शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
4
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
5
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
6
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
7
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
8
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
9
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
10
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
11
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
12
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
13
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
14
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
15
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
16
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
17
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
18
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
19
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
20
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला

विकासवाटेवरील वाचाळवीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 05:20 IST

पुढील लोकसभा निवडणुकीला एक वर्षाहून अधिक काळ बाकी आहे. तरीही देशभरातील राजकीय आसमंत मात्र २०१९च्या निवडणुकीत काय होणार, याच प्रश्नाने व्यापून गेले आहे

पुढील लोकसभा निवडणुकीला एक वर्षाहून अधिक काळ बाकी आहे. तरीही देशभरातील राजकीय आसमंत मात्र २०१९च्या निवडणुकीत काय होणार, याच प्रश्नाने व्यापून गेले आहे. मुळात मोदी सत्तारूढ झाले तेंव्हापासूनच या चर्चेला सुरुवात झाली होती. लोकसभेतील दिग्विजयानंतरही मोदी-शहा जोडगोळीच्या विजयरथाचे वारू चौफेर उधळत होते; त्यामुळे २०१९लासुद्धा मोदीच अशी बतावणी खुद्द विरोधी बाकांवरील नेते करीत. गुजरातमधील निवडणुकीत भाजपाची दमछाक उडाली आणि देशातील राजकीय चित्रच बदलून गेले. एकीकडे एकवटणारे विरोधक आणि दुसरीकडे सरकारविरोधी असंतोषाचे सूर यामुळे मोदी-शहा जोडगोळीही सावध झाली आहे. बदलत्या राजकीय समीकरणांचा अंदाज घेत नव्याने डावपेच आखण्याची पंतप्रधानांची मनीषा भाजपा आणि संघ परिवारातील नेत्यांच्या निर्बुद्ध मुक्ताफळांनी उधळली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळेच तोंडाला आवर घाला, माध्यमांना मसाला पुरवू नका, अशी तंबीच मोदींनी दिली. परंतु, चार वर्षे ज्यांनी बेलगामपणे आपल्या जिभेचा दांडपट्टा फिरविला त्यांना अचानक स्वत:ला सावरणे अवघड झाले आहे. या तोंडपाटीलकीला तसेच खास कारण आहे. डायना हेडनपेक्षा ऐश्वर्याचे सौंदर्य जास्त भारतीय आहे, नारदमुनी म्हणजे त्या काळचे गुगल, पुराणातली विमाने, गणपतीची सर्जरी वगैरे भाषा पहिल्यांदाच बोलली गेली असे नाही. इतकी वर्षे उजव्या चळवळीतील मंडळी हीच भाषा बोलत आले आहेत. सत्तेच्या परिघाबाहेर होते तोपर्यंत या गोष्टी लपून राहिल्या. भारतीयत्व, आहार, विहार, भाषा, पेहराव, स्वातंत्र्यलढा अशा अनेक बाबतींत उजव्यांची समज बाळबोध ठरते. वर्षानुवर्षे जो अर्धवट विचार पकडून ठेवला, ज्या भ्रामक समजांवरच विचारविश्व उभारले ते असे लगेच कसे नाकारणार? नारदाला गुगल व महाभारतातील संजयरूपी टीव्हीचा संस्कार कसा पुसायचा? वर्तमानात देशी बनावटीचे एकही विमान बनविणे शक्य नसताना पुराणकाळातील हवाई प्रवासाचा अभिनिवेश कसा टाळायचा? मोदींनी भाजपा नेत्यांना जीभ आवरण्याचा सल्ला दिला तरी तो मानवणार कसा? गायीच्या शेणामुळे किरणोत्सर्ग रोखला जातो म्हणून मोबाइलला कायम शेण लावणारे अखिल भारतीय नेते आजही संघ परिवारात आहेत. नियमित बौद्धिक व चिंतन शिबिरात रमणाऱ्यांची ही अवस्था कशाने झाली, याचा प्रामाणिक खल भाजपा, संघ आणि एकूणच उजव्या चळवळीला करावा लागणार आहे. तोपर्यंत मोदींच्या विकासवाटेवरील वाचाळवीरांचे अडथळे सनातन मानावे लागतील.