शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

Pankaja Munde : पंकजा मुंडे यांचे राजकारण संपवायचे आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2020 03:55 IST

Pankaja Munde News : एकनाथ खडसे राष्ट्रवादीवासी झाल्यानंतर भाजपच्या माळी, धनगर, वंजारी (माधवं) या राजकीय सूत्रांचे नेतृत्व पंकजांकडे येणे क्रमप्राप्त आहे आणि मतांची ही उतरंड रचण्यात गोपीनाथ मुंडेंचे योगदान विसरता येणे शक्य नाही. तरीही भाजपने हा जाणूनबूजून केलेला प्रयत्न पंकजांची राजकीय कोंडी करण्यासाठी होता.

- सुधीर महाजन(संपादक, औरंगाबाद आवृत्ती) 

पंकजा मुंडेंचं काय करायचं, असा प्रश्नच भाजपच्या धुरिणांना पडला काय, असा एकूण माहोल दिसतो. नसता साडेसहा लाख ऊसतोड, कामगार मुकादमांची संघटना ताब्यात असणाऱ्या पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाला चूड लावण्याचा भाजपमधून प्रयत्न झाला नसता. गोपीनाथ मुंडेंनी जी संघटना बांधली आणि साखर कारखानदारीवर एक आपला दबावगट तयार करत बीडमध्ये भाजप तळागळात बळकट केला तिचे नेतृत्त्व नंतर पंकजांकडे येणे साहजिकच होते; पण राजकीय कोंडी करण्याच्या प्रयत्नात भाजपने यावेळी त्यांच्याविरोधात आपल्याच पक्षातील सुरेश धस यांना वापरले. कोरोना महामारीची संधी घेत पंकजा या बीडबाहेर आहेत हे हेरून भाजपने सुरेश धसांना अधिकृत पत्र देऊन महाराष्ट्रभर ऊसतोड कामगार आणि मुकादमांच्या बैठका घेण्याचे अधिकार दिले आणि धस यांनीसुद्धा राज्यात १०६ बैठका घेत वातावरण निर्मिती केली. ही संघटना पंकजा यांच्या हातातून गेली असा एक आभास निर्माण करण्यात ते यशस्वी झाले.महाराष्ट्रातील सर्वच साखर कारखान्यांच्या क्षेत्रात दरवर्षी बीड जिल्ह्यातून साडेसहा लाख ऊसतोड कामगार जातात. या कामगारांनी कोयता खाली टाकला तर एकाही कारखान्याचा बॉयलर पेटू शकत नाही आणि या सर्वांची संघटना गोपीनाथ मुंडेंनी बांधली होती. हे बहुसंख्य कामगार वंजारी समाजाचे असल्याने त्यांची निष्ठा गोपीनाथ मुंडेंनंतर पंकजा मुंडे आणि ओघाने भाजपवर असल्याने एका अर्थाने भाजपची परंपरागत मतपेटी तयार झाली आहे. याच मतपेटीला फोडून समांतर नेतृत्व उभे करण्याचा प्रयत्न भाजपकडून झाला. या संघटनेचा नेता कोण या मुद्द्यावरही भाजपमधील मते-मतांतरे उघड झाली. सुरेश धस यांना पद्धतशीरपणे पुढे आणण्यात आले. एकनाथ खडसे राष्ट्रवादीवासी झाल्यानंतर भाजपच्या माळी, धनगर, वंजारी (माधवं) या राजकीय सूत्रांचे नेतृत्व पंकजांकडे येणे क्रमप्राप्त आहे आणि मतांची ही उतरंड रचण्यात गोपीनाथ मुंडेंचे योगदान विसरता येणे शक्य नाही. तरीही भाजपने हा जाणूनबूजून केलेला प्रयत्न पंकजांची राजकीय कोंडी करण्यासाठी होता. विधानसभेतील पराभवानंतर राज्याच्या राजकारणात त्यांना कसे प्रभावहीन करता येईल, याचे प्रयत्न झाले. भाजपच्या केंद्रीय संघटनेत वर्णी लावत त्यांना राज्याबाहेर पाठवण्याचा घाट घातला आणि ऊसतोड कामगार संघटनेत फूट पाडण्याचा प्रयत्न झाला. काल साखर संघात शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ऊसतोड कामगारांच्या मागण्यांवर समाधानकारक तोडगा निघाला. प्रारंभी सुरेश धस यांना बैठकीत बसण्यास परवानगी नाकारली आणि त्यांनी तेथेच आंदोलन केले. नंतर त्यांना बैठकीत बसू दिले; पण वाटाघाटी-निर्णयप्रक्रियेत त्यांची फार दखल घेतली गेली नाही. साखर संघ आणि पर्यायाने शरद पवारांची ही खेळी दुर्लक्षून चालणार नाही. या वाटाघाटींना मंत्री धनंजय मुंडेही हजर होते आणि बैठकीत पंकजा यांच्या शेजारीच बसलेले दिसले. या दोघांचे बैठकीत छायाचित्र समाजमाध्यमावर प्रसारित झाले ते सकारात्मक संदेश देणारे होते. सुरेश धस यांचा या संघटनेतील शिरकाव आता मुंडेंना आव्हान ठरणार आहे आणि बीडमध्ये त्यांच्याविरुद्ध हे प्यादे वापरले जाणार हे स्पष्ट झाले. त्यामुळे परवाच्या दसरा मेळाव्यात पंकजांनीच माजी आ. भीमराव धोंडे यांना पहिल्या रांगेत बसविले. या दसरा मेळाव्यात आक्रमक भाषणातून बीडमध्ये राजकीय संघर्ष अटळ असल्याचा संदेश दिला. विधानसभेच्या निवडणुकीतील निकालाकडे पाहिले तर पंकजा मुंडे, भीमराव धोंडे आणि रमेश आडसकर या भाजपच्या तीन उमेदवारांचा पराभव झाला होता. तीन महत्त्वाचे उमेदवार पराभूत होतात ही भाजपसाठी धक्का देणारी बाब होती; पण पंकजांसोबत पराभूत होणारे दोघेंही त्यांचे जिल्ह्याच्या राजकारणातील खंदे समर्थक होते आणि ते पराभूत का झाले, त्यांच्याविरोधात कोणी काम केले हे त्यावेळी जाहीर झाले आहे आणि याच पद्धतीने निवडणुकीनंतर पंकजांचे खच्चीकरण करण्यात पक्षातूनच प्रयत्न झाले. गेल्यावर्षी दसरा मेळाव्यात त्यांनी एकनाथ खडसेंना निमंत्रित केले होते तेव्हाच श्रेष्ठींविरुद्धची त्यांची भूमिका स्पष्ट झाली होती. कालच्या साखर संघाच्या बैठकीत मजुरी,  ऊसतोडणी कामगारांसाठी महामंडळ या मागण्या मान्य करून घेत एका अर्थाने भाजप श्रेष्ठींच्या राजकारणाला शह दिला. आता बीडमध्ये शह-काटशहाच्या राजकारणातील  रंगत पहायला मिळेल. पंकजांचा ‘खडसे’ करण्यात भाजप यशस्वी होतो की पंकजा डाव उलटवतात हे काळच ठरवेल.

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेBJPभाजपाBeedबीडPoliticsराजकारण