शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
3
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
4
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
5
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
6
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
7
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
8
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
9
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
10
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
11
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
12
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
13
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
14
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
15
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
16
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
17
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
18
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
19
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
20
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे

योजना तशी चांगली, पण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 02:37 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेब्रुवारी २०१६ मध्ये सुरू केलेल्या पंतप्रधान पीक विमा योजनेचे त्यावेळी बरेच गुणगाण झाले होते. आधीच्या पीक विमा योजनांच्या तुलनेत नवी योजना खूप चांगली असल्याचे आणि आधीच्या सर्व पीक विमा योजनांमधील त्रुटी दूर करण्यात आल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेब्रुवारी २०१६ मध्ये सुरू केलेल्या पंतप्रधान पीक विमा योजनेचे त्यावेळी बरेच गुणगाण झाले होते. आधीच्या पीक विमा योजनांच्या तुलनेत नवी योजना खूप चांगली असल्याचे आणि आधीच्या सर्व पीक विमा योजनांमधील त्रुटी दूर करण्यात आल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आले होते. शेतकऱ्यांना मात्र जुन्या व नव्या योजनेत दूरगामी स्वरुपाचे कोणतेही बदल आढळले नाहीत. भरीस भर म्हणून यावर्षी राज्य सरकारने पीक विम्याचे दावे निकाली काढण्यासाठी तीन महिन्यांचा विलंब केला. गतवर्षी शेतकºयावर सुलतानी व अस्मानी अशी दोन्ही संकटे कोसळली. एकीकडे निसर्गाने तडाखा दिला, तर दुसरीकडे सरकारच्या धोरणांमुळे चांगले दर मिळाले नाहीत. परिणामी, शेतकरी मेटाकुटीस आलेला आहे. त्यातही कपाशीवरील बोंडअळीच्या अन् धानावरील रसशोषक किडीच्या प्रादुर्भावामुळे विदर्भातील शेतकºयांना तर जास्तच फटका बसला. खरीप हंगामापूर्वी पीक विम्याचे पैसे वेळेत हाती पडले असते, तर त्यांना थोडा दिलासा मिळाला असता. तीन महिन्यांच्या विलंबानंतरही वीस टक्के दावे निकाली निघणे बाकीच आहे. अजूनही राज्यातील ११ लाखांपेक्षा जास्त शेतकºयांना पीक विम्याची रक्कम हाती पडण्याची प्रतीक्षा आहे. रक्कम थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रणाली यावर्षीपासून सुरू केल्यामुळे विलंब झाल्याचे सरकारतर्फे सांगण्यात येत आहे. त्यामध्ये तथ्य असेलही; पण त्याचा फटका आधीच मेटाकुटीस आलेल्या शेतकºयांना बसला, त्याचे काय? शेतकºयाला प्रामुख्याने दोन प्रकारच्या ्नजोखिमींचा सामना करावा लागतो. एक म्हणजे उत्पादनाची जोखीम आणि दुसरी म्हणजे दरांची जोखीम! उत्पादन खर्च अधिक ५० टक्के एवढा किमान आधारभूत दर देण्याचे आश्वासन सरकारने प्रामाणिकपणे पूर्ण केले, तर दरांची जोखीम संपुष्टात येऊ शकते आणि पीक विमा योजनेची कार्यक्षम अंमलबजावणी उत्पादनाच्या जोखिमीची भरपाई करू शकते. दुर्दैवाने आपल्या देशात कोणतीही योजना कागदावर कितीही चांगली वाटत असली तरी, तिच्या कार्यक्षम अंमलबजावणीची खात्रीच देता येत नाही. पंतप्रधान पीक विमा योजनेसंदर्भातही तोच अनुभव येत आहे. यावर्षी दावे निकाली काढण्यात अक्षम्य विलंब झाला, तर गतवर्षी निम्म्यापेक्षाही कमी दाव्यांची रक्कम अदा करण्यात आली. पीक कापणी प्रयोगांना विलंब झाल्याचा आणि राज्य सरकारांनी विम्याच्या प्रीमिअममधील स्वत:चा हिस्सा न भरल्याचा तो परिपाक होता. अशी हेळसांड झाल्यामुळे चांगल्या योजनांसंदर्भातही लाभार्थ्यांच्या मनात अढी निर्माण होते. किमान शेतकरी हिताच्या योजनांसंदर्भात तरी तसे होऊ नये, याची खात्री करण्याची काळजी सरकारने घ्यायला हवी.

टॅग्स :cottonकापूस