला सिनेमा होता. या सिनेमाचे ते हिरो होते. माझा पहिला शॉटही त्यांच्याबरोबरच होता. माझा सिनेमातील पहिला शब्द मी त्यांच्यासोबतच उच्चारला होता. हा सिनेमा रखडला म्हणून उशिरा रिलीज झाला. त्यांचा शेवटचा सिनेमा होता ‘जीवनसंध्या’. त्यातही मी त्यांच्यासोबत होतो. त्यानंतर त्यांनी चित्रपटात काम करणं बंद केलं होतं. या सिनेमात सीमाताईही होत्या.

रमेश देव अभिनयात जसे उत्तम, तसेच स्वभावानेही अतिशय दिलदार, मनमिळावू. जाहिराती आणण्यासाठी आम्हाला त्यांचा पुष्कळ फायदा व्हायचा. ते नेहमीच माझ्या कामाची प्रशंसा करायचे. मला बरेचदा सल्ला द्यायचे की खूप धावपळ करू नकोस, शांतपणे काम कर. तुला जमेल तसं काम कर, अंगाबाहेर घेऊन काम करू नकोस. प्रकृती जप.. संपूर्ण कुटुंबच अतिशय सज्जन आणि प्रत्येकाला जीव लावणारं. सीमाताई तर माझी माेठी बहीणच होती. अजिंक्यनेही माझ्याबरोबर खूप कामं केली आहेत.  रमेश भय्या म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील राजबिंडा आणि देखणा नायक होता. त्यांचं रुबाबदार आणि चिरतरुण व्यक्तिमत्त्व पडद्यावर अतिशय शोभून दिसायचं. अनेक भूमिका त्यांनी अक्षरश: जिवंत केल्या. त्यांच्या अस्सल भूमिकांची यादी तरी किती करावी?.. प्रत्येक भूमिकेच्या ते आत शिरत आणि समरसून ती भूमिका करीत. त्यांची भूमिका पाहाताना त्यात ‘रमेश देव’ नव्हे, तर ती व्यक्तिरेखा दिसायची. अतिशय दिलदार असा माणूस आपण आता गमावून बसलो आहोत. 

मोठा असल्याचा टेंभा या माणसाने कधीही मिरवला नाही. देखणं रूप आणि उत्साह त्यांच्यात पुरेपूर भरलेला असायचा. त्यांचे पडद्यावरील आणि प्रत्यक्षातील दर्शनही नेहमीच साजरं असायचं. खलनायक म्हणूनही अनेक भूमिकांचं त्यांनी सोनं केलं. ते आपला संवाद जरी सहज म्हणतात असे वाटले तरी त्यातही त्यांची खास शैली होती. त्यांच्यासाठी वय म्हणजे केवळ एक आकडा होता. ते हजरजबाबी तर होतेच; पण त्यांची विनोदाची जाणही अतिशय उत्तम होती. त्यांनी अनेक स्थित्यंतरे पाहिली.. शून्यातून विश्व उभे केले आणि शेवटपर्यंत टिकवून ठेवले. हाती काही नसताना त्यांनी सुरुवात केली आणि कुठल्या कुठे पोहोचले. अडचणी सगळ्यांनाच येतात, त्यांनाही आल्या, पण त्याचा बाऊ न करता आपली वाटचाल ते चालत राहिले. असा देवमाणूस पुन्हा होणे नाही..(शब्दांकन : संदीप आडनाईक)

टॅग्स :Ramesh Devरमेश देवAshok Sarafअशोक सराफcinemaसिनेमाbollywoodबॉलिवूड