शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णांचे रक्षणच आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 00:35 IST

संसदेसमोर चर्चेला असलेले राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाविषयीचे विधेयक रुग्णांच्या स्वास्थ्याचा फारसा विचार करणारे नसून डॉक्टरीचा व्यवसाय करणा-यांचे हितसंबंधच जास्तीचे जपणारे आहे. देशात सध्या १०.४ लक्ष ‘डॉक्टर्स’ व्यवसाय करीत आहेत.

संसदेसमोर चर्चेला असलेले राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाविषयीचे विधेयक रुग्णांच्या स्वास्थ्याचा फारसा विचार करणारे नसून डॉक्टरीचा व्यवसाय करणा-यांचे हितसंबंधच जास्तीचे जपणारे आहे. देशात सध्या १०.४ लक्ष ‘डॉक्टर्स’ व्यवसाय करीत आहेत. त्यातील अनेकजण एकेकटे व्यवसाय करणारे तर काहींजवळ लहानमोठे दवाखाने आहेत. २०१६ मध्ये या डॉक्टरांच्या झालेल्या सर्वेक्षणात शहर विभागात काम करणा-यांमध्ये फक्त ५७.३ टक्के डॉक्टरांजवळ दवाखाने चालविण्याचे परवाने आहेत तर ग्रामीण भागात असे परवाने असणारे केवळ १४ टक्के ‘डॉक्टर्स’ आहेत. या सा-यांमध्ये ३१.४ टक्के डॉक्टरांनी या व्यवसायाचे जुजबी शिक्षण घेतले आहे आणि ते पदवीधारक नाहीत. इतरांमध्ये ५७.३ टक्के ‘डॉक्टरांजवळ’ तेवढेही शिक्षण नाही आणि ते साधे मॅट्रिकपर्यंतही शिकलेले नाहीत. एखाद्या प्रस्थापित डॉक्टरकडे नोकरीला लागून इंजेक्शन देणे, इसीजी काढणे, एनिमा देणे किंवा आयव्ही लावणे यासारखी कामे करायची व त्याविषयीचा थोडाफार आत्मविश्वास प्राप्त झाला की अन्यत्र आपलाच दवाखाना ‘डॉक्टर’ ही पदवी लावून सुरू करायचा असा त्यांचा गोरखधंदा आहे. या अर्धशिक्षित व अशिक्षित डॉक्टरांची खरी माहिती सरकारला असूनही देशातील डॉक्टरांच्या कमतरतेमुळे त्याला या प्रकाराकडे दुर्लक्ष करावे लागले आहे. हे अर्धशिक्षित डॉक्टर त्यांच्याकडे मोठा आजार घेऊन येणा-या रुग्णांना नामांकित व प्रस्थापित डॉक्टरांकडे पाठवितात. तसे ‘रेफर’ केल्याचा त्यांना ३० टक्क्यांएवढा फायदा (कट प्रॅक्टिस) ते प्रस्थापित डॉक्टर्स करून देतात. डॉक्टरांच्या या व्यवसायावर लक्ष ठेवायला ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ व ‘नॅशनल इन्टिग्रेटेड मेडिकल असोसिएशन’ या संस्था आहेत. यातील पहिलीची सदस्यसंख्या दोन लाखाहून अधिक असल्याने व ती डॉक्टरांची आंदोलने आयोजित करीत असल्याने तिची सरकारलाही धास्ती आहे. प्रत्यक्षात या दोन्ही संघटना शासकीय नाहीत. डॉक्टरांचे हितसंबंध जपणे, त्यांना रुग्णांकडून वा शासनाकडून त्रास होणार नाही याची काळजी घेणे आणि त्यांना अधिकाधिक संरक्षण देणे एवढीच कामे या संस्था करतात. या व्यवसायातील कट प्रॅक्टिससारखे प्रकार त्यांना ठाऊक असूनही त्यांना आळा घालावा असे त्यांना वाटत नाही. औषध कंपन्यांकडून डॉक्टरांना मिळणाºया ‘भेटी’बाबत त्यांची तक्रार नसते, मात्र एखादा रुग्ण डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे दगावला तर त्या डॉक्टरला संरक्षण देणे, रुग्णांच्या संतप्त नातेकवाईकांविरुद्ध पोलीस कारवाई झाली की नाही हे पाहणे, असली संरक्षक कामेच त्या करीत असतात. देशात अ‍ॅलोपॅथीएवढीच आता आयुष इस्पितळांची चलती आहे. मात्र केरळ व प. महाराष्ट्र वगळता या क्षेत्रातील निष्णात व पदवीप्राप्त डॉक्टरच मुळात थोडे आहेत. हा सारा प्रकार डॉक्टरांच्या व्यवसायाला संरक्षण देणारा, त्यांच्यातील गैरव्यवहारांवर पांघरुण घालणारा आणि रुग्णांच्या जीविताशी खेळ चालविणारा आहे. त्यामुळे येऊ घातलेल्या विधेयकात यासंबंधात महत्त्वाच्या तरतुदी होणे गरजेचे आहे. त्यात डॉक्टरांचा वैद्यकीय स्तर, त्यांच्या पदव्या व त्यांची फी यांची पाहणी होणे, कट प्रॅक्टिसला आळा घालणे आणि रुग्णांच्या तक्रारींची योग्य ती दखल घेण्याची तरतूद असणे गरजेचे आहे. डॉक्टरांना दवाखाने बंद करता येतात. मोर्चेही काढता येतात. रुग्णांचा असंघटित व गरजू वर्ग ते करू शकत नाही. त्यामुळे त्यांना शासकीय संरक्षण मिळवूण देणे आता अधिकच आवश्यक झाले आहे. आधीच रुग्णसेवेचा अभाव, त्यात धंदेवाईकपणाची शिरलेली वृत्ती, रुग्णांचे गरजूपण आणि व्यावसायिक संघटनांचे स्वार्थी दुर्लक्ष, अशा स्थितीत सरकारही हात राखून वागणारे राहील तर देशातील गरीब रुग्णांनी कुणाकडे संरक्षण मागायचे उरते?

टॅग्स :doctorडॉक्टर