शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
2
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
3
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
4
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
5
मध्यमवर्ग त्याग करायला तयार आहेच, पण डझनभर गाड्यांचा ताफा...; जयंत पाटील यांची टिप्पणी
6
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
7
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
8
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
9
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सौंदर्यासाठी नाही, तर मी पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलं"; नवरा झाला हैवान, बायकोचा घेतला जीव
11
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
12
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
13
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
14
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
15
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
16
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
17
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
18
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
19
कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
20
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
Daily Top 2Weekly Top 5

पायल तडवी आत्महत्येच्या निमित्ताने...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2019 04:54 IST

नायर रुग्णालयात वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून डॉ. पायल तडवी या निवासी डॉक्टरने आत्महत्या केल्याने मोठे वैचारिक वादळ आले आहे.

- डॉ. अमोल अन्नदाते

नायर रुग्णालयात वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून डॉ. पायल तडवी या निवासी डॉक्टरने आत्महत्या केल्याने मोठे वैचारिक वादळ आले आहे. ही आत्महत्या रॅगिंगमुळे झाल्याचे प्राथमिक अहवालात समोर आले आहे. यात पायलला जातिवाचक मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले का, यावर अजून चौकशी सुरू आहे. सगळ्या शक्यता गृहीत धरल्या, तरी ही घटना केवळ वैद्यकीय क्षेत्रालाच नव्हे, तर समाजातील बौद्धिक धुरिणांना आत्मचिंतन करायला लावणारी आहे.
जर पायलच्या मृत्यूत जातीचा संदर्भ असेल, तर या गोष्टीचा निषेध करावा तितका कमीच आहे, पण त्याच वेळी दोषींवर कायदेशीर कारवाई सुरू असताना आपण सगळ्यांनी याची चर्चा बौद्धिक वर्णभेद भडकणार नाही, अशा दृष्टीने व ‘डोळ्यासाठी डोळाच’ अशा प्रकारे दोन वर्ग एकमेकांसमोर उभे ठाकणार नाहीत, याची काळजी घेणे ही गरजेचे आहे. त्यातच पदव्युत्तर शिक्षणामध्ये आरक्षणाचा मुद्दा सध्या तापत असताना, गेली काही महिने वैद्यकीय क्षेत्रात प्रथमच जातीच्या मुद्द्यावरून उभी फूट पडलेली दिसून आली. वैद्यकीय क्षेत्रासारख्या थेट जगण्या- मरण्याशी संबंधित क्षेत्रात अशा प्रकारे बौद्धिक वर्णभेद भडकणे हे समाजाच्या दृष्टीने अत्यंत घातक व अराजकाला आमंत्रण देणारी गोष्ट आहे. पदव्युत्तर शिक्षण प्रवेशात आयत्या वेळी होणारे बदल, खुल्या वर्गासाठी राहिलेल्या एक दोनच जागा, आरक्षित वर्गाचा आपल्या हक्कासाठी लढा यातून कधी नव्हे, ते समाज माध्यमांवर वैद्यकीय क्षेत्रात दोन वर्ग एकमेकांना भिडताना दिसत होते.
आरक्षण हवे नको, हा वादाचा मुद्दा बाजूला ठेवला, तरी आपल्या हक्कांसाठी सनदशीर मार्गाने लढा देत, आपल्या क्षेत्रात व एकूणच समाजात सहिष्णुता टिकून राहावी, यासाठी प्रत्येकाने आपला विवेक जागा ठेवायला हवा. त्यातच पायल तडवीसारख्या तरुण डॉक्टरचा जीव जातो, तेव्हा आपण सगळे एकाच वैद्यक मातेची मुले आहोत व जात, धर्मापलीकडे डॉक्टर आहोत व रुग्ण आपला पहिला धर्म आहे हे विसरता कामा नये, तसेच कुठलाही बदल आणताना तो अचानक आणला, तर समाज कशा प्रकारे ढवळून निघतो व त्यातून असा बौद्धिक वर्णभेद भडकू शकतो हा धडाही शासनाने घ्यायला हवा.
या पलीकडे जाऊन या घटनेमध्ये वैद्यकीय क्षेत्रात अत्यंत मानसिक व शारीरिक तणावाचा पदव्युत्तर शिक्षणाचा काळ, कमी निवासी डॉक्टरांची संख्या, वैद्यकीय महाविद्यालयातील कामाचा ताण, अनेक पातळ्यांवर, अनेक कारणांनी होत असलेले भेदभाव, डॉक्टरांचे आपापसातील संबंध हे सगळे कंगोरेही तपासून, त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे.


पायलच्या आत्महत्येत जातीचा संदर्भ तिच्या नैराश्यात भर घालणारा सगळ्यात मोठा घटक असला, तरी तिच्यावरील ताणही नाकारला जाऊ शकत नाही, तसेच काहीही कारण असले, तरी सोबत काम करणाऱ्या कनिष्ठ, वरिष्ठांमध्ये तिला निराधारपणाच्या तीव्र भावनाने पछाडले, हा सगळ्या कारणांपलीकडे आपला दोष आहे व व्यवस्थेचेही मोठे अपयश आहे. पदव्युत्तर शिक्षण घेत असताना आम्हा प्रत्येकाने तीव्र मानसिक, शारीरिक ताणाचा सामना केल्याची प्रत्येक डॉक्टरची कहाणी आहे. दरवर्षी केईएम, सायन, नायर येथील तीन-चार निवासी डॉक्टरांना टी.बी.चा संसर्ग होतोच. सायन अर्थोपेडीक विभागात दरवर्षी एखादा तरी निवासी डॉक्टर ताणापायी पदव्युत्तर शिक्षणच सोडून जातो. मार्डच्या संपातून हा संघर्ष अधूनमधून तात्पुरता उफाळून येत असतो. प्रत्येक विभागात राग, द्वेष, मत्सर, सीनियर-ज्युनिअर संघर्ष, भीती अशा नकारात्मक भावनांचा पूर वाहात असतो. यात रुग्णांना चांगली सेवा मिळावी, ही भावना असली, तरी त्यातून कामाचे व्यवस्थापन व काम करणाºया डॉक्टरांची मानसिकता बिघडत जाते. जातिवाचक शेरे म्हणा किंवा कनिष्ठांना अमानुष त्रास म्हणा, हे सगळे या ताणातून आलेल्या विकृत मानसिकतेतून जन्म घेते व पायलसारख्या निरागस डॉक्टरच्या आत्महत्येतून कधीतरी समाजापुढे येते. वैद्यकीय शिक्षणातून आपल्याला फक्त भल्यामोठ्या डिग्रीची रांग नावामागे असलेले हुशार डॉक्टरच नव्हे, तर चांगला संवेदनशील माणूस, तसेच समाजाला दिशा देऊ शकणारे विवेकी बौद्धिक नेतृत्वही तयार करायचे आहे, हे विसरून कसे चालेल. यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाला वैद्यकीय महाविद्यालयांच्या कामाच्या तासांचे, मनुष्यबळाचे योग्य व्यवस्थापनही करावे लागणार आहे.

आज वैद्यकीय क्षेत्र मोठ्या नैतिक पेचातून जाते आहे. त्यातच पदव्युत्तर वैद्यकीय क्षेत्राचा आरक्षण लढा, तीव्र अंतर्गत स्पर्धा, वैद्यकीय महाविद्यालयातील कामाचा ताण अशा अनेक कारणांनी आज सर्वसामान्य डॉक्टर अस्वस्थ आहे. अशा स्थितीत पायल तडवीसारखी घटना या क्षेत्राला व पर्यायाने सर्वच बौद्धिक व्यवसायिक क्षेत्रांना मोठा हादरा देणारी ठरते. यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील अंतर्गत अस्वस्थता वाढीला लागतेच, नव्हे तर समाजाचा या क्षेत्राविषयीचा दृष्टिकोनही पणाला लागतो. या सर्व गोष्टींची वैद्यकीय क्षेत्राने व शासनानेही विचारपूर्वक हाताळणी करण्याचा हा क्षण आहे, तसेच यावर केवळ तात्पुरत्या मलमपट्ट्या नव्हे, तर याच्या मूलभूत कारणांचे समाधान करणे गरजेचे आहे. राज्यातील आरोग्याची दयनीय स्थिती पाहता, मानसिकदृष्ट्या सशक्त डॉक्टर तयार करण्याला प्राधान्य द्यावेच लागेल. पायलच्या आत्महत्येने प्रत्येक घटकाने यावर आत्मचिंतन करावे.
(आरोग्यतज्ज्ञ)

टॅग्स :payal tadvi suicideपायल तडवी