शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, नोएडात खळबळ! एकाचवेळी ५० शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल; विद्यार्थ्यांना सोडले
2
ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंचे उमेदवार जाहीर; नरेश म्हस्केंना उमेदवारी, नाशिक अद्याप गुलदस्त्यातच
3
'एकेकाळी मी शरद पवारांना दैवत मानायचो, आता मी वेगळा मार्ग स्वीकारला आहे', अजित पवार यांचं विधान
4
'सगळं माहिती असताना मोदींनी प्रज्ज्वल रेवन्नासाठी मतं मागितली'; ओवेसींचा आरोप
5
Akhilesh Yadav : "कोरोना लसीवरून वाद, लोकांना येतोय हार्ट अटॅक"; अखिलेश यादव यांचं भाजपावर टीकास्त्र
6
माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म', महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट!
7
Wipro च्या नव्या सीईओंना किती वेतन मिळणार माहितीये? त्यात येतील दोन प्रायव्हेट जेट!
8
नाशिकमध्ये ठाकरे गटात बंड होणार! एक नेता दीड वर्षापासून तयारी करतोय, अर्ज घेतला
9
किंग खान King Kohli ला म्हणाला 'जावई', अनुष्का-विराटच्या नात्याचा शाहरुख होता साक्षीदार
10
बॉलिवूडच्या या अभिनेत्याच्या होत्या ३०८ गर्लफ्रेंड्स, त्यांना घेऊन जायचा कब्रस्तानात, कारण वाचून व्हाल हैराण
11
काँग्रेसमध्ये राज्यात ऐक्याचे चित्र, एकमेकांच्या पाडापाडीला फाटा; आपापले सुभे सांभाळण्यावर भर
12
"विरोधकांकडे आरोपांशिवाय काही उरलेलं नाही"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हुतात्म्यांना वाहिली आदरांजली
13
महाराष्ट्र दिनानिमित्त नरेंद्र मोदींचं मराठमोळं ट्विट; "परंपरा, प्रगती आणि एकता..."
14
वातावरण टाइट ! साखर पेरणी की जातीचा मुद्दा ? 'शेट्टी-सरुडकर-माने' यांच्यामध्येच फाइट
15
‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
16
Mutual Fund मधील इन्सायडर ट्रेडिंग काय आहे माहितीये? ज्यावर SEBIनं उचलली कठोर पावलं, जाणून घ्या
17
१०० वर्षांपेक्षा जुना इतिहास, Reliance इतकं मार्केट कॅप... Covishield लस तयार करणाऱ्या कंपनीची कहाणी
18
‘समृद्ध आणि बलशाली महाराष्ट्र घडवूया’, महाराष्ट्र दिनी राज्यपाल रमेश बैस यांचं आवाहन
19
मुंबईत आगळा सामना! मुलाविरुद्ध प्रचार करणार वडील;रवींद्र वायकरांसाठी गजानन कीर्तिकर उतरणार मुलगा अमोलविरोधात प्रचारात
20
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांचा भाजपाला इशारा

पंढरीची वारी सुखेनैव होऊद्या !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 11:42 PM

पंढरीची आषाढी वारी म्हणजे वारकरी संप्रदायाचा सुखसोहळाच आहे.

- बाळासाहेब बोचरेपंढरीची आषाढी वारी म्हणजे वारकरी संप्रदायाचा सुखसोहळाच आहे. सावळ्या विठुरायाच्या दर्शनाने सर्व चिंता हरल्याचा आनंद वारकऱ्यांना मिळतो. एवढ्या आनंदासाठी तो अनेक सुखदु:खांचे डोंगर पार करत मैलोन्मैलाची पायपीट करत पंढरीला येत असतो. त्यात कुणीच विघ्न आणू नये.हेचि दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा।वारी चुको न दे हरी।अशी याचना आपल्या विठुरायाच्या चरणी करणाºया वारकºयांना वारी म्हटले की, दुसरे काहीच सुचत नाही. ‘पंढरीसी जारे आल्यानो संसारा’ असं संतांनी सांगितलं आहे. म्हणून पंढरीचा वारकरी हा आषाढी वारी चुकवत नाही. वाटेत येणाºया संकटांची वा ऊन, वारा, पाऊस याची तो तमा बाळगत नाही. किंबहुना संकटांची व गैरसोर्इंची कुणाकडे कुरकुरही करत नाही. सावळ्या विठुरायाची भेट घेऊन त्याला कधी एकदा आलिंगन देतो, अशी अतुरता त्याच्या मनी असते. एकदा का दर्शन झाले की, त्याच्या आनंदाला पारावार राहत नाही. वारी ही केवळ वारकºयांपुरती मर्यादित न राहता इतरही जण वारकºयांची सेवा करून त्यांच्या आनंदात सहभागी होतात. मुखाने हरिनाम घेत निघालेल्या वारकºयांच्या मुखात दोन घास घालून त्यांचा दुवा मिळवण्यातही अनेकांना आनंद मिळतो. अगदी सरकारी कर्मचारी, एस.टी. कर्मचारी, पोलीस, असे कितीतरी सरकारी सेवेधाºयांनाही वारकºयांच्या सेवेत अपार आनंद मिळतो. वारीमध्ये विविध राजकीय पक्षांचे आमदार, खासदार, मंत्रीही चालत असतात. पण ते प्रचारासाठी नव्हे तर वारीचा निखळ आनंद घेण्यासाठी आलेले असतात. वारी हे राजकारणाचे व्यासपीठ नसून प्रपंच किंवा रोजच्या धकाधकीच्या जीवनशैलीपासून बाजूला होऊन वेगळे अन् साधे जीवन जगण्याचे व्रत आहे. या व्रतामध्ये प्रपंचाचा विसर पडतो.काही मंडळींना वारीमध्ये काही संधी दिसतात. वारी आली की वारीत मुख्यमंत्र्यांना रोखणार, महापूजा होऊ देणार नाही, अशा वल्गना केल्या जातात. त्यातले काही जण असे असतात की, त्यांचा अन् पांडुरंगाचा कधी संबंधही आलेला असतो की नाही, हे त्यांनाच माहीत. पण वारी नावाची संधी साधण्याचा मोका अचूक साधतात. यंदाही काही संघटना व राजकीय पक्षांनी निवेदने देऊन मुख्यमंत्र्यांना रोखण्याचा इशारा दिला आहे. श्री विठ्ठलाची पूजा रोखणे म्हणजे सुमारे १० लाख भाविकांच्या आनंदात विघ्न आणण्यासारखे आहे. ज्या समस्या आणि मागण्या असतात, त्यांच्याशी वारकºयांचा संबंध असतोच पण त्याची कुरकुर करण्यासाठी तो पंढरपूरला आलेला नसतो. त्या तो वारीनंतर सोडवून घेतो. वारीच्या आनंद सोहळ्यात जाणूनबुजून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणे म्हणजे पांडुरंगाच्या पूजेत अन् वारकºयांच्या आनंदात व्यत्यय आणल्यासारखे आहे. मुख्यमंत्र्यांना नाही तर देवाला वेठीस धरल्यासारखे आहे.राहुनी पंढरीये जाण। जो नेघे विठ्ठल दर्शन।।महापातकी चांडाळ। त्यांचा न व्हावा विटाळ।।वरील अभंगातून संतांनी अशा थोतांडांना चांगलेच झोडपले आहे. पंढरीत राहूनही पांडुरंगाचे दर्शन न घेणारे आहेत. अशांना विठ्ठलाबद्दल श्रद्धा ती कशी असणार?देवाला वेठीस धरण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरलाच येऊ नये, अशी मागणी केलेली बरी किंवा आंदोलनाचे स्वरूप तरी पंढरपूरला साजेसे हवे. पंढरीच्या तृण आणि पाषाणाला देव मानणारा वारकरी एकदा आषाढी वारीला निघाला की, कितीही संकटे आली तरी माघारी फिरत नसतो. नामदेव पायरीवर मस्तक ठेवायला मिळाले तरी त्याला मोठे आत्मिक समाधान मिळते. अशा वारकºयांना कसलाही व्यत्यय येऊ न देता त्यांची वारी सुखेनैव व्हावी, यासाठी आपण सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारीPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळा