शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
2
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
3
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
4
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
5
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
6
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
7
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
8
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
9
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
10
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
11
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
12
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
13
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
14
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
15
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
16
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
17
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
19
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
20
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती

लोकसहभागाचा दिशादर्शक उपक्रम

By admin | Updated: August 13, 2016 05:36 IST

जेमतेम करवसुली - शासकीय अनुदानाचे तोकडे आर्थिक उत्पन्न आणि कर्ज परतफेड, कर्मचारी पगार व अग्रक्रमाच्या मूलभूत सुविधांचा ताळमेळ बसविण्यासाठी कसरत करणाऱ्या जळगाव महापालिकेने

- मिलिंद कुलकर्णीजेमतेम करवसुली - शासकीय अनुदानाचे तोकडे आर्थिक उत्पन्न आणि कर्ज परतफेड, कर्मचारी पगार व अग्रक्रमाच्या मूलभूत सुविधांचा ताळमेळ बसविण्यासाठी कसरत करणाऱ्या जळगाव महापालिकेने लोकसहभागातून मेहरूण तलावाचे रूप पालटवले आहे. पण एखादे चांगले काम सुरु झाले की, त्याला विरोध, टीका हे प्रकार याबाबतीतहीे आले. तलाव परिसरातील श्रीमंतांच्या रस्त्यासाठी हा उपक्रम राबविला, चौपाटी बनविताना तलावाची व्याप्ती कमी झाली अशा तक्रारी आल्यास्थानिक स्वराज्य संस्थांना आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत मर्यादित आहेत. करवसुली आणि शासकीय योजनांद्वारे मिळणाऱ्या निधीवर विकास कामे करण्याची मदार असते. पुन्हा या दोन्ही स्त्रोतांकडून १०० टक्के निधी मिळेलच याची शाश्वती नसते.करचोरी, थकबाकीचे प्रमाण मोठे आहे. दर चार वर्षांनी कराचे फेरमूल्यांकन अपेक्षित असताना त्याकडे काणाडोळा केला जातो. प्रशासनाची उदासीनता आणि भ्रष्टाचार यामुळे १०० टक्के करवसुली हे स्वप्न ठरते. शासकीय योजनांचा निधी आणण्यासाठी प्रशासन व पदाधिकाऱ्यांमध्ये एकवाक्यता, पाठपुरावा या बाबी आवश्यक ठरतात. खासदार-आमदार एका पक्षाचे आणि संस्था पदाधिकारी दुसऱ्या पक्षाचे असल्यास राजकारण शिरते. विकास कामांमध्ये आडकाठी येते. त्यावर मात करीत लोक सहभागातून कामे करण्यावर अलीकडे जोर दिला जात आहे.औद्योगिक प्रतिष्ठानांसाठी सामाजिक उत्तरदायित्वासाठी ठरावीक निधी खर्च करण्याचे बंधन येण्यापूर्वी जळगाव शहरात लोक सहभागातून विकास कामे सुरू झाली होती. चौक सुशोभिकरणापासून या उपक्रमाला सुरुवात झाली. अनेक औद्योगिक व व्यापारी प्रतिष्ठानांनी चौक देखणे बनविले. खान्देशातील काव्यपरंपरेचा गौरव करणारा ‘काव्यरत्नावली’ चौक तर कल्पकतेचे अनोखे उदाहरण आहे. भवरलाल जैन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या चौकात साने गुरुजी, बालकवी, बहिणाबाई, कुसुमाग्रज, दु.आ. तिवारी यांच्या प्रसिद्ध कवितांच्या शिळा उभारल्या आहेत. रंगीत कारंजे, हिरवळ आणि हायमास्ट दिवे यामुळे हा चौक जळगावकरांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आणि अबालवृद्धांना दोन घटका करमणूक, गप्पांचा कट्टा बनला आहे. चौकात गाण्याची मैफील, पथनाट्य, पुस्तक प्रकाशन, राष्ट्रीय दिनाचे कार्यक्रम जल्लोषात होतात.महापौर नितीन लढ्ढा यांनी काव्यरत्नावली चौकाप्रमाणे जळगावचा मानबिंदू असलेल्या मेहरूण तलावाच्या खोलीकरण आणि विस्तारीकरणाचा उपक्रम उन्हाळ्यात हाती घेतला. लोक सहभागाचे आवाहन आणि पारदर्शक कामाची ग्वाही देताच औद्योगिक व व्यापारी प्रतिष्ठाने, वित्तीय संस्था, व्यावसायिक संस्था, दानशूर नागरिकांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. लोक सहभागातून चांगले काम होत असल्याचे पाहून जलसंपदामंत्री गिरीश महाजन व जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी मदतीचा हात पुढे केला. कामाचा वेग वाढला आणि पावसाळ्यापूर्वी तलावाचे खोलीकरण व विस्तारीकरण पूर्ण झाले. तलावाच्या गळतीचे मूळ शोधून त्याची दुरुस्ती करण्यात आली. आता सुशोभीकरणाच्या कामाचे नियोजन सुरू झाले आहे. जिल्हा नियोजन मंडळातून निधी मंजूर झाला. अतिक्रमण, सांडपाणी, म्हशी, वाहने आणि धुणी धुण्याचा प्रकार या समस्यांवर मात करायची आहे. वृक्षराजी बऱ्यापैकी आहे. तिचे संवर्धन आणि नवीन लागवड याकडे महापालिका व स्वयंसेवी संस्थांचे लक्ष आहे.एखादे चांगले काम सुरु झाले की, त्याला विरोध, टीका हे प्रकार ओघाने आले. याबाबतीतही ते आलेच. तलाव परिसरातील श्रीमंतांच्या रस्त्यासाठी हा उपक्रम राबविला, चौपाटी बनविताना तलावाची व्याप्ती कमी झाली अशा तक्रारी आल्या. लोक सहभागातून चांगली कामे होऊ लागल्यास शासनदेखील मदतीचा हात पुढे करते, हे मेहरूण तलावाच्या कामातून दिसून आले. सगळीकडे अंधार दाटला असल्याचा कोलाहल सुरू असताना हा प्रयत्न आशेचा दिवा ठरत आहे.