शहरं
Join us  
Trending Stories
1
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
2
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
3
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
4
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
5
Video: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
7
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
8
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
9
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
10
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
11
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
12
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
13
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
14
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
15
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
16
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
17
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
18
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
19
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
20
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी

सर्वंकष धोरणांचा सकारात्मक ‘असर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 06:20 IST

‘शिक्षण’ क्षेत्रातील महत्त्वाचा घटक म्हणजे ‘शिक्षक’. प्रत्येक शिक्षक हा शिकविण्याचे काम प्रामाणिपणेच करत असतो, यावर माझा पूर्ण विश्वास आहे.

शिक्षण हे एक असे क्षेत्र आहे, त्या क्षेत्राशी समाजातील प्रत्येक घटकाचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष संबंध येत असतो. तसेच ‘शिक्षण’ या विषयावर कोणतीही व्यक्ती आपली मते मांडत असते. हे सामाजिक वातावरण व त्यात होणाऱ्या शिक्षणविषयक चर्चांचा नकळत परिणाम शिक्षण क्षेत्रातील प्रत्येक घटकावर होत असतो. त्यानुसार चार वर्षांपूर्वीचे शैक्षणिकदृष्ट्या ‘सामाजिक’ वातावरण नकारात्मक होते. शिक्षण क्षेत्रातील प्रत्येक घटकावर नकारात्मक ताशेरे ओढले जात होते, प्रथम संस्थेद्वारे प्रकाशित होणारा शैक्षणिक ‘असर’ अहवाल शिक्षणातील ढासळलेल्या गुणवत्तेचे चित्रण करणारा होता. हे सर्व चित्र स्वीकारून शालेय मंत्री म्हणून त्यातील प्रत्येक घटकावर काम करण्यास मी सुरुवात केली.

‘शिक्षण’ क्षेत्रातील महत्त्वाचा घटक म्हणजे ‘शिक्षक’. प्रत्येक शिक्षक हा शिकविण्याचे काम प्रामाणिपणेच करत असतो, यावर माझा पूर्ण विश्वास आहे. शिक्षक परिषदांच्या माध्यमातून शिक्षकांमध्ये हा विश्वास निर्माण केला व त्यांना प्रेरणा दिली. त्यामुळे शिक्षक सकारात्मक झाला व शिक्षण क्षेत्रात ‘शिक्षक परिषदांच्या’ माध्यमातून एक चैतन्य निर्माण झाले. शिक्षक या घटकाबरोबरीनेच महत्त्वाचा घटक म्हणजेच ‘विद्यार्थी’. शिक्षण विभाग हा या दोन घटकांसाठी कार्यरत असतो. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील प्रत्येक निर्णय हा विद्यार्थ्याला केंद्रस्थानी ठेवूनच झाला पाहिजे, यावर मी ठाम होतो. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्तरात गुणवत्तापूर्ण वाढ करण्यासाठी व शिक्षकांना अध्ययन-अध्यापनात मार्गदर्शन करण्यासाठी ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ या अध्यादेशाची निर्मिती करण्यात आली.

शिक्षणातील गुणवत्तेवर भाष्य करणारा महाराष्ट्रातील २८ पानी हा असा पहिलाच अध्यादेश आहे. या अध्यादेशामुळे राज्यात खºया अर्थाने शैक्षणिक चळवळीस सुरुवात झाली. प्रत्येक मूल शिकू शकते हा विश्वास निर्माण झाला आणि १०० टक्के मुलांना शिकवलेच पाहिजे या जबाबदारीची जाणीव निर्माण झाली. यामुळे शिक्षक, विद्यार्थी, पालक, शालेय व्यवस्थापन समिती या सर्वांना एक मार्गदर्शक दिशा मिळाली. आज तंत्रज्ञानाचे युग आहे. अशा वेळेस दृश्यस्वरूपात विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमातील भाग पाहिला तर त्यांच्या अध्यापनात वाढ होते हे लक्षात आले. त्यासाठी मोबाइल हे एक शैक्षणिक साधन असा अध्यादेश जारी केला. या अध्यादेशामुळे जवळपास ६५,००० शाळा मोबाइल, संगणक अशा साधनांच्या मदतीने डिजिटल झाल्या व जवळपास १ लाख शिक्षक टेक्नोसॅव्ही झाले.शिक्षक व विद्यार्थी या दोन घटकांच्या बरोबरीने महत्त्वाचा घटक म्हणजे अधिकारी. या अधिकाºयांच्या मदतीने शालेय स्तरावरील गुणवत्तेची तपासणी केली जाते. या अधिकाºयांमध्ये शिक्षणविषयक संकल्पनांची जाणीव समृद्ध करण्यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. शाळाभेटी कशा करायच्या याविषयीचे मार्गदर्शन करण्यात आले. त्याचा परिणाम म्हणजे अधिकारी-शिक्षक-पालक-शालेय व्यवस्थापन समितीमधील सदस्य हे गुणवत्तेची भाषा बोलू लागले.

अर्थात असे असले तरी अजून बराच पल्ला गाठायचा आहे, याची जाणीव आहे. १०० टक्के विद्यार्थी शिकले पाहिजेत, यासाठी अजून प्रयत्न करायचे आहेत. पण महाराष्ट्रात दिग्गजांनी निर्माण केलेला वारसा समर्थपणे पुढे नेण्यास नियोजनबद्ध पावले आम्ही टाकली आहेत व त्यास यश येत आहे, याचे पूर्ण समाधान मला आहे.- विनोद तावडे । शालेय शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य

टॅग्स :Schoolशाळा