शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
2
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
3
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
4
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
5
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
6
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
7
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
8
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
9
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
10
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
11
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
12
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
13
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
14
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
15
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
16
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
18
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
19
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
20
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!

रस्त्यात खड्डे? जबाबदार अधिकाऱ्यांची वेतनवाढ रोखा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2022 08:06 IST

‘पावसामुळे डांबरी रस्त्यावर खड्डे पडतात’ ही रस्ते बनवणाऱ्या यंत्रणांनी जाणीवपूर्वक पसरवलेली अंधश्रद्धा आहे. रस्त्यात पैसे मुरतात, त्याचे काय करणार?

- सुधीर लक्ष्मीकांत दाणी, बेलापूर, नवी मुंबई

खड्डेमुक्तीसाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करून २४ तास खड्डे बुजवण्याचे काम करा’ असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे वाचले.  त्यांनी मूळ समस्येला बगल दिली आहे. मुळात प्रश्न हा की, वर्षांनुवर्षे करोडो रुपये खर्च करून रस्ते निर्माण केले जात असताना त्यावर प्रतिवर्षी खड्डे पडतातच कसे ? ‘पावसामुळे डांबरी रस्त्यावर खड्डे पडतात’ ही रस्ते बनवणाऱ्या यंत्रणांनी जाणीवपूर्वक पसरवलेली अंधश्रद्धा आहे. पावसामुळे खड्डे पडतात, हे अर्धसत्य असून रस्ते टेंडर प्रक्रियेपासून ते रस्तेनिर्मिती, देखभालीपर्यंत सर्वव्यापी भ्रष्टाचार दर्जाहीन रस्त्यास कारणीभूत आहे.

पाऊस केवळ भारतातच नाही, अन्य देशांतदेखील पडतो; पण तिथे खड्डे नसतात. कारण ‘रस्ते हे देशाच्या विकासाचे राजमार्ग आहेत,’ अशी त्या देशांची धारणा असते. आपल्याकडे मात्र ‘ऑल रोड्स लीड् टू करप्शन’ अशी अवस्था  असल्याने सर्वत्र दर्जाहीन रस्ते दिसतात.

देशातील सर्वांत श्रीमंत महानगरपालिकेचे अधिकारी सांगतात, मुंबई खड्डेमुक्त करण्यासाठी आम्ही युद्धपातळीवर सिमेंटचे रस्ते ‘बनवण्याचा’ निश्चय केलेला आहे. अहो, भारतात आजवर बनवलेल्या सिमेंटच्या रस्त्यांचा इतिहास एकदा जाणून घ्या.  गृहिणीने आपल्या घरासमोरील रस्ता स्वच्छ असावा म्हणून वर्षभर झाडू मारला तरी सिमेंटचे रस्ते उखडत असतील, तर व्यवस्थेतच दोष आहे हे सिद्ध होत नाही का?

रस्तेनिर्मितीचे देखील ‘इंजिनिअरिंग’ असते, याचाच विसर आपल्या यंत्रणांना पडलेला दिसतो. पाणी साचू नये म्हणून रस्त्याला योग्य उतार, कडेला खोलगट चर असावी. प्रत्यक्षात  पावसाचे पाणी ५०० / १००० मीटर रस्त्यांवरून वाहत असते. स्पीडब्रेकरच्या बाजूने पावसाचे पाणी जाण्यासाठी कुठलीच व्यवस्था न ठेवल्याने स्पीडब्रेकर वाहत्या पाण्याला बांध घालतात. फुटपाथच्या खाली बनवलेल्या नाल्यात रस्त्यावरील पाणी जाण्यासाठी ठेवलेली छिद्रे हे रस्त्यांपेक्षा अधिक उंचीवर असल्याने पाटातून पाणी वाहिल्यासारखे पाणी रस्त्याच्या कडेने वाहत असते. २१ व्या शतकातील स्मार्ट महानगरपालिका, अशी बिरुदावली अभिमानाने मिरवणाऱ्या नवी मुंबईत पारसिक हिलवरील २-२ किमीपर्यंत रस्त्यावरून ओढा वाहिल्यासारखे पाणी वाहत असेल तर त्यास केवळ पाऊस दोषी कसा? सदोष इंजिनिअरिंग दोषी नव्हे काय? सामान्य नागरिकांना समजते ते अभियंते आणि नेत्यांना खरेच समजत नसेल का? रस्तेनिर्मितीला जडलेली ३०/४० टक्के कमिशनची  बाधा दूर करण्यास प्राधान्य द्यायला हवे. सत्तेत आहोत तोवर आपल्या कार्यकर्त्यांना लाभ झाला पाहिजे, अशी धारणा  गाडली जाणार नाही तोवर खड्डेमुक्त रस्ते हे केवळ स्वप्नच राहणार!

 दृष्टिक्षेपातील उपाय :

१) डांबरी आणि सिमेंटच्या रस्त्यांचे आयुर्मान ‘नक्की’ करून त्या रस्त्यांचे त्या कालावधीसाठीचे उत्तरदायित्व निश्चित करा.

२) ‘तटस्थ अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय यंत्रणा’ निर्माण करून केंद्रीय पद्धतीने रस्त्यांची टेंडर प्रक्रिया सुरू करा. टेंडर देणारे आणि रस्त्यांचा दर्जा तपासणारे हे वेगवेगळे असावेत, जेणेकरून दर्जाबाबत उत्तरदायित्व नक्की होईल.

३) शासनाने ठरवलेल्या दोष कालावधीच्या काळात रस्ता दुरुस्त करण्याची नामुष्की ओढवल्यास संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांकडून दुरुस्तीचा खर्च कापा.

४) रस्त्यांना विविध व्यक्तींची नावे दिलेले मोठमोठे बोर्ड्स लावण्यात धन्यता न मानता सदरील रस्त्याच्या दोन्ही बाजूला अधिकारी आणि कंत्राटदाराचे नाव आणि मोबाईल क्रमांक देणाऱ्या पाट्या लावाव्यात.

५)  टेलिफोन केबल्स, इलेक्ट्रिक केबल्ससाठी वारंवार रस्ते खोदण्याची वेळ येऊ नये, यासाठी ‘रस्ता तिथे युटिलिटी डक्ट’ सुविधा अनिवार्य करावी.

६) प्रत्येक रस्त्यावरील खर्चाचा लेखाजोखा जनतेसाठी खुला करणारी स्वतंत्र वेबसाइट सुरू करावी.

७) रस्तेनिर्मितीस उत्तरदायित्व असणारे अभियंते, आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्या गोपनीय अहवालात ‘बांधलेले रस्ते आणि त्यांचा दर्जा’ यास गुण दिले जावेत. निहित कालावधीच्या आधी रस्त्यांवर खड्डे पडल्यास उत्तरदायी अधिकाऱ्यांची वेतनवाढ रोखली जावी.

टॅग्स :Potholeखड्डे