शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
3
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
4
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
5
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
6
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
7
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
8
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
9
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
10
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
11
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
12
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
13
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
14
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
15
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
16
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
17
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
18
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
19
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
20
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं

पं.उल्हास बापट : जादुई संगीताचा निगर्वी कलावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 12:15 AM

संतूर या लोकसंगीतातील वाद्याला भारतीय शास्त्रीय संगीताचे ‘सोलो’ वाद्य म्हणून मानाचे स्थान मिळवून देण्यात ज्यांनी निष्ठेने अपार मेहनत घेतली, अशा प्रतिभावंत कलावंतांमध्ये पं. उल्हास बापट यांचे प्रमुख स्थान आहे. उल्हासजींच्या जादुई संगीताने रसिकांच्या दोन पिढ्यांना तृप्त केले. ‘संतूर’ने मला ओळख दिली, असे म्हणून तिच्या ऋणात राहिलेल्या या गुणी व निगर्वी कलावंतास वाहिलेली अल्पशी श्रद्धांजली.

- अमदेन्द्र धनेश्वरसंतूर या लोकसंगीतातील वाद्याला भारतीय शास्त्रीय संगीताचे ‘सोलो’ वाद्य म्हणून मानाचे स्थान मिळवून देण्यात ज्यांनी निष्ठेने अपार मेहनत घेतली, अशा प्रतिभावंत कलावंतांमध्ये पं. उल्हास बापट यांचे प्रमुख स्थान आहे. पं. रविशंकर यांनी स्थापन केलेल्या ‘संचारिणी’ या संस्थेसाठी मुंबईत १९७५ मध्ये केलेल्या पहिल्या जाहीर कार्यक्रमापासून उल्हासजींच्या जादुई संगीताने रसिकांच्या दोन पिढ्यांना तृप्त केले. ‘संतूर’ने मला ओळख दिली, असे म्हणून तिच्या ऋणात राहिलेल्या या गुणी व निगर्वी कलावंतास वाहिलेली अल्पशी श्रद्धांजली.‘ओन्ली पॅशन, ग्रेट पॅशन कॅन एलेव्हेट मेन टू द ग्रेट थिंग्ज’ या ग्रीक विचारवंताचे हे वचन संतूरवादक पं. उल्हास बापट यांना तंतोतंत लागू पडते. अत्यंत पोरसवदा वयात त्यांनी शिवकुमार शर्मांचा संतूर प्रथम ऐकला. त्या नादाने ते इतके मोहित झाले की, त्यांनी स्वत: संतूरवादनाची विद्या व तंत्र आत्मसात केले आणि त्यावर असाधारण प्रभुत्व मिळवले. एक संतूरवादक म्हणून त्यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आणि अवघ्या संगीतजगतावर आपली छाप टाकली.त्यांचा जन्म संगीतकाराच्या घराण्यात झाला नव्हता. त्यांचे वडील पोलीस अधिकारी होते. पण मुलात असलेले गुण त्यांनी पारखले आणि त्याला रमाकांत म्हापसेकरांकडे तबला शिकण्यासाठी पाठविले. उल्हासना या शिक्षणाचा पुढे फारच उपयोग झाला. कारण संतूर हे वाद्य लयीच्या अंगाने खुलणारे आहे. रागदारीचे आणि एकूण रागसंगीताचे शिक्षण त्यांनी कृष्णा गुंडो गिंडेसाहेबांकडे व वामनराव सडोलीकरांकडे घेतले. अशारीतीने रागांवर प्रभुत्व मिळवल्यानंतर सरोदवादक झरीन शर्मांकडे तंतूवादनाचे शिक्षणही त्यांना मिळाले. एक चतुरस्र वादक म्हणून १९७० च्या दशकात त्यांचे नाव होऊ लागले.बापट यांनी क्रोमॅटिक ट्युनिंग नावाची वाद्य जुळविण्याची पूर्णपणे स्वतंत्र आणि वेगळी शैली विकसित केली. त्यामुळे संतूरच्या अंगभूत मर्यादा त्यांना वादक या नात्याने ओलांडता आल्या. संतूरवादनातील हा बदल क्रांतिकारक होता. एकदा मुुंबईच्या नेहरू सेंटरमध्ये ‘संतूर संध्या’ नावाचा कार्यक्रम होता. त्यात बापट यांनी श्रोत्यांना फर्माईश विचारली. ‘बागेश्री’ आणि ‘जयजयवंती’पासून मालकंसपर्यंत अनेक फर्माईर्शी आल्या. सुहास्यवदनाने त्यांनी त्या ऐकल्या आणि मेंदूत टिपून ठेवल्या आणि उत्स्फूर्तपणे एक रागमाला रचून तिथल्या तिथे श्रोत्यांसमोर सादर केली. संतूरच्या इतिहासातील या अजब करामतीला श्रोत्यांनी भरभरून दाद दिल्याचे स्मरते.बापट यांचे वाद्य जुळविण्याचे तंत्र संगीत दिग्दर्शक राहुल देव बर्मन यांनी प्रथम पाहिले, तेव्हा ते विस्मयचकित झाले होते. त्यांनी बापटना शपथच घातली. ‘ये स्टाईल कभीभी मत बदलना. कसम खाओ’. आर. डी., खय्याम, वनराज भाटिया, अशोक पत्की, श्रीनिवास खळे, अनिल मोहिले, कौशल इनामदार वगैरे संगीत दिग्दर्शकांचे ते अत्यंत लाडके संतूरवादक होते. मिंड आणि गमक संतूरमधून निर्माण करणारे आणि सरोद आणि सतार या वाद्यांच्या स्तरावर संतूरला नेऊन पोहोचविणारे पं. उल्हास बापट हे अत्यंत मिश्किल आणि विनोदप्रिय होते. ५० दिवस रुग्णशय्येवर निपचित पडून त्यांना जगाचा निरोप घ्यावा लागावा, हा दैवदुर्विलास आहे.

टॅग्स :musicसंगीतcultureसांस्कृतिकMaharashtraमहाराष्ट्र