शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
2
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
3
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
4
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
5
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
6
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
7
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
8
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
9
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
10
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
11
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
12
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
13
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
14
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
15
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
16
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
17
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
18
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
19
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

आपत्ती काळात राजकीय रणधुमाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2020 1:47 PM

मिलिंद कुलकर्णी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आमदारकीसाठी कोरोनाच्या आपत्तीकाळात राजकीय रणधुमाळी सुरु झाली आहे. ‘कोरोना’चा सर्वाधिक प्रकोप महाराष्टÑात आहे. ...

मिलिंद कुलकर्णीमुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आमदारकीसाठी कोरोनाच्या आपत्तीकाळात राजकीय रणधुमाळी सुरु झाली आहे. ‘कोरोना’चा सर्वाधिक प्रकोप महाराष्टÑात आहे. देशात ५५ हजार रुग्ण आहेत, त्यात महाराष्टÑाचा वाटा १८ हजार आहे. देशातील १८०० मृत्यूंपैकी महाराष्टÑात ७०० पेक्षा अधिक मृत्यू आहेत. लॉकडाऊनदरम्यान मजुरांच्या प्रश्नावर ठाम भूमिका न घेतल्याने मुंबई, पुण्यासह औद्योगिक शहरांमधील मजुरांची घरवापसी सुरु आहे. त्यामुळे उद्योग-व्यापाराचा भविष्यकाळ अंधकारमय राहील, असे चित्र आतातरी दिसत आहे. एवढ्या विपरीत परिस्थितीत महाराष्टÑात राजकीय शिमगा सुरु आहे.राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे नेतृत्व करणारे उध्दव ठाकरे हे विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत, सहा महिन्यांच्या आत त्यांना सदस्य व्हावे लागणार असून मे महिन्याच्या अखेरीस ही मुदत संपणार आहे. विधान सभेच्या सदस्यांनी निवडून द्यावयाच्या विधान परिषदेच्या ९ जागांची निवडणूक कोरोनामुळे प्रलंबित होती. त्यामुळे राज्यपाल नियुक्त सदस्याच्या जागेवर ठाकरे यांची नियुक्ती केली जावी, अशी शिफारस मंत्रिमंडळाने केली. परंतु, मुख्यमंत्री असलेल्या व्यक्तीला राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून नियुक्त करण्याचा प्रसंग प्रथमच उद्भवला असल्याने संसदीय कायदे, नियम, प्रघात असा पेच उद्भवला. महिनाभर त्यावर निर्णय होत नसल्याने विधान परिषदेच्या ९ जागांची निवडणूक तरी लावा, असे राज्य सरकारने राज्यपालांकडे गाºहाणे मांडले. ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही फोन केल्याची चर्चा आहे. त्यानंतर निवडणुका जाहीर झाल्या. २१ मे रोजी या निवडणुका होत आहे.कोरोनाच्या संकट काळात ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशीच सर्व राजकीय पक्षांची इच्छा आहे. विधानसभेतील संख्या बळानुसार या ९ जागांपैकी भाजप ४, शिवसेना व राष्टÑवादी प्रत्येकी २ व काँग्रेसला एक जागा मिळू शकते. या जागांसाठी आता प्रत्येक पक्षामध्ये इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरु आहे. खान्देशसाठी ही निवडणूक खूप महत्त्वाची आहे. नंदुरबारचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत रघुवंशी व जळगावच्या महिला नेत्या स्मिता वाघ यांच्या विधान परिषदेच्या रिक्त जागांचा या ९ जागांमध्ये समावेश आहे. प्रदीर्घ काळ काँग्रेसमध्ये राहिलेल्या चंद्रकांत रघुवंशी यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश केला. ज्या नंदुरबारमध्ये शिवसेनेचे फारसे अस्तित्व नाही, तेथे अक्कलकुवा-धडगाव मतदारसंघात सेना उमेदवार अल्प मतांनी पराभूत झाला. रघुवंशी यांच्यामुळेच हा पल्ला गाठता आला. परंतु, सेनेकडे आता या निवडणुकीत दोन जागाच आहेत. एक जागा ठाकरे यांच्यासाठी तर दुसरी जागा विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोºहे यांच्यासाठी निश्चित मानली जात आहे. त्यामुळे रघुवंशी यांना प्रतीक्षा करावी लागेल, असे दिसते.स्मिता वाघ यांना गेल्यावेळी अचानक आमदारकीची लॉटरी लागली. अमळनेर मतदारसंघासाठी त्या दोनदा इच्छुक असताना उमेदवारीने त्यांना हुलकावणी दिली. त्यांचे पती उदय वाघ यांचे चार महिन्यांपूर्वी आकस्मिक निधन झाले. तत्पूर्वी लोकसभा निवडणुकीतील उमेदवारीपासून वाघ दाम्पत्याचे पक्षश्रेष्ठींशी बिनसले होते. त्यामुळे वाघ यांचे नाव आता चर्चेतदेखील नाही, हे वास्तव आहे. त्यांच्याऐवजी जळगाव जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या नावाची प्राधान्याने चर्चा होत आहे. स्वत: खडसे यांनीही पक्षाकडे जाहीरपणे इच्छा बोलून दाखवली आहे. विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे यांच्याप्रमाणेच खडसे यांचेही पुनर्वसन होते काय, हा भाजपसाठी कळीचा मुद्दा राहणार आहे.राष्टÑवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांनाही आमदारकीचे स्वप्न पडू लागली आहेत. त्यात माजी मंत्री डॉ.सतीश पाटील, गुलाबराव देवकर, माजी आमदार राजीव देशमुख, दिलीप वाघ, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील यांच्या नावांचा समावेश आहे. पक्षश्रेष्ठींनी आपला विचार करावा, असे सगळ्यांना वाटत आहे, त्यासाठी मोर्चेबांधणी सुरु आहे. पण ज्या जिल्ह्यात गेल्या दोन निवडणुकांपासून केवळ एक आमदार निवडून येत असेल त्याठिकाणी उमेदवारी देण्यास पक्षश्रेष्ठी का तयार होतील, याचा विचार मात्र करावा लागणार आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव