शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

भारत जोडोचे राजकारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2022 12:16 IST

रोज एकेक नेता सोडून जात असल्याने रोज आणखी दुबळा बनत चाललेला काँग्रेस पक्ष भारत जोडो यात्रेच्या रूपाने देशव्यापी मुद्दा घेऊन मैदानात उतरत असेल आणि राजकारणात अजिबात सातत्य नसलेले राहुल गांधी सलग पाच महिने पायी चालणार असतील तर त्यात त्यांचा व पक्षाचाच खरा कस लागणार आहे. ही कसोटी ते कसे पार करतात, हे पाहावे लागेल.

देशभरातील धार्मिक द्वेष, दंगलींमुळे उद्विग्न झालेले दिवंगत समाजसेवक बाबा आमटे यांनी राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत भारत जोडो नावाने काढलेल्या यात्रेला आता साडेतीन दशकांहून अधिक काळ उलटला आहे. बाबांनी तशा दोन यात्रा काढल्या. पहिली कन्याकुमारी ते काश्मीर आणि दुसरी सिलचर ते सौराष्ट्र. खंडप्राय भारतातील अनुक्रमे दक्षिण-उत्तर व पूर्व-पश्चिम टोके जोडणाऱ्या या यात्रा. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी कन्याकुमारी येथून नेमक्या याच नावाने सुरू केलेल्या आणि देश जोडण्यासाठी म्हणजेच राष्ट्रीय एकात्मतेच्या हेतूने सुरू केलेल्या यात्रेची मात्र आमटे यांच्या यात्रेशी तुलना करता येणार नाही. स्वत: राहुल गांधींपासून अशोक गेहलोत, पवन खेरा प्रभृती या यात्रेचा राजकारणाशी संबंध नाही असे वारंवार सांगत असल्या तरी वस्तुस्थिती वेगळी आहे. यात्रेच्या तयारीसाठी दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर सामाजिक संस्थांंच्या प्रतिनिधींनीही हे गैरराजकीय आयोजन असल्याचे सांगून सहभागाची घोषणा केली.

खरे तर असा गैरराजकीय पवित्रा घेण्याची काहीही आवश्यकता नाही. सगळ्याच राजकीय पक्षांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. सत्ताधारी भारतीय पक्षाने कालच नवी दिल्लीत त्यासाठी प्रमुख नेत्यांची बैठक घेतली. भाजपचे चाणक्य समजले जाणारे गृहमंत्री अमित शहा सक्रिय झाले आहेत. सोमवारचा त्यांचा मुंबई दौरा केवळ शिवसेनेला दम देण्यासाठी किंवा मुंबई महापालिकेवर सत्ता आणण्याच्या प्रयत्नाचा भाग नव्हता. महाविकास आघाडी नावाचे महाराष्ट्रातील आव्हान मोडीत काढण्याची, ‘मिशन महाराष्ट्र’ची सुरुवात मुंबईतून झाली आहे. बिहारमधील नाट्यमय सत्तांतरानंतर नितीश कुमार बाहेर पडले आहेत. दिल्लीत त्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत. आधी जुन्या जनता दलाचे तुकडे एकत्र करायचे व नंतर देशातील सगळ्या भाजपेतर पक्षांची मोट बांधायची, अशी उघड रणनीती त्यांनी आखली आहे. हे सारे पाहता राहुल गांधी किंवा त्यांचा काँग्रेस पक्ष निवडणुकीची तयारी करीत असेल आणि भारत जोडो यात्रा त्या देशव्यापी तयारीचा भाग असेल तर ते खुलेपणाने मान्य करायला हवे. ताकाला जाऊन भांडे लपविण्याची अजिबात गरज नाही.

हा राजकीय भाग बाजूला ठेवला तरी ज्या मुद्द्यांवर ही यात्रा काढली जात आहे, ते मुद्दे अगदीच कुचकामी, टाकाऊ आहेत, असे नाही. राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष साडेतीन हजार किलोमीटर अंतराची, बारा राज्ये व दोन केंद्रशासित प्रदेशातून जाणारी दीडशे दिवसांची यात्रा काढताेय म्हणजे सारे काही देशात भाजपची सत्ता आल्यानंतरच घडले असेही नाही. देश तोडला जाण्याच्या प्रक्रियेतील त्यांच्याही कृत्यांची खुलेपणाने चर्चा व्हायला हवी. पण, एकंदर चित्र विषण्ण करणारे आहे. ‘ईश्वर, अल्ला तेरो नाम..’ म्हणत संपूर्ण जगाला सन्मती, शांतता व अहिंसेचा संदेश देणाऱ्या महात्मा गांधींच्या या देशात एक प्रचंड अस्वस्थ करणारा धार्मिक व जातीय दुभंग रोज अनुभवास येत आहे. धार्मिक सहिष्णुता हे भारताचे वैशिष्ट्य आपण सारे विसरत चाललो आहोत. परधर्मीयांच्या श्रद्धास्थानांवर, आस्था, पूजापद्धतीवर हल्ला करणे म्हणजेच स्वधर्मसंरक्षण अशी काहीतरी विचित्र व्याख्या बनली आहे. दुर्दैवाने, सगळ्याच धर्मांमधील कट्टरपंथी मंडळी या आगीत तेल ओतण्याचे काम करीत आहेत. बहुसंख्य माध्यमे विवेक विसरली आहेत. धर्मांधतेच्या नावाने सामान्य माणसांचे जगणे संकटात आले आहे. अतिरेक वाढीस लागला आहे. ते आणि आम्ही, ही भाषा धर्माच्या संदर्भाने कधी नव्हे इतकी ऐकू येऊ लागली आहे. त्यात बलवान कधी भरडले जात नाहीत. महिला, मुले, वृद्ध असे दुबळे वर्ग या धर्मांधतेला बळी पडतात.

अशावेळी, शांतता व स्थैर्याशिवाय विकास होत नाही, हे जाणूनदेखील सत्तेवर असलेली मंडळी विद्वेष, विखार पसरविला जात असताना बोलत नाहीत, चुकीच्या गोष्टींना आळा घालण्याचा प्रयत्न करीत नाहीत, ही खंत आहे. त्यामुळेच जगातल्या अन्य देशांना भारताच्या अंतर्गत व्यवहारात डोकावण्याची, टीकेची संधी मिळते. धर्म, संस्कृतीच्या विविधतेतही ऐक्य ही जगभरातील भारताची प्रतिमा डागाळते. या पार्श्वभूमीवर, रोज एकेक नेता सोडून जात असल्याने रोज आणखी दुबळा बनत चाललेला काँग्रेस पक्ष भारत जोडो यात्रेच्या रूपाने देशव्यापी मुद्दा घेऊन मैदानात उतरत असेल आणि राजकारणात अजिबात सातत्य नसलेले राहुल गांधी सलग पाच महिने पायी चालणार असतील तर त्यात त्यांचा व पक्षाचाच खरा कस लागणार आहे. ही कसोटी ते कसे पार करतात, हे पाहावे लागेल.

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस