शहरं
Join us  
Trending Stories
1
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
2
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
3
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
4
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
5
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
6
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
7
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
8
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
9
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
10
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
11
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
12
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
13
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
14
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
15
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
16
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
17
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
18
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
19
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
20
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 

पुणे तेथे रोजगार उणे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 07:17 IST

पुण्यात येणाऱ्यांच्या प्रमाणात गेल्या काही वर्षांमध्ये घट होऊ लागली आहे

पुण्यात येणाऱ्यांच्या प्रमाणात गेल्या काही वर्षांमध्ये घट होऊ लागली आहे.  स्थलांतरितांचे प्रमाण दोन टक्क्यांनी कमी झाले आहे. भूमिपुत्रांना नोकरी-व्यवसायाच्या संधी मिळू लागल्या म्हणून पुणेकरांनी खूष होण्याचे कारण नाही. तर, एकंदर गेल्या काही वर्षांत पुण्यामध्ये रोजगाराच्या निर्मितीत घट होत आहे. यंदाच्या वर्षी हे प्रमाण ५.७ टक्क्यांनी घटले आहे. २०१५मध्ये तर तब्बल १५ टक्के घट होती, असाही एक अहवाल आला आहे. रोजगारनिर्मिती कमी होण्यामागचे मुख्य कारण कार्यालयांसाठी पुण्यात पुरेशा जागा उपलब्ध होत नाहीत, हे आहे. वास्तविक, मुंबईपाठोपाठ राज्यात पुण्याचा विकास झाला, याचे मुख्य कारण म्हणजे पुण्यातील जागेची उपलब्धता. मुंबईच्या चारही बाजूंना समुद्र असल्याने वाढीला मर्यादा होत्या. त्यामुळेच औद्योगिक पातळीवरही मुंबई-पुणे-नाशिक हा सुवर्णत्रिकोण साकारला. टेल्को, बजाजसारख्या मोठ्या उद्योगांची मुहूर्तमेढ पुण्यात रोवली गेली. त्यापाठोपाठ औद्योगिक वसाहतींच्या म्ध्यमातून उद्योग उभारले जाऊ लागले. गेल्या तीन दशकांत येथे मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे वाढले. चाकण परिसरातील ऑटो उद्योगाच्या वाढीमुळे त्याला भारताचे ‘डेट्रॉईट’ म्हटले जाऊ लागले. शिरूर तालुक्यात रांजणगाव गणपती येथे पंचतारांकित एमआयडीसी आली. हे सगळे होत असताना परिसरातील सर्व कंपन्यांची कार्यालयेही पुण्यामध्ये येणे स्वाभाविक होते. जागतिक पातळीवरील आयटी कंपन्यांनी पुण्याला पसंती दिली. त्यामुळे इन्फोसिस, विप्रो, टीसीएससारख्या कंपन्यांबरोबरच शेकडो आयटी कंपन्या पुण्यात विस्तारल्या. त्यातून सेवाक्षेत्राचीही वाढ झाली. बांधकाम क्षेत्र वाढले. मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधीही उपलब्ध झाल्या. मात्र, या सगळ्या विकासाचा गाभा असणाऱ्या पुणे शहराच्या विकासाला गती मिळाली नाही. सर्वांगीण विकास होऊ शकला नाही. पायाभूत सुविधा आवश्यक प्रमाणात निर्माण झाल्या नाहीत. विकासाची बेटे तयार झाली. एका बाजूला लष्कराचे केंद्र म्हणून हजारो एकर जागा विनावापर राहिली. पुण्याचे एकंदर क्षेत्रफळ पाहिले, तर वाढीला मोठी संधी असतानाही केवळ नागरी सुविधांअभावी अनेक भागांत जाण्यास उद्योग धजावत नाहीत. रिंगरोडसारखे प्रकल्प अनेक वर्षे रखडले असल्याने नवीन विकासठाणी निर्माण होत नाहीत. वाहतूककोंडीच्या चक्रव्यूहाने पुण्याच्या वाढीचा श्वास कोंडला आहे. मेट्रो होईल, आंतरराष्ट्रीय विमानतळ येईल आणि आपोआप विकास होईल, या भरवशावर बसून चालणार नाही, हेच या अहवालांनी दाखवून दिले आहे. पुण्यापुढील सर्व प्रश्नांचा एकात्मिक आढावा घेऊन त्याप्रमाणे नियोजन केले तरच भविष्यातील धोका टळेल; अन्यथा विकासाच्या शिखरावरून पुण्याची वाटचाल 'डाइंग सिटी'कडे होण्यास वेळ लागणार नाही! 

टॅग्स :Puneपुणेjobनोकरी