शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
2
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
3
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
4
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
5
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
6
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
7
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
8
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
9
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
10
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
11
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
12
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
13
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
14
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
15
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
16
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
17
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
18
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
19
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
20
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...

ज्याचे हाती ससा, तो पारधी!

By admin | Updated: January 21, 2015 02:44 IST

सेंजर आॅफ गॉड’ म्हणजे खरा तर देवदूत. त्यानं कसं, समाजात दुही असेल, दुभंग असेल तर तो सांधण्याचा प्रयत्न करायचा. पण इथं.

मेसेंजर आॅफ गॉड’ म्हणजे खरा तर देवदूत. त्यानं कसं, समाजात दुही असेल, दुभंग असेल तर तो सांधण्याचा प्रयत्न करायचा. पण इथं. वेगळाच अनुभव. खरं तर तो वेगळा तरी का म्हणायचा? प्रामुख्याने हरयाणा आणि पंजाब परिसरात ज्याचे अनंत अनुयायी आहेत, त्या डेरा सच्चा सौदा पंथाचे प्रमुख गुरुमीत राम रहीम यांची स्वत:चीच भूमिका असलेल्या आणि त्यांचाच जीवनपट चितारणाऱ्या ‘मेसेंजर आॅफ गॉड’ या सिनेमाने बरेच काही दुभंगून टाकले असले तरी या आधीही या पंथाने समाजात दुभंग निर्माण करण्याचे प्रयत्न केल्याचा अकाली दलाचा आरोप आहे. साहजिकच अकाली आणि डेरा सच्चा यांच्यामधून विस्तवदेखील जात नाही. एकीकडे त्या दोहोतील ही दुही आणि दुसरीकडे विद्यमान सत्ताधारी रालोआला अकालींच्या तुलनेत सच्चा डेराविषयी वाटू लागलेले अधिकचे ममत्व, अशा साऱ्या गलबल्यात आणखी काही दुह्या जन्माला आल्या. त्याची सुरुवात चित्रपट परीक्षण मंडळाने गुरुमीत राम रहीम यांच्या सिनेमाला प्रमाणपत्र नाकारल्यानंतर झाली. मंडळाच्या निर्णयाविरुद्ध सिनेमावाले लवादाकडे गेले. लवादाने सिनेमाच्या बाजूने निवाडा दिला आणि परीक्षण मंडळाच्या अध्यक्ष लीला सॅमसन यांनी सर्वात आधी आणि त्याच्या पाठोपाठ उरलेल्या अकरा सदस्यांनीही मंडळाचे राजीनामे दिले. सॅमसन यांनी थेट सरकारवरच आरोप करताना, सरकारवर हस्तक्षेप करण्याचा ठपका ठेवला. तिसरीकडे काहींनी न्यायालयात धाव घेऊन सदर चित्रपट कायदा आणि सुव्यवस्थेची समस्या निर्माण करू शकतो, असा आक्षेप घेऊन त्याच्या प्रदर्शनावर बंदी लागू करावी, अशी याचना केली. पंजाब सरकारने बंदी अगोदरच लावली होती. पण ती लावताना, केन्द्र सरकारच्या शिफारसीवरून आम्ही कायदा आणि सुव्यवस्था राखली जावी म्हणूनच बंदी लागू केली असल्याचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी जाहीर केले. म्हणजे केन्द्र सरकार या सिनेमाचे पक्षपाती आहे की विरोधी आहे, असा एक वेगळाच दुभंग निर्माण झाला. अर्थात एखाद्या सिनेमाच्या जाहीर प्रदर्शनास चित्रपट परीक्षण मंडळाने संपूर्ण आक्षेप घेणे, काही शर्तींवर प्रदर्शनास अनुमती देणे वा लवादाने जसा आहे तसा सिनेमा मंजूर करणे, हे मेसेंजर आॅफ गॉडच्या बाबतीत पहिल्यांदाच घडले आहे, असे नव्हे. अधूनमधून असे प्रकार होत असतात आणि मुळात चित्रपट असो की नाटक, त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी परीक्षण मंडळाची गरजच काय, असा सनातन प्रश्नदेखील चर्चेस येत असतो. पण ही मंडळे राहत आली आहेत व राहणार आहेत आणि त्यामुळेच लीला सॅमसन व त्यांच्या सहकाऱ्यांनी राजीनामे दिल्याच्या परिणामी सरकारने नवे चित्रपट परीक्षण मंडळ गठित करुनही टाकले आहे. खरे तर सरकारला हे आधीही करता आले असते. कारण सॅमसन यांच्या अध्यक्षतेखालील मंडळाची मुदत अगोदरच संपुष्टात आली होती आणि त्या काळजीवाहू अध्यक्ष म्हणून कार्यरत होत्या. नव्या सरकारचे आणि आपले जमणार नाही, याची तेव्हांही त्यांना कल्पना असणारच. तेव्हां हे काळजीवाहूपण त्यांना नाकारता आले असते. पण तसे झाले नाही. आता त्यांच्या जागी पहलाज निहलानी नावाचे हिन्दी चित्रपट निर्माते नव्या मंडळाचे अध्यक्ष राहणार आहेत. गोविंदा आणि चंकी पांडे या नटांना पहिल्यांदा चित्रपटात झळकविणारे म्हणून निहलानी ओळखले जातात. तेव्हां त्यांची किमान चित्रपट निर्मिती क्षेत्रातील जातकुळी लक्षात यायला हरकत नाही. ‘आँखे’, ‘शोला और शबनम’ आदि चित्रपटांची नावे पाहिल्यानंतर या जातकुळीचा आणखी उलगडा होऊ शकतो. पण म्हणून ते अध्यक्ष झाले असे नव्हे. पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या निवडणूक प्रचारासाठी त्यांनी ‘हर घर मोदी’ ही सहा मिनिटांची फिल्म तयार केली होती व या फिल्मनेच त्यांना फिल्म सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदासाठी लायक बनविले, हे उघड आहे. त्यांच्या जोडीने मंडळात सदस्य म्हणून जे आणखी नऊ लोक नेमले गेले आहेत, त्यांच्यात संघ परिवाराचे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘विवेक’चे संपादक रमेश पतंगे यांचे नाव असून एक मराठी नाव मंडळात आले म्हणून काहींना हर्ष होऊ शकतो. वाणी त्रिपाठी, अशोक पंडित, दूरचित्रवाणीवरील चाणक्य मालिकेचे डॉ.चन्द्रप्रकाश द्विवेदी अशी काही नावे या नवांमध्ये असून त्या प्रत्येकाचा एक तर संघ परिवाराशी वा भाजपाशी संबंध आहे. या संबंधांवरुन आता नव्या चित्रपट परीक्षण मंडळाच्या रचनेवर टीकादेखील होऊ लागली आहे. वस्तुनिष्ठ विचार केला तर, ही टीका अयोग्य वा निराधार ठरविता येणार नाही. पण अशा नेमणुकांच्या बाबतीतला आजवरचा इतिहास बघू जाता, ज्याचे हाती ससा तो पारधी हाच न्याय आजवरच्या सर्व सरकारांनी लावला असल्याचे आढळून येईल. लीला सॅमसन यांच्या बाबतीतही तोच न्याय लावला गेला होता. सरकारी कृपाप्रसाद म्हणजे केवळ मंत्रिपद नसते. विविध मंडळे आणि महामंडळे यांची संचालकपदे हीदेखील कृपाप्रसाद याच श्रेणीत मोडतात. हा प्रसाद मिळावा म्हणूनच मग जो पक्ष सत्तेत येतो, त्याच्याविषयी अचानक अनेकांच्या मनात आपुलकी निर्माण होत असते. जशी ती आता जयाप्रदा या नटीच्या मनातदेखील निर्माण झाली आहे. त्यामुळे मेसेंजर आॅफ गॉडविषयी भले कितीही वादळे निर्माण होऊ देत. पहलाज निहलानी यांच्या दृष्टीने मात्र तो खरोखरीचा देवदूत ठरला आहे.