शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

विकासवाटेवरील वाचाळवीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 05:20 IST

पुढील लोकसभा निवडणुकीला एक वर्षाहून अधिक काळ बाकी आहे. तरीही देशभरातील राजकीय आसमंत मात्र २०१९च्या निवडणुकीत काय होणार, याच प्रश्नाने व्यापून गेले आहे

पुढील लोकसभा निवडणुकीला एक वर्षाहून अधिक काळ बाकी आहे. तरीही देशभरातील राजकीय आसमंत मात्र २०१९च्या निवडणुकीत काय होणार, याच प्रश्नाने व्यापून गेले आहे. मुळात मोदी सत्तारूढ झाले तेंव्हापासूनच या चर्चेला सुरुवात झाली होती. लोकसभेतील दिग्विजयानंतरही मोदी-शहा जोडगोळीच्या विजयरथाचे वारू चौफेर उधळत होते; त्यामुळे २०१९लासुद्धा मोदीच अशी बतावणी खुद्द विरोधी बाकांवरील नेते करीत. गुजरातमधील निवडणुकीत भाजपाची दमछाक उडाली आणि देशातील राजकीय चित्रच बदलून गेले. एकीकडे एकवटणारे विरोधक आणि दुसरीकडे सरकारविरोधी असंतोषाचे सूर यामुळे मोदी-शहा जोडगोळीही सावध झाली आहे. बदलत्या राजकीय समीकरणांचा अंदाज घेत नव्याने डावपेच आखण्याची पंतप्रधानांची मनीषा भाजपा आणि संघ परिवारातील नेत्यांच्या निर्बुद्ध मुक्ताफळांनी उधळली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळेच तोंडाला आवर घाला, माध्यमांना मसाला पुरवू नका, अशी तंबीच मोदींनी दिली. परंतु, चार वर्षे ज्यांनी बेलगामपणे आपल्या जिभेचा दांडपट्टा फिरविला त्यांना अचानक स्वत:ला सावरणे अवघड झाले आहे. या तोंडपाटीलकीला तसेच खास कारण आहे. डायना हेडनपेक्षा ऐश्वर्याचे सौंदर्य जास्त भारतीय आहे, नारदमुनी म्हणजे त्या काळचे गुगल, पुराणातली विमाने, गणपतीची सर्जरी वगैरे भाषा पहिल्यांदाच बोलली गेली असे नाही. इतकी वर्षे उजव्या चळवळीतील मंडळी हीच भाषा बोलत आले आहेत. सत्तेच्या परिघाबाहेर होते तोपर्यंत या गोष्टी लपून राहिल्या. भारतीयत्व, आहार, विहार, भाषा, पेहराव, स्वातंत्र्यलढा अशा अनेक बाबतींत उजव्यांची समज बाळबोध ठरते. वर्षानुवर्षे जो अर्धवट विचार पकडून ठेवला, ज्या भ्रामक समजांवरच विचारविश्व उभारले ते असे लगेच कसे नाकारणार? नारदाला गुगल व महाभारतातील संजयरूपी टीव्हीचा संस्कार कसा पुसायचा? वर्तमानात देशी बनावटीचे एकही विमान बनविणे शक्य नसताना पुराणकाळातील हवाई प्रवासाचा अभिनिवेश कसा टाळायचा? मोदींनी भाजपा नेत्यांना जीभ आवरण्याचा सल्ला दिला तरी तो मानवणार कसा? गायीच्या शेणामुळे किरणोत्सर्ग रोखला जातो म्हणून मोबाइलला कायम शेण लावणारे अखिल भारतीय नेते आजही संघ परिवारात आहेत. नियमित बौद्धिक व चिंतन शिबिरात रमणाऱ्यांची ही अवस्था कशाने झाली, याचा प्रामाणिक खल भाजपा, संघ आणि एकूणच उजव्या चळवळीला करावा लागणार आहे. तोपर्यंत मोदींच्या विकासवाटेवरील वाचाळवीरांचे अडथळे सनातन मानावे लागतील.