शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

पेन अधिवेशन : सत्य, स्वातंत्र्य, विविधता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2018 00:35 IST

पेन या संस्थेला १०० वर्षांचा इतिहास आहे. १२० देशांमध्ये १८० हून अधिक पेन केंद्रे असून भारतामध्ये तीन केंद्रे आहेत. पेन इंटरनॅशनल या संस्थेचे काम भारतात मुंबई, दिल्ली आणि कोलकाता या तीन ठिकाणांहून १९३० नंतर सुरू झाले. परंतु, भारतात आजवर ‘पेन’चे अधिवेशन होऊ शकले नव्हते.

- डॉ. गणेश देवी(ज्येष्ठ भाषा अभ्यासक)पेन या संस्थेला १०० वर्षांचा इतिहास आहे. १२० देशांमध्ये १८० हून अधिक पेन केंद्रे असून भारतामध्ये तीन केंद्रे आहेत. पेन इंटरनॅशनल या संस्थेचे काम भारतात मुंबई, दिल्ली आणि कोलकाता या तीन ठिकाणांहून १९३० नंतर सुरू झाले. परंतु, भारतात आजवर ‘पेन’चे अधिवेशन होऊ शकले नव्हते. भारतात हे अधिवेशन व्हावे, अशी रवींद्रनाथ टागोर यांची इच्छा होती. दुसऱ्या महायुद्धामुळे ही इच्छा अपुरी राहिली. दोन वर्षांपूर्वी ‘दक्षिणायन’च्यानिमित्ताने मी बंगळुरुला गेलो असताना पेनच्या अध्यक्षांशी माझी भेट झाली. पेनचे अधिवेशन भारतात होणे किती महत्त्वाचे आहे, याबाबत मी त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी कारण विचारले असता मी सांगितले, ‘महात्मा गांधी यांच्या जन्माचे १५० वे वर्ष २ आॅक्टोबरपासून सुरू होत आहे. या वर्षाची नांदी पेनच्या संमेलनाने व्हावी, असे मला वाटते. गांधीजींसारखी व्यक्ती आधुनिक जगात क्वचितच झाली असेल. गांधीजींना महात्मापद मिंळाले; मात्र त्यांचा सत्याग्रह आणि निर्भयतेच्या मागे कस्तुरबांची शक्ती होती. कस्तुरबा पुण्यामध्ये तुरुंगात असताना तेथेच त्यांचा मृत्यू झाला. पेन एक प्रकारे तुरुंगात असणाºया लेखकांना मदतीचा हात देते. त्यामुळे पेन इंटरनॅशनल काँग्रेसचा कार्यक्रम आगाखान पॅलेसपासून शांततामय प्रार्थनेने सुरू करण्याचे ठरले. या अधिवेशनासाठी पेनच्या ८७ केंद्रांमधीलआणि ६० हून अधिक देशांतील लेखक पुण्यात एकत्र आले असून मंगळवारपासून सुरू झालेला हा लेखक सोहळा २७ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे.लेखक केवळ अक्षरांशी जोडलेल्या व्यक्ती नाहीत. भारतात मौखिक परंपरा खूप समृद्ध आहे. या परंपरेची तसेच लिपींचे हस्तकलेतील स्थान याची दखल अधिवेशनात घेण्यात येणार आहे. मराठी भाषेने साहित्याला काय दिले असे विचार केल्यास, वारी हा साहित्यमय प्रकार आहे, हे लक्षात येईल. महाराष्ट्राबाहेर ही परंपरा कुठेच पाहायला मिळत नाही. जागतिक पातळीवर ही परंपरा नेण्याच्या हेतूने १४ विविध संतकवींच्या रचना गाणारे ग्रुप एकत्र करून वारी काढण्याचे ठरवले. सर्व माणसे समान असावीत, अशी संतांची इच्छा होती. म्हणूनच, जगातील सहा हजार भाषांना एकत्र आणून वारीशी जोडणे मला योग्य वाटते. म्हणून मी भाषा वारी ही संकल्पना पुढे आणण्याचा प्रयत्न केला आहे. निरक्षर लोकांनी केलेल्या लिपीची निर्मिती आणि भाषावारी ही कल्पना पेन इंटरनॅशनलच्या इतिहासात प्रथमच घडत आहे. गेल्या १०० वर्षांत पेन काँग्रेसमध्ये सहभागी होणाºया केंद्रांची संख्या साधारणपणे ४० ते ५५ होती. कॅनडातील अधिवेशनात८० केंद्रे एकत्र आली होती. यंदा प्रथमच ८७ केंद्रे एकत्र येत असून नवा उच्चांक प्रस्थापित होत आहे. या केंद्रांमधील एकत्र येत असलेले लेखक ज्या भाषांचे प्रतिनिधित्व करतात, त्या भाषांची संख्या जवळपास दोन ते अडीच हजार होते.पेन अधिवेशनाच्या शीर्षकामध्ये सर्वांत महत्त्वाचा शब्द म्हणजे विविधता. स्वातंत्र्यासाठी विविधतेची गरज असते. दुसरा शब्द म्हणजे सत्य. निर्भीडपणे सत्य सांगण्याची स्वातंत्र्यासाठी गरज असते. लेखकांचे सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे निर्भीडपणे जगाला आरसा दाखवणे, त्याचबरोबर जीवसृष्टीचे रक्षण करणे. म्हणूनच ट्रूथ, फ्रीडम आणि डायव्हर्सिटी या तीन शब्दांचे शीर्षक या अधिवेशनासाठी चपखल ठरले आहे.

टॅग्स :newsबातम्या