शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
4
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
5
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
6
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
7
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
8
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
9
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
10
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
11
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
12
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
13
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
14
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
15
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
16
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
17
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
18
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
19
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
20
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण

पंजाब ऑपरेशन : ...म्हणून काँग्रेसनं पंजाबमध्ये केलेली शस्त्रक्रिया गरजेचीच होती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2021 12:41 IST

पंजाबचे सरकार नोकरशाहीकडूनच चालविले जाते अशा तक्रारीही वारंवार आमदारांकडून काँग्रेस श्रेष्ठींकडे गेल्या होत्या. अमरिंदरसिंग असो किंवा अन्य एखादा काँग्रेस नेता असो, हे नेते जेव्हा मुख्यमंत्रीपदी बसतात तेव्हा त्यांना जनतेमध्ये नेमके काय चालले आहे, लोक काय बोलतात हे कळत नाही.

भारतीय जनता पक्षाने आपले मुख्यमंत्री विविध राज्यांमध्ये बदलले. मात्र  ज्यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागले त्यांनी बंडखोरीची भाषा केली नाही. पंजाबमध्ये आता काँग्रेसला कॅप्टन बदलावा लागला. अमरिंदर सिंग यांच्याकडून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा घ्यावा लागला, पण सिंग यांनी मुकाट्याने पद सोडले नाही. त्यांनी अप्रत्यक्षरित्या काँग्रेसविरुद्ध आक्रमक भूमिका घेतलेली आहे. अजून ते थेट काँग्रेसविरुद्ध काही बोललेले नाहीत. पण आपण फार अवमानीत झालोय असे अमरिंदरसिंग यांनी नमूद केले आहे. शिवाय आपल्यासमोर अनेक पर्याय आहेत, योग्यवेळी योग्य पर्याय वापरायचा असतो, पण तूर्त आपण काँग्रेससोबत आहोत, अशा अर्थाचीही विधाने सिंग यांनी केली. देशात अगोदरच गलितगात्र झालेल्या काँग्रेससाठी एवढा इशारा पुरेसा आहे. देशातील काँग्रेसविरोधी शक्तींचे बळ वाढविणारा हा इशारा आहे. अमरिंदरसिंग योग्यवेळ साधून काँग्रेसला पंजाबमध्ये अडचणीत आणू शकतात. यापुढे गोव्यासोबतच पंजाब विधानसभेसाठी निवडणूक होणार आहे. अशावेळी मुख्यमंत्री बदलणे हे काँग्रेसचे पंजाबमधील मोठे ॲापरेशन आहे. काँग्रेसला ही शस्त्रक्रिया करताना देखील भाजपसारखी शांतता पाळता आली नाही किंवा भाजपसारखे कौशल्य दाखविता आले नाही. अर्थात भाजपकडे केंद्रात सत्ता असल्याने त्या पक्षाचे कोणतेच मावळते मुख्यमंत्री भाजपला आव्हान देण्याची भाषा करू शकत नाहीत.

काँग्रेस हा अजूनही देशातील प्रमुख विरोधी पक्ष असला तरी, तो पक्ष असाहाय्य स्थितीत आहे. त्यामुळेच अमरिंदरसिंग हे काँग्रेसला योग्यवेळी योग्य तो धक्का देऊ शकतात. आपल्या अवमानाचा बदला ते घेतील असेच संकेत मिळतात. अमरिंदरसिंग यांना पद सोडावे लागेल याचे संकेत गेले काही महिने मिळतच होते. कारण तेथील काँग्रेसमध्ये प्रचंड वाद सुरू होता. प्रदेश काँग्रेस समिती त्यांच्यासोबत नव्हती, शिवाय आमदारांमध्येही गट निर्माण झाले होते. काँग्रेस पक्षाच्या श्रेष्ठींनी शेवटी आमदारांचे व प्रदेश काँग्रेसचे नेते नवज्योतसिंग सिद्धू आदींचे मत मान्य करून मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घेतला आहे. अमली पदार्थ व्यवहारांपासून पंजाबला मुक्ती देण्याचे आश्वासन देत काँग्रेस पक्ष तिथे सत्तेवर आला होता. २०१७ साली विधानसभा निवडणुकीला सामोरे जात असतानाच तेथील काँग्रेसने पंजाबमधील ड्रग्सच्या व्यवहारांना पूर्णपणे मूठमाती दिली जाईल असे जाहीर केले होते. स्वत: अमरिंदरसिंग यांनी तशी शपथही घेतली होती. मात्र गेल्या चार वर्षांत पंजाबमध्ये ड्रग्सचा राक्षस ते पूर्णपणे नियंत्रणात आणू शकले नाहीत. अमली पदार्थ व्यवहारांमधील अनेक गुन्हेगारांविरुद्ध गुन्हे दाखल करून खटले भरले गेले. पण बडी धेंडे मोकळीच राहिली अशा प्रकारची जनभावना पंजाबमध्ये निर्माण झाली. जनतेमधील हा समज अमरिंदरसिंग दूर करू शकले नाहीत. अमरिंदरसिंग हे हुशार आहेत. ते थेट बोलणारेही आहेत. काँग्रेसची संस्कृती त्यांच्या अंगात भिनलेली आहे. पण त्यांची कार्यपद्धत अनेक आमदारांना मान्य नव्हती. अमरिंदसिंग यांना भेटणे म्हणजे मोठे अग्निदिव्य आहे अशी तक्रार अनेक आमदार करत असत. अमरिंदरसिंग चंदिगढमध्ये सचिवालयात देखील जात नसत. त्यांच्याभोवती त्यांचाच एक कंपू असायचा व त्यामुळे ते आमदारांपासून व जनतेपासून तुटले असल्याची भावना निर्माण झाली होती. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी त्यांचा राजीनामा घेण्यापूर्वी ह्या जनभावनेचाही विचार केला असेल.

पंजाबचे सरकार नोकरशाहीकडूनच चालविले जाते अशा तक्रारीही वारंवार आमदारांकडून काँग्रेस श्रेष्ठींकडे गेल्या होत्या. अमरिंदरसिंग असो किंवा अन्य एखादा काँग्रेस नेता असो, हे नेते जेव्हा मुख्यमंत्रीपदी बसतात तेव्हा त्यांना जनतेमध्ये नेमके काय चालले आहे, लोक काय बोलतात हे कळत नाही. गोव्यासारख्या छोट्या राज्यातही यापूर्वी असे घडलेले आहे. काँग्रेसचे प्रतापसिंग राणे, विल्फ्रेड डिसोझा किंवा भाजपचे लक्ष्मीकांत पार्सेकर हे जेव्हा मुख्यमंत्रीपदी होते तेव्हा त्यांना जनभावना कळत नव्हती. त्यामुळेच या नेत्यांच्या काळात कधी काँग्रेस तर कधी भाजपचा निवडणुकांमध्ये पराभव झाला. काँग्रेसने पंजाबमध्ये जी शस्त्रक्रिया केली आहे, त्याचे फळ काय मिळेल हे तूर्त सांगता येत नाही पण ही शस्त्रक्रिया गरजेची होती. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी अमरिंदरसिंग यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. काँग्रेसची हानी होईल अशा प्रकारचे पाऊल अमरिंदरसिंग यांनी उचलू नये, त्यांनी पक्षहित हेच कायम नजरेसमोर ठेवावे असा उपदेश गेहलोत यांनी केला आहे. अशा प्रकारचे उपदेश करणारे अनेक नेते काँग्रेसमध्ये आहेत, पण जेव्हा स्वत: त्याग करण्याची वेळ येते तेव्हा असे अनेक नेते वेगळा विचार करत असतात हे देखील तेवढेच खरे.

टॅग्स :Punjabपंजाबcongressकाँग्रेसChief Ministerमुख्यमंत्री