शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: नगरपरिषदेत चुरशीची लढाई: ठाकरेंच्या शिवसेनेने खाते उघडले, काँग्रेसही आघाडीवर; पहा लेटेस्ट अपडेट
2
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
3
Nagar Parishad Election Result: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
4
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
5
नात्याला काळीमा! विमा पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
6
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
7
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
8
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
9
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
10
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
11
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
12
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
13
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
14
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
15
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
16
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
17
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
18
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
19
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
20
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पुणे तेथे रोजगार उणे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 07:17 IST

पुण्यात येणाऱ्यांच्या प्रमाणात गेल्या काही वर्षांमध्ये घट होऊ लागली आहे

पुण्यात येणाऱ्यांच्या प्रमाणात गेल्या काही वर्षांमध्ये घट होऊ लागली आहे.  स्थलांतरितांचे प्रमाण दोन टक्क्यांनी कमी झाले आहे. भूमिपुत्रांना नोकरी-व्यवसायाच्या संधी मिळू लागल्या म्हणून पुणेकरांनी खूष होण्याचे कारण नाही. तर, एकंदर गेल्या काही वर्षांत पुण्यामध्ये रोजगाराच्या निर्मितीत घट होत आहे. यंदाच्या वर्षी हे प्रमाण ५.७ टक्क्यांनी घटले आहे. २०१५मध्ये तर तब्बल १५ टक्के घट होती, असाही एक अहवाल आला आहे. रोजगारनिर्मिती कमी होण्यामागचे मुख्य कारण कार्यालयांसाठी पुण्यात पुरेशा जागा उपलब्ध होत नाहीत, हे आहे. वास्तविक, मुंबईपाठोपाठ राज्यात पुण्याचा विकास झाला, याचे मुख्य कारण म्हणजे पुण्यातील जागेची उपलब्धता. मुंबईच्या चारही बाजूंना समुद्र असल्याने वाढीला मर्यादा होत्या. त्यामुळेच औद्योगिक पातळीवरही मुंबई-पुणे-नाशिक हा सुवर्णत्रिकोण साकारला. टेल्को, बजाजसारख्या मोठ्या उद्योगांची मुहूर्तमेढ पुण्यात रोवली गेली. त्यापाठोपाठ औद्योगिक वसाहतींच्या म्ध्यमातून उद्योग उभारले जाऊ लागले. गेल्या तीन दशकांत येथे मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे वाढले. चाकण परिसरातील ऑटो उद्योगाच्या वाढीमुळे त्याला भारताचे ‘डेट्रॉईट’ म्हटले जाऊ लागले. शिरूर तालुक्यात रांजणगाव गणपती येथे पंचतारांकित एमआयडीसी आली. हे सगळे होत असताना परिसरातील सर्व कंपन्यांची कार्यालयेही पुण्यामध्ये येणे स्वाभाविक होते. जागतिक पातळीवरील आयटी कंपन्यांनी पुण्याला पसंती दिली. त्यामुळे इन्फोसिस, विप्रो, टीसीएससारख्या कंपन्यांबरोबरच शेकडो आयटी कंपन्या पुण्यात विस्तारल्या. त्यातून सेवाक्षेत्राचीही वाढ झाली. बांधकाम क्षेत्र वाढले. मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधीही उपलब्ध झाल्या. मात्र, या सगळ्या विकासाचा गाभा असणाऱ्या पुणे शहराच्या विकासाला गती मिळाली नाही. सर्वांगीण विकास होऊ शकला नाही. पायाभूत सुविधा आवश्यक प्रमाणात निर्माण झाल्या नाहीत. विकासाची बेटे तयार झाली. एका बाजूला लष्कराचे केंद्र म्हणून हजारो एकर जागा विनावापर राहिली. पुण्याचे एकंदर क्षेत्रफळ पाहिले, तर वाढीला मोठी संधी असतानाही केवळ नागरी सुविधांअभावी अनेक भागांत जाण्यास उद्योग धजावत नाहीत. रिंगरोडसारखे प्रकल्प अनेक वर्षे रखडले असल्याने नवीन विकासठाणी निर्माण होत नाहीत. वाहतूककोंडीच्या चक्रव्यूहाने पुण्याच्या वाढीचा श्वास कोंडला आहे. मेट्रो होईल, आंतरराष्ट्रीय विमानतळ येईल आणि आपोआप विकास होईल, या भरवशावर बसून चालणार नाही, हेच या अहवालांनी दाखवून दिले आहे. पुण्यापुढील सर्व प्रश्नांचा एकात्मिक आढावा घेऊन त्याप्रमाणे नियोजन केले तरच भविष्यातील धोका टळेल; अन्यथा विकासाच्या शिखरावरून पुण्याची वाटचाल 'डाइंग सिटी'कडे होण्यास वेळ लागणार नाही! 

टॅग्स :Puneपुणेjobनोकरी