शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

Pankaja Munde : पंकजा मुंडे यांचे राजकारण संपवायचे आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2020 03:55 IST

Pankaja Munde News : एकनाथ खडसे राष्ट्रवादीवासी झाल्यानंतर भाजपच्या माळी, धनगर, वंजारी (माधवं) या राजकीय सूत्रांचे नेतृत्व पंकजांकडे येणे क्रमप्राप्त आहे आणि मतांची ही उतरंड रचण्यात गोपीनाथ मुंडेंचे योगदान विसरता येणे शक्य नाही. तरीही भाजपने हा जाणूनबूजून केलेला प्रयत्न पंकजांची राजकीय कोंडी करण्यासाठी होता.

- सुधीर महाजन(संपादक, औरंगाबाद आवृत्ती) 

पंकजा मुंडेंचं काय करायचं, असा प्रश्नच भाजपच्या धुरिणांना पडला काय, असा एकूण माहोल दिसतो. नसता साडेसहा लाख ऊसतोड, कामगार मुकादमांची संघटना ताब्यात असणाऱ्या पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाला चूड लावण्याचा भाजपमधून प्रयत्न झाला नसता. गोपीनाथ मुंडेंनी जी संघटना बांधली आणि साखर कारखानदारीवर एक आपला दबावगट तयार करत बीडमध्ये भाजप तळागळात बळकट केला तिचे नेतृत्त्व नंतर पंकजांकडे येणे साहजिकच होते; पण राजकीय कोंडी करण्याच्या प्रयत्नात भाजपने यावेळी त्यांच्याविरोधात आपल्याच पक्षातील सुरेश धस यांना वापरले. कोरोना महामारीची संधी घेत पंकजा या बीडबाहेर आहेत हे हेरून भाजपने सुरेश धसांना अधिकृत पत्र देऊन महाराष्ट्रभर ऊसतोड कामगार आणि मुकादमांच्या बैठका घेण्याचे अधिकार दिले आणि धस यांनीसुद्धा राज्यात १०६ बैठका घेत वातावरण निर्मिती केली. ही संघटना पंकजा यांच्या हातातून गेली असा एक आभास निर्माण करण्यात ते यशस्वी झाले.महाराष्ट्रातील सर्वच साखर कारखान्यांच्या क्षेत्रात दरवर्षी बीड जिल्ह्यातून साडेसहा लाख ऊसतोड कामगार जातात. या कामगारांनी कोयता खाली टाकला तर एकाही कारखान्याचा बॉयलर पेटू शकत नाही आणि या सर्वांची संघटना गोपीनाथ मुंडेंनी बांधली होती. हे बहुसंख्य कामगार वंजारी समाजाचे असल्याने त्यांची निष्ठा गोपीनाथ मुंडेंनंतर पंकजा मुंडे आणि ओघाने भाजपवर असल्याने एका अर्थाने भाजपची परंपरागत मतपेटी तयार झाली आहे. याच मतपेटीला फोडून समांतर नेतृत्व उभे करण्याचा प्रयत्न भाजपकडून झाला. या संघटनेचा नेता कोण या मुद्द्यावरही भाजपमधील मते-मतांतरे उघड झाली. सुरेश धस यांना पद्धतशीरपणे पुढे आणण्यात आले. एकनाथ खडसे राष्ट्रवादीवासी झाल्यानंतर भाजपच्या माळी, धनगर, वंजारी (माधवं) या राजकीय सूत्रांचे नेतृत्व पंकजांकडे येणे क्रमप्राप्त आहे आणि मतांची ही उतरंड रचण्यात गोपीनाथ मुंडेंचे योगदान विसरता येणे शक्य नाही. तरीही भाजपने हा जाणूनबूजून केलेला प्रयत्न पंकजांची राजकीय कोंडी करण्यासाठी होता. विधानसभेतील पराभवानंतर राज्याच्या राजकारणात त्यांना कसे प्रभावहीन करता येईल, याचे प्रयत्न झाले. भाजपच्या केंद्रीय संघटनेत वर्णी लावत त्यांना राज्याबाहेर पाठवण्याचा घाट घातला आणि ऊसतोड कामगार संघटनेत फूट पाडण्याचा प्रयत्न झाला. काल साखर संघात शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ऊसतोड कामगारांच्या मागण्यांवर समाधानकारक तोडगा निघाला. प्रारंभी सुरेश धस यांना बैठकीत बसण्यास परवानगी नाकारली आणि त्यांनी तेथेच आंदोलन केले. नंतर त्यांना बैठकीत बसू दिले; पण वाटाघाटी-निर्णयप्रक्रियेत त्यांची फार दखल घेतली गेली नाही. साखर संघ आणि पर्यायाने शरद पवारांची ही खेळी दुर्लक्षून चालणार नाही. या वाटाघाटींना मंत्री धनंजय मुंडेही हजर होते आणि बैठकीत पंकजा यांच्या शेजारीच बसलेले दिसले. या दोघांचे बैठकीत छायाचित्र समाजमाध्यमावर प्रसारित झाले ते सकारात्मक संदेश देणारे होते. सुरेश धस यांचा या संघटनेतील शिरकाव आता मुंडेंना आव्हान ठरणार आहे आणि बीडमध्ये त्यांच्याविरुद्ध हे प्यादे वापरले जाणार हे स्पष्ट झाले. त्यामुळे परवाच्या दसरा मेळाव्यात पंकजांनीच माजी आ. भीमराव धोंडे यांना पहिल्या रांगेत बसविले. या दसरा मेळाव्यात आक्रमक भाषणातून बीडमध्ये राजकीय संघर्ष अटळ असल्याचा संदेश दिला. विधानसभेच्या निवडणुकीतील निकालाकडे पाहिले तर पंकजा मुंडे, भीमराव धोंडे आणि रमेश आडसकर या भाजपच्या तीन उमेदवारांचा पराभव झाला होता. तीन महत्त्वाचे उमेदवार पराभूत होतात ही भाजपसाठी धक्का देणारी बाब होती; पण पंकजांसोबत पराभूत होणारे दोघेंही त्यांचे जिल्ह्याच्या राजकारणातील खंदे समर्थक होते आणि ते पराभूत का झाले, त्यांच्याविरोधात कोणी काम केले हे त्यावेळी जाहीर झाले आहे आणि याच पद्धतीने निवडणुकीनंतर पंकजांचे खच्चीकरण करण्यात पक्षातूनच प्रयत्न झाले. गेल्यावर्षी दसरा मेळाव्यात त्यांनी एकनाथ खडसेंना निमंत्रित केले होते तेव्हाच श्रेष्ठींविरुद्धची त्यांची भूमिका स्पष्ट झाली होती. कालच्या साखर संघाच्या बैठकीत मजुरी,  ऊसतोडणी कामगारांसाठी महामंडळ या मागण्या मान्य करून घेत एका अर्थाने भाजप श्रेष्ठींच्या राजकारणाला शह दिला. आता बीडमध्ये शह-काटशहाच्या राजकारणातील  रंगत पहायला मिळेल. पंकजांचा ‘खडसे’ करण्यात भाजप यशस्वी होतो की पंकजा डाव उलटवतात हे काळच ठरवेल.

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेBJPभाजपाBeedबीडPoliticsराजकारण