शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

तोगडियांची गच्छंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 00:06 IST

सुब्रमण्यम स्वामींचा नेहरू व गांधी या परंपरेवर आणि तिला आदरस्थानी मानणाऱ्या अटलबिहारी वाजपेयींवर विषाक्त डोळा होता.

प्रवीण तोगडिया आणि सुब्रमण्यम स्वामी ही भारताच्या राजकारणातील कमालीची द्वेषाक्त माणसे आहेत. हे कुणाच्या वा कशाच्या बाजूचे आहेत याहूनही त्यांचा कुणावर आणि कशावर डोळा आहे हे त्यांना समजून घेण्यासाठी जास्तीचे उपयुक्त आहे. सुब्रमण्यम स्वामींचा नेहरू व गांधी या परंपरेवर आणि तिला आदरस्थानी मानणाऱ्या अटलबिहारी वाजपेयींवर विषाक्त डोळा होता. नेहरूंचे घराणे आता सत्तेवर नाही आणि वाजपेयी निवृत्त झाले आहेत. त्यामुळे त्यांनी अरुण जेटली या राजकारणात फारसे अग्रेसर नसलेल्या मंत्र्याला आपल्या टीकेचे लक्ष्य बनविले आहे. ते मोदींवर टीका करीत नाहीत म्हणून भाजप व संघही त्यांच्या टीकाखोरीला महत्त्व देत नाही. तोगडियांचा वार मात्र मोदींवर आहे. गेले काही दिवस मोदी आणि त्यांचे सरकार हिंदूहिताचे काम करीत नाहीत, मंदिराच्या कामात रस घेत नाहीत आणि लोकप्रियतेच्या मागे लागून ‘नको त्यांचा अनुनयच ते अधिक करते’ अशी त्यांची वक्तव्ये प्रकाशित होत राहिली. एक दिवस ते स्वत:च बेपत्ता झाले आणि आपले अपहरण केले गेले असा कांगावा त्यांनी मागाहून केला. त्यांच्या त्या टीकेचा रोख अर्थातच मोदींवर होता. तोगडिया हे बोलण्या-वागण्यातही बरेचसे अद्वातद्वा असलेले गृहस्थ आहे. त्यांचे आकांडतांडव जेव्हा डोक्यावरून जाऊ लागले तेव्हा संघातील मोदींच्या गटाने त्यांच्या मुसक्या आवळण्याचा निर्णय घेतला. ‘संघात व्यक्ती मोठी नसते, तसे होण्याचा प्रयत्न करणाºयांना त्यांची जागा लागलीच दाखविली जाते’ हा संघाचा बराचसा फसवा बोलबाला मग तोगडियांचे पंख कापायला कामी आला. कधी नव्हे ती विश्व हिंदू परिषदेच्या अध्यक्षपदाची त्यासाठी निवडणूक घेतली गेली. तीत तोगडियांनी त्यांच्या कुणा रेड्डी नामे इसमाला आंतरराष्टÑीय अध्यक्षपदासाठी उभे केले तर मोदींच्या संघातील गटाने न्या. कोकजे यांना ती उमेदवारी दिली. कोकजे यांनी रेड्डींना ७१ मतांनी हरविले. परिणामी मोदी विजयी आणि तोगडिया पराभूत झाले. कोणत्याही व्यक्तीला संघटनेहून मोठे होऊ न देण्याचा संघाचा पवित्रा त्यामुळे पुन्हा एकवार अधोरेखित झाला. (मोदींच्या तशा मोठेपणाकडे मग त्या परिवारातील निष्ठावंतांनाही फारसे लक्ष द्यावेसे वाटले नाही) मात्र हा पराभव तोगडियांच्या जिव्हारी लागला. विश्व हिंदू परिषदेसारख्या स्वत:ला धर्मनिष्ठ म्हणविणाºया संघटनेवर बोगस मतदारांच्या नोंदणीचा, मतदानातील लुच्चेगिरीचा व त्यातील राजकीय हस्तक्षेपाचा आरोप आता त्यांनी केला आहे. तेवढ्यावर न थांबता मोदींच्या अहमदाबादेत बेमुदत उपोषण करण्याची घोषणाही त्यांनी केली आहे. पुढे जाऊन विश्व हिंदू परिषदेत फूट पाडण्याचा व आपली वेगळी संघटना उभी करण्याचा इरादाही त्यांनी जाहीर केला आहे. हा तोगडिया यांनी संघाच्या नेतृत्वाला शह देण्याचा चालविलेला प्रकार आहे. संघ त्याच्या नित्याच्या कार्यपद्धतीनुसार तोगडियांना उत्तर देणार नाही. तो प्रथम त्यांच्याकडे दुर्लक्ष करील व नंतर ‘तोगडिया वाया गेले आहेत’ किंवा त्यांचा बोलविता धनी कुणी वेगळाच आहे अशी कानाफुसीही तो त्याच्या शैलीत करू लागेल. स्वयंसेवकांना व विहिंपमधील जुन्या निष्ठावंतांना तो तोगडियांकडे दुर्लक्ष करायला सांगेल आणि एक दिवस तोगडियांचे नाव माध्यमांमधून वगळले जाईल. तोगडिया हे तसेही एक अतिशय उठवळ गृहस्थ आहेत आणि त्यांचा माध्यमांनाही कंटाळा आला आहे. त्यामुळे संघ, विश्व हिंदू परिषद व न्या. कोकजे हे तिथे नवे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष यांचे काम सोपे व सुकरही होईल. त्याहून महत्त्वाची बाब ही की या घटनेमुळे मोदींचा संघ परिवारातील एक टीकाकारही इतिहासजमा होईल. १९९२ मध्ये संघ परिवाराने बाबरी मशिदीचा विध्वंस केला तेव्हापासून या तोगडियांना उत्साहाचे व काहीशा उन्मादाचे भरते आले होते. त्यांची भाषाही साधी न राहता धमकीवजा बनली होती. त्यांचे चाहते त्या भाषेवर प्रसन्न आणि टाळ्या कुटणारे होते. स्वत: तोगडियाही स्वत:वर प्रसन्न होते. आता त्यांची निवृत्तीच नव्हे तर गच्छंतीही झाली आहे आणि संघ परिवाराची एक डोकेदुखीही त्यामुळे कमी झाली आहे. 

टॅग्स :praveen togadiaप्रवीण तोगडियाBJPभाजपा