शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

विकासवाटेवरील वाचाळवीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 05:20 IST

पुढील लोकसभा निवडणुकीला एक वर्षाहून अधिक काळ बाकी आहे. तरीही देशभरातील राजकीय आसमंत मात्र २०१९च्या निवडणुकीत काय होणार, याच प्रश्नाने व्यापून गेले आहे

पुढील लोकसभा निवडणुकीला एक वर्षाहून अधिक काळ बाकी आहे. तरीही देशभरातील राजकीय आसमंत मात्र २०१९च्या निवडणुकीत काय होणार, याच प्रश्नाने व्यापून गेले आहे. मुळात मोदी सत्तारूढ झाले तेंव्हापासूनच या चर्चेला सुरुवात झाली होती. लोकसभेतील दिग्विजयानंतरही मोदी-शहा जोडगोळीच्या विजयरथाचे वारू चौफेर उधळत होते; त्यामुळे २०१९लासुद्धा मोदीच अशी बतावणी खुद्द विरोधी बाकांवरील नेते करीत. गुजरातमधील निवडणुकीत भाजपाची दमछाक उडाली आणि देशातील राजकीय चित्रच बदलून गेले. एकीकडे एकवटणारे विरोधक आणि दुसरीकडे सरकारविरोधी असंतोषाचे सूर यामुळे मोदी-शहा जोडगोळीही सावध झाली आहे. बदलत्या राजकीय समीकरणांचा अंदाज घेत नव्याने डावपेच आखण्याची पंतप्रधानांची मनीषा भाजपा आणि संघ परिवारातील नेत्यांच्या निर्बुद्ध मुक्ताफळांनी उधळली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळेच तोंडाला आवर घाला, माध्यमांना मसाला पुरवू नका, अशी तंबीच मोदींनी दिली. परंतु, चार वर्षे ज्यांनी बेलगामपणे आपल्या जिभेचा दांडपट्टा फिरविला त्यांना अचानक स्वत:ला सावरणे अवघड झाले आहे. या तोंडपाटीलकीला तसेच खास कारण आहे. डायना हेडनपेक्षा ऐश्वर्याचे सौंदर्य जास्त भारतीय आहे, नारदमुनी म्हणजे त्या काळचे गुगल, पुराणातली विमाने, गणपतीची सर्जरी वगैरे भाषा पहिल्यांदाच बोलली गेली असे नाही. इतकी वर्षे उजव्या चळवळीतील मंडळी हीच भाषा बोलत आले आहेत. सत्तेच्या परिघाबाहेर होते तोपर्यंत या गोष्टी लपून राहिल्या. भारतीयत्व, आहार, विहार, भाषा, पेहराव, स्वातंत्र्यलढा अशा अनेक बाबतींत उजव्यांची समज बाळबोध ठरते. वर्षानुवर्षे जो अर्धवट विचार पकडून ठेवला, ज्या भ्रामक समजांवरच विचारविश्व उभारले ते असे लगेच कसे नाकारणार? नारदाला गुगल व महाभारतातील संजयरूपी टीव्हीचा संस्कार कसा पुसायचा? वर्तमानात देशी बनावटीचे एकही विमान बनविणे शक्य नसताना पुराणकाळातील हवाई प्रवासाचा अभिनिवेश कसा टाळायचा? मोदींनी भाजपा नेत्यांना जीभ आवरण्याचा सल्ला दिला तरी तो मानवणार कसा? गायीच्या शेणामुळे किरणोत्सर्ग रोखला जातो म्हणून मोबाइलला कायम शेण लावणारे अखिल भारतीय नेते आजही संघ परिवारात आहेत. नियमित बौद्धिक व चिंतन शिबिरात रमणाऱ्यांची ही अवस्था कशाने झाली, याचा प्रामाणिक खल भाजपा, संघ आणि एकूणच उजव्या चळवळीला करावा लागणार आहे. तोपर्यंत मोदींच्या विकासवाटेवरील वाचाळवीरांचे अडथळे सनातन मानावे लागतील.