शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

‘गोकुळ’वरील राजकीय संशयकल्लोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 05:13 IST

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ अर्थात गोकुळ सध्या आरोप-प्रत्यारोपांनी राजकीय आखाडा बनला आहे. त्यामुळे राज्यातील एक आदर्श सहकारी संघ असलेल्या ‘गोकुळ’बाबत सभासदांच्या मनात संशयकल्लोळ निर्माण झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ अर्थात गोकुळ सध्या आरोप-प्रत्यारोपांनी राजकीय आखाडा बनला आहे. त्यामुळे राज्यातील एक आदर्श सहकारी संघ असलेल्या ‘गोकुळ’बाबत सभासदांच्या मनात संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. तो दूर करण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी केवळ राजकारण न करता विकासाचे राजकारण करायला हवे.ंमहाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील सर्वांत मोठा कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ अर्थात गोकुळ सध्या पश्चिम महाराष्ट्रातील चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे. आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यातील राजकीय संघर्षातून हे सर्व चालू असल्याचे वरकरणी दिसत आहे. मात्र, या संघातील सत्तासंघर्ष आणि मलई (?) हीदेखील त्याची अन्य कारणे आहेत.देशात ‘अमूल’नंतर सहकार क्षेत्रातील आदर्श दूध संघ म्हणून ‘गोकुळ’चेच नाव आहे. स्व. आनंदराव पाटील-चुयेकर, इंडियन डेअरी असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष अरुण नरके आणि त्यांच्या सहकाºयांनी १६ मार्च १९६३ रोजी ‘गोकुळ’चे रोपटे लावले. अथक परिश्रमाने त्याचा वटवृक्ष केला. राज्यातच नव्हे, तर देशात आदर्श बनविले. गोकुळ नावाचा ब्रँड तयार झाला आहे. आजघडीला प्रतिदिन १४ लाख लिटर दुधाचे संकलन हा संघ करतो. दूध उत्पादकांना १० दिवसाला सुमारे ४२ कोटी रुपयांचे वाटप केले जाते. ८२:१८ या सूत्रानुसार यात ‘गोकुळ’चे व्यवस्थापन केले जाते. म्हणजेच एक रुपयातील केवळ १८ पैसे व्यवस्थापनावर खर्च केले जातात. उर्वरित दूध उत्पादकांना दिले जातात. अन्य दूध संघांतील व्यवस्थापन खर्चाचा आकडा ३२ पैशांपर्यंत जातो. असे असूनही गोकुळ सध्या राजकारणाचा आखाडा बनला आहे. त्याला निमित्त ठरले ते ‘गोकुळ’च्या सर्वसाधारण सभेतील महादेवराव महाडिक यांनी केलेले अहवाल वाचन. ‘गोकुळ’मध्ये कोणत्याही पदावर नसताना त्यांनी अहवाल वाचन कसे केले? अशी विचारणा करीत विरोधी सतेज पाटील गटाने रान उठविले. न्यायालयातही धाव घेतली. दरम्यान, राज्य सरकारने गाईच्या दूध दरात वाढ करीत सर्व दूध संघांनी प्रतिलिटर २७ रुपये दर द्यावा, असा फतवा काढला. हा दर देणे अशक्य असले तरी शासनाचा आदेश म्हणून ‘गोकुळ’ने तो द्यायला सुरुवात केली. मात्र, दोन-तीन महिन्यांतच हा आतबट्ट्याचा व्यवसाय ठरू लागल्याने तो दोन रुपयांनी कमी केला. पश्चिम महाराष्ट्रातील जवळजवळ सर्वच सहकारी दूध संघांनी शासकीय आदेशानुसार दर दिलेला नाही. २१.५० ते २५ रुपयांपर्यंत त्यांनी दर दिले आहेत. यातही सध्या ‘गोकुळ’चाच दर सर्वाधिक २५ रुपये इतका आहे. त्याखालोखाल सातारा जिल्ह्यातील कोयना दूध संघ २३ रुपये, तर अमूल २२.५० रुपये दर देतो आहे. शासनाने ठरवून दिलेल्या दरानुसार दर दिला जावा, तसेच गैरव्यवस्थापन थांबवावे यांसह विविध मागण्यांसाठी सतेज पाटील यांनी मोर्चाही काढला. यामुळे सभासदांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण होऊ लागले. हे पाहून सत्ताधारी संचालकांनीही प्रतिमोर्चा काढून याला प्रत्युत्तर देण्याची जय्यत तयारी केली आहे. हा प्रतिमोर्चा आजच, गुरुवारी निघणार आहे. या सर्व प्रकारांत गोकुळ मात्र संशयाच्या भोवºयात अडकत आहे. अमूल दूध संघाने कोल्हापूर जिल्ह्यात शिरकाव केला आहे. त्याला संधी द्यायची नसेल तर सत्ताधारी आणि विरोधकांनी विकासाचे राजकारण करायला हवे आणि सभासदांचा विश्वास टिकवायला हवा.