शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

थकबाकीचा शॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 12:35 AM

आपण लोकप्रतिधी झालो म्हणजे आपल्याला सर्वकाही माफ असते, अशी प्रवृत्ती येत्या काळात वाढीस लागली आहे. काल-परवा नागपुरात वीज बिल थकबाकीसाठी पुढाकार घेणा-या एसएनडीएलच्या कार्यालयात माजी महापौर प्रवीण दटके यांच्या नेतृत्वात...

आपण लोकप्रतिधी झालो म्हणजे आपल्याला सर्वकाही माफ असते, अशी प्रवृत्ती येत्या काळात वाढीस लागली आहे. काल-परवा नागपुरात वीज बिल थकबाकीसाठी पुढाकार घेणा-या एसएनडीएलच्या कार्यालयात माजी महापौर प्रवीण दटके यांच्या नेतृत्वात भाजप कार्यकर्त्यांनी घातलेला धुडगूस व युवक काँग्रेसचे अध्यक्ष बंटी शेळके यांच्या कुटुंबीयांनी एसएनडीएलच्या पथकाला केलेली मारहाण ही याची प्रातिनिधिक उदाहरणे आहेत. महावितरणतर्फे ‘शून्य थकबाकी’ मोहीम राबवून पहिल्या दोन दिवसातच नागपूर परिक्षेत्रातील १५ हजार ७०२ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आला. या सामान्य नागरिकांनी ओरड केली नाही. उलट सोय नसतानाही थकीत बिल भरण्यासाठी पुढाकार घेतला. तर दुसरीकडे नगरसेवकांकडे थकबाकी असल्यामुळे वीज कापण्यास गेलेल्या पथकाला विरोध करीत हल्ले करण्यात आले. पंतप्रधान मोदी जनतेची कशी फसवणूक करीत आहेत हे सांगण्यासाठी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष बंटी शेळके वाराणशी पर्यंत बाईक रॅली काढतात. तर दुसरीकडे त्यांचेच कुटुंबीय वीज बिल थकवितात व वसुलीसाठी येणाºया पथकावर हल्ला चढवतात. व्यक्तिगत हितापेक्षा सार्वजनिकहिताला प्राधान्य द्या, असे गडकरी, फडणवीस वारंवार सांगतात. मात्र, दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे नेते आपल्या नगरसेवकांची थकबाकी वाचविण्यासाठी यंत्रणेवर दबाव टाकताना दिसतात. हा विरोधाभास न पटण्यासारखा आहे. वीज बिल आकारणीवर कुणाचाही आक्षेप असू शकतो. मात्र, तो आक्षेप कायदेशीर मार्गाने नोंदवायला हवा. त्या विरोधात न्यायालयीन लढा द्यायला हवा. मात्र, आलेले बिल आपल्याला मान्य नाही असे सांगून ते भरणारच नाही, अशी उद्दाम भूमिका घेणे लोकशाहीच्या संस्कारात बसत नाही. लोकहिताची कामे करण्यासाठी आपण राजकारणात आलो, असा कांगावा करणारे नगरसेवक जर स्वत:ची देणी थकविण्यासाठी आपल्याचा राजकीय प्राबल्याचा वापर करीत असतील तर त्यांना या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार आहे का, याचे आत्मचिंतन त्या ‘सेवकांनी’ करण्याची गरज आहे. सामान्य नागरिकांकडे हजार रुपयांचे बिल थकीत असले तरी एसएनडीएल लगेच कारवाई करते. सामान्यांच्या विनंतीला काही तासांचीही मुदत दिली जात नाही. तर दुसरीकडे नगरसेवक म्हणून वावरणाºयांकडे तब्बल १० हजारापासून ते ५० हजार रुपयांपर्यंत थकबाकी होईपर्यंत मीटरला हातही लावला जात नाही. एसएनडीएलने सुरुवातीलाच दिलेली सवलत नंतर मग अशी त्यांच्याच अंगावर येते. यापासून यंत्रणेनेही धडा घेणे आवश्यक आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणMaharashtraमहाराष्ट्र