शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

पदोपदी जाणवणारी दातृत्वाची थोरवी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 2:50 AM

दानशूर व्यक्तींच्या दातृत्वाचा सन्मान समाजात नेहमीच केला जातो़ अशीच एक व्यक्ती म्हणजे उद्योग महर्षी रसिकलाल धारीवाल़

- मिलिंद फडे दानशूर व्यक्तींच्या दातृत्वाचा सन्मान समाजात नेहमीच केला जातो़ अशीच एक व्यक्ती म्हणजे उद्योग महर्षी रसिकलाल धारीवाल़ एक वर्षापूर्वी त्यांचे निधन झाले़ त्यांच्या निधनानंतरही त्यांचे कार्य त्यांच्या पत्नी शोभाताई आणि कन्या जान्हवी यांनी सुरू ठेवले आहे़जेव्हा रसिकभाऊंना पहिल्यांदा भेटलो, तेव्हा मोठा उद्योगपती हा दर्प त्यांच्यात कुठेच दिसला नव्हता. उलट अत्यंत विनम्रशील आनंदी आणि आस्थेने विचारपूस करीत आपलेसे वाटेल, असे त्यांचे व्यक्तिमत्त्व जाणवले. त्या वेळी त्यांच्यासोबत पत्नी शोभाताईदेखील होत्या. कुटुंबवत्सल असे हे जोडपे म्हणजे, लक्ष्मी-नारायणाचे जोडपेच वाटले. पुढे कालौघात या दोघांशीही वारंवार संपर्र्क येत गेला़ पुढे त्यांच्या विराट कर्तृत्व आणि दातृत्वाचे दर्शन घडत राहिले.धारीवाल यांनी केलेल्या प्रचंड कार्याची प्रचिती त्यांना मिळालेल्या पहिल्या ‘पुलाकभूषण’ पुरस्काराने आली़ देशातील प्रतिष्ठेचा मानला जाणारा हा पुरस्कार जैन समाजाचे मुनीश्री प़ पू़ १०८ पुलाकसागरजी महाराज यांच्या हस्ते समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला़रसिकभाऊंनी शिक्षण संस्था, शाळा कॉलेज मुला-मुलींसाठी वसतिगृहे उभारली. शेकडो जैन-अजैन शिक्षण संस्थांना भक्कम आर्थिक देणगी देऊन स्थिर केले. रुग्णालयाची उभारणी, तसेच विविध रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे आणण्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले़ याबरोबरच निसर्ग महाविद्यालय, वृद्धाश्रम यांचीही जोड त्यास दिली. धार्मिक पातळीवर तर रसिकभाऊ व त्यांची पत्नी शोभाताई सतत सक्रि य असायचे. त्यामुळेच रसिकभाऊंना उद्योग महर्षी या बिरुदावलीप्रमाणेच दानशूर आणि समाज भूषण या गौरवानेदेखील उल्लेखिले जाऊ लागले. हीच त्यांच्या कार्याची पावती मानावी लागेल.स्वत: रसिकलाल धारीवाल हे देशातले उद्योगपती असले, तरी त्यांची खरी ओळख हजारो गरजूंना आणि शेकडो संस्थांना कोट्यवधी रुपयांची देणगी देऊन, त्यांच्या जीवनात आणि वाटचालीत चांगले दिवस आणणारा दानशूर उद्योग महर्षी हीच राहिली.श्री क्षेत्र सम्यक शिखरजी असो, पालीठाणा , श्री क्षेत्र जिरावाला असो, हे दाम्पत्य खूपच भक्तिभावाने या जैन तीर्थस्थळांच्या विकासाबद्दल वारंवार बोलत असे़ विशेष म्हणजे, त्यांनी स्वत:च तेथे विकास कामासाठी कोट्यवधी रुपये देणगी दिल्याचा उल्लेख कधीच ते करत नसत. मध्य प्रदेशातील भोपाळ येथे नव्याने साकारल्या जात असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयास त्यांच्या उद्योग समूहातर्फे तब्बल ५१ कोटी रुपये देणगी दिल्याचे जेव्हा समजले, तेव्हा आश्चर्य वाटले नाही.विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती मिळण्यासाठी, गरजू रुग्णांना मोफत अथवा माफक शुल्कात वैद्यकीय सेवा मिळावी, यासाठी त्यांनी कोट्यवधी रुपयांची ट्रस्ट उभारून, त्याद्वारे आपल्या सामाजिक कार्याचा झरा सदैव वाहता राहील याची दक्षता घेतली. जैन संस्कारांचा प्रभाव असणारे रसिकभाऊ अन्य धर्मियांबद्दलही आस्था बाळगत आणि मदतीचा हात पुढे करायचे़ गुजरात व महाराष्ट्रामधील भूकंप, आंध्र प्रदेशामधील वादळ, पूर, कारगिल युद्ध अशा प्रत्येक नैसर्गिक व राष्ट्रीय आपत्तीच्या वेळी रसिकभाऊ आणि शोभाताई मदतीसाठी पुढे असायचे. या त्यांच्या दानशूर वृत्तीमुळेच त्यांच्याकडे मदतीसाठी येणारी संस्था कधी विन्मुख परत गेले नाहीत. किंबहुना, एखाद्या दिवशी असे कोणी त्यांना भेटले नाही, तर पटकन शोभातार्इंना म्हणायचे की, आज माझे पुण्य कमी पडलेले दिसतेय.

(धारीवाल यांचे स्नेही)