शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

रंगले या रंगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 00:35 IST

रंगाशी नाते सांगणारा एकमेव सण म्हणजे रंगपंचमी़ रंग लावून घ्यायचा आणि इतरांना लावायचाही. माणसांचे चेहरे ओळखता न आले पाहिजेत एवढी रंगाची उधळण. बाहेर रंग खेळायला जाण्यापूर्वी घरच्या देवांवर चिमूटभर रंग टाकून त्याला नमस्कारायचे. एका अर्थाने देवालासुद्धा आपल्यात सहभागी करून घ्यायचे़ केवढा सुंदर विचार.

- डॉ. गोविंद काळेरंगाशी नाते सांगणारा एकमेव सण म्हणजे रंगपंचमी़ रंग लावून घ्यायचा आणि इतरांना लावायचाही़ माणसांचे चेहरे ओळखता न आले पाहिजेत एवढी रंगाची उधळण़ बाहेर रंग खेळायला जाण्यापूर्वी घरच्या देवांवर चिमूटभर रंग टाकून त्याला नमस्कारायचे़ एका अर्थाने देवालासुद्धा आपल्यात सहभागी करून घ्यायचे़ केवढा सुंदर विचाऱ तसे रंगाबद्दलचे बरेच काही घरात वेळोवेळी कानी पडत आले़ माधव शाळेतून खूप उशिरा घरी आला़ वडील धास्तावलेले़ एकदम ओरडले़ ‘तुझे थोबाड रंगवायला पाहिजे’़ म्हणजे थोबाड रंगवतात तर! सणासुदीला विडा खाण्याचे स्वातंत्र्य सर्वांनाच़ कोणाची जीभ जास्त रंगते याची स्पर्धा हमखास रंगायची़ शकूला पाहायला मुलाकडची मंडळी आली होती़ सुधीरच्या हातातून चहाचा कप पडला नि फु टला़ पाहुणे गेल्यावर बाबा खूपच रागावले ‘सगळ्या कार्यक्रमाचा बेरंग करून टाकला म्हणूऩ’ रंगाचा बेरंगही होतो तर!पावसाळ्यात केव्हा तरी इंद्रधनुष्याची सप्तरंगी कमान दिसते म्हणतात़ खरेच सांगतो त्यात सातरंग मला केव्हाच दिसले नाहीत़ शाळेत असताना सात रंगांची नावे लक्षात राहावी यासाठी विजयने ‘जातानाही पाणी पी’ असे सूत्र सांगितले होते़ जा-जांभळा, ता-तामडा, ना-नारिंगी, हि-हिरवा, पा-पांढरा, नि-निळा, पि-पिवळा़ तर असे हे सूत्र ‘जातानाही पाणी पी’सुरेश भट नावाचे गजलकार आले नि त्यांनी आपला वेगळा रंग जोपासला़‘रंगूनी रंगात साºया रंग माझा वेगळागुंतुनी गुंत्यात साºया पाय माझा मोकळा’वेगळ्या रंगाचे गारुड तर काही वर्षे आमच्या मनावर अधिराज्य करून होते़ वेगळ्या रंगाची जपणूक करण्यापेक्षा ‘अवघा रंग एक झाला’ हे अद्वैत तत्त्वज्ञान अधिक जवळचे वाटे़ द्वैत काय नि अद्वैत काय? अंतिम घडीला सारेच रंग सरतात़ अण्णा माडगूळकरांनी संपलेल्या मैफिलीचे केवढे सुंदर वर्णन स्वभावोक्ती अलंकारातून केले आहे‘कोन्यात झोपली सतार सरला रंगपसरली पैंजणे सैल सोडूनी अंग’रंगाच्या दुनियेत किती काळ रमायचे? नि रंगायचे? कोणता रंग जीवनाला आत्मतृप्ती देईल की जो लावल्यानंतर सारे रंग विस्मृतीच्या गर्तेत जातील़ शेवटी शरण तुकोबांनाच जायचे़‘रंगले या रंगे पालट न धरी़खेवले अंतरी पालटेना’श्रीकृष्णाच्या रंगात मन रमले की तो रंग पालटत नाही़ ते रूप अंतरी बिंबले की हलत नाही़

टॅग्स :Holi 2018होळी २०१८Holiहोळी