शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

सर्वंकष धोरणांचा सकारात्मक ‘असर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 06:20 IST

‘शिक्षण’ क्षेत्रातील महत्त्वाचा घटक म्हणजे ‘शिक्षक’. प्रत्येक शिक्षक हा शिकविण्याचे काम प्रामाणिपणेच करत असतो, यावर माझा पूर्ण विश्वास आहे.

शिक्षण हे एक असे क्षेत्र आहे, त्या क्षेत्राशी समाजातील प्रत्येक घटकाचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष संबंध येत असतो. तसेच ‘शिक्षण’ या विषयावर कोणतीही व्यक्ती आपली मते मांडत असते. हे सामाजिक वातावरण व त्यात होणाऱ्या शिक्षणविषयक चर्चांचा नकळत परिणाम शिक्षण क्षेत्रातील प्रत्येक घटकावर होत असतो. त्यानुसार चार वर्षांपूर्वीचे शैक्षणिकदृष्ट्या ‘सामाजिक’ वातावरण नकारात्मक होते. शिक्षण क्षेत्रातील प्रत्येक घटकावर नकारात्मक ताशेरे ओढले जात होते, प्रथम संस्थेद्वारे प्रकाशित होणारा शैक्षणिक ‘असर’ अहवाल शिक्षणातील ढासळलेल्या गुणवत्तेचे चित्रण करणारा होता. हे सर्व चित्र स्वीकारून शालेय मंत्री म्हणून त्यातील प्रत्येक घटकावर काम करण्यास मी सुरुवात केली.

‘शिक्षण’ क्षेत्रातील महत्त्वाचा घटक म्हणजे ‘शिक्षक’. प्रत्येक शिक्षक हा शिकविण्याचे काम प्रामाणिपणेच करत असतो, यावर माझा पूर्ण विश्वास आहे. शिक्षक परिषदांच्या माध्यमातून शिक्षकांमध्ये हा विश्वास निर्माण केला व त्यांना प्रेरणा दिली. त्यामुळे शिक्षक सकारात्मक झाला व शिक्षण क्षेत्रात ‘शिक्षक परिषदांच्या’ माध्यमातून एक चैतन्य निर्माण झाले. शिक्षक या घटकाबरोबरीनेच महत्त्वाचा घटक म्हणजेच ‘विद्यार्थी’. शिक्षण विभाग हा या दोन घटकांसाठी कार्यरत असतो. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील प्रत्येक निर्णय हा विद्यार्थ्याला केंद्रस्थानी ठेवूनच झाला पाहिजे, यावर मी ठाम होतो. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्तरात गुणवत्तापूर्ण वाढ करण्यासाठी व शिक्षकांना अध्ययन-अध्यापनात मार्गदर्शन करण्यासाठी ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ या अध्यादेशाची निर्मिती करण्यात आली.

शिक्षणातील गुणवत्तेवर भाष्य करणारा महाराष्ट्रातील २८ पानी हा असा पहिलाच अध्यादेश आहे. या अध्यादेशामुळे राज्यात खºया अर्थाने शैक्षणिक चळवळीस सुरुवात झाली. प्रत्येक मूल शिकू शकते हा विश्वास निर्माण झाला आणि १०० टक्के मुलांना शिकवलेच पाहिजे या जबाबदारीची जाणीव निर्माण झाली. यामुळे शिक्षक, विद्यार्थी, पालक, शालेय व्यवस्थापन समिती या सर्वांना एक मार्गदर्शक दिशा मिळाली. आज तंत्रज्ञानाचे युग आहे. अशा वेळेस दृश्यस्वरूपात विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमातील भाग पाहिला तर त्यांच्या अध्यापनात वाढ होते हे लक्षात आले. त्यासाठी मोबाइल हे एक शैक्षणिक साधन असा अध्यादेश जारी केला. या अध्यादेशामुळे जवळपास ६५,००० शाळा मोबाइल, संगणक अशा साधनांच्या मदतीने डिजिटल झाल्या व जवळपास १ लाख शिक्षक टेक्नोसॅव्ही झाले.शिक्षक व विद्यार्थी या दोन घटकांच्या बरोबरीने महत्त्वाचा घटक म्हणजे अधिकारी. या अधिकाºयांच्या मदतीने शालेय स्तरावरील गुणवत्तेची तपासणी केली जाते. या अधिकाºयांमध्ये शिक्षणविषयक संकल्पनांची जाणीव समृद्ध करण्यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. शाळाभेटी कशा करायच्या याविषयीचे मार्गदर्शन करण्यात आले. त्याचा परिणाम म्हणजे अधिकारी-शिक्षक-पालक-शालेय व्यवस्थापन समितीमधील सदस्य हे गुणवत्तेची भाषा बोलू लागले.

अर्थात असे असले तरी अजून बराच पल्ला गाठायचा आहे, याची जाणीव आहे. १०० टक्के विद्यार्थी शिकले पाहिजेत, यासाठी अजून प्रयत्न करायचे आहेत. पण महाराष्ट्रात दिग्गजांनी निर्माण केलेला वारसा समर्थपणे पुढे नेण्यास नियोजनबद्ध पावले आम्ही टाकली आहेत व त्यास यश येत आहे, याचे पूर्ण समाधान मला आहे.- विनोद तावडे । शालेय शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य

टॅग्स :Schoolशाळा