शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

वेध - धर्मादाय संस्था कुणासाठी?

By admin | Updated: March 30, 2017 00:35 IST

राज्यातील धार्मिक ट्रस्टची अवस्था सध्या अत्यंत वाईट झाली आहे. या संस्थांतील कारभार पाहून देव केव्हाच पळून गेले असतील

धार्मिक ट्रस्टची अवस्था सध्या वाईट आहे, अशी खंत उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनीच व्यक्त केली. शैक्षणिक संस्थात नातेवाइकांची वर्णी लागत आहे, हे निरीक्षणही त्यांनी नोंदविले. धर्मादाय संस्था नेमक्या कुणासाठी आहेत? याचा विचार राज्याने एकदा करायला हवा.राज्यातील धार्मिक ट्रस्टची अवस्था सध्या अत्यंत वाईट झाली आहे. या संस्थांतील कारभार पाहून देव केव्हाच पळून गेले असतील, असे विधान मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विश्वास जाधव यांनी अहमदनगरला नुकतेच केले. या विधानाचा सरकार नावाच्या यंत्रणेने व धर्मादाय आयुक्त कार्यालयाने गांभीर्याने विचार करावा, अशीच सध्याची परिस्थिती आहे. देवस्थाने आपल्याच ताब्यात रहावीत, असाच सर्वच राजकारण्यांचा अट्टाहास असतो. शिर्डी संस्थानवर सरकार राजकीय कार्यकर्त्यांच्याच नियुक्त्या करते, असा शेरा औरंगाबाद खंडपीठाने शिर्डी संस्थानबाबत अगोदरच नोंदवून ठेवलेला आहे. या कारणावरून या संस्थानचे सदस्य मंडळ रद्द करण्याची नामुष्की सरकारवर ओढवली होती. कॉँग्रेसचे सरकार असताना या संस्थानच्या विश्वस्त मंडळात दोन्ही कॉँग्रेसच्या पुढाऱ्यांचा भरणा होता. आता ती जागा भाजपाच्या पुढाऱ्यांनी घेतली. देवस्थानांवर विश्वस्त म्हणून नियुक्ती मिळविण्यासाठी ना कुठली परीक्षा असते ना निवडणूक. पुरोहितांना परंपरेने अधिकार मिळत आले तसेच विश्वस्त नावाचे नवे बडवे सरकारने जन्माला घातले आहेत. खरे भाविक बाजूला राहून या नव्या राजकीय बडव्यांच्या ताब्यात देवस्थाने गेली आहेत. नगर जिल्ह्यातील प्रसिद्ध मोहटादेवी देवस्थानमधील ‘सुवर्ण पुराण’ ‘लोकमत’ने राज्यासमोर मांडलेले आहे. या देवस्थानच्या विश्वस्तांनी अधिकृत ठराव करून दोन किलो सोने मंदिरात पुरले. धर्मादाय आयुक्त कार्यालयाने केलेल्या चौकशीत ही बाब खुद्द देवस्थानने मान्य केली आहे. पण, या कार्यालयाकडून पुढे काहीच कारवाई झालेली नाही. एकही राजकारणी व प्रशासकीय अधिकारी या घोटाळ्यावर बोलायला तयार नाही. लालफितीत हा घोटाळा पडून आहे. या देवस्थानवर जिल्हा न्यायाधीश हे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. देवस्थानच्या घटनेनुसार प्रधान जिल्हा न्यायाधीश या देवस्थानवरील विश्वस्तांच्या नियुक्त्या करतात. या नियुक्त्यांचे नेमके निकष काय, असा प्रश्न माहिती अधिकारात प्रधान जिल्हा न्यायाधीशांच्या कार्यालयाला विचारला गेला. या कार्यालयाने हा प्रश्न देवस्थानकडे हस्तांतरित केला. देवस्थानने माहिती अधिकार कायदाच आम्हाला लागू नाही, असे सांगून ही माहिती नाकारली. त्यामुळे न्यायमूर्ती विश्वास यांनी उपस्थित केलेला प्रश्न महत्त्वाचा बनतो. धार्मिक ट्रस्ट नेमके कुणाच्या मालकीचे आहेत व कुणासाठी चालतात? आम्ही सरकारी अनुदान घेत नाही, असे कारण पुढे करत या संस्था माहितीच देण्यास टाळत आहेत. मग, जनतेच्या कोट्यवधी रुपयांच्या देणगीवर या संस्था चालतात, सरकारी जमिनी कवडीमोल भावात घेतात, तीर्थक्षेत्राचे अनुदान घेतात, त्याचे काय? त्यामुळे धार्मिक ट्रस्टबाबत धोरण ठरविण्याची गरज निर्माण झाली आहे. शैक्षणिक न्यासांमध्ये वाद विकोपाला गेले आहेत व नातेवाइकांना सदस्यत्व बहाल करण्याचा अट्टाहास वाढत चालला आहे, याही मुद्द्यावर न्यायमूर्ती जाधव यांनी बोट ठेवले आहे. विखे परिवारातील वाद हे त्याचे ताजे उदाहरण आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे हे शैक्षणिक संस्था बळकावत आहेत, असा आरोप त्यांचेच ज्येष्ठ बंधू अशोक विखे यांनी केला.सरकारने शिक्षणासाठी तसेच सार्वजनिक कामांसाठी अनुदान देण्याची जबाबदारी केव्हाच झटकून टाकली आहे. त्यातून धर्मादाय संस्थांचे पीक आले. पण, धर्मादाय संस्था या समाजाच्या हिताच्या राहण्याऐवजी त्या प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या बनल्या आहेत. नगर जिल्ह्यात खासगी शैक्षणिक संस्थांनी सरकारी जमिनी कवडीमोल भाडेपट्ट्यावर घेतल्या व त्यावर स्वत:चे इमले उभारले. आज या संस्था मूठभर राजकीय घराण्यांच्या ताब्यात आहेत. त्या जमिनींचा भाडेकरारदेखील पाळत नाही. त्यावरून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तात्पर्य एकच धर्मादाय कार्यात परमार्थापेक्षा स्वार्थ वाढला आहे. - सुधीर लंके