शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

पुस्तकाबाहेरचे शिक्षण मुलांना निर्भयपणे शिकता यावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2019 04:45 IST

बालसाहित्याचे किंवा साहित्याचे नेमके प्रयोजन काय? मुलांना शिकविणे, उपदेश करणे, तात्पर्य सांगणे, संस्कार करणे किंवा त्यांना घडविणे हे तर नव्हे आणि नव्हेच.

- राजीव तांबेबालसाहित्याचे किंवा साहित्याचे नेमके प्रयोजन काय? मुलांना शिकविणे, उपदेश करणे, तात्पर्य सांगणे, संस्कार करणे किंवा त्यांना घडविणे हे तर नव्हे आणि नव्हेच. बालसाहित्याचं प्रयोजन आहे, मुलांना दृष्टी देणं आणि मुलांना आनंद देत त्यांच्या विविध संकल्पनांबाबतच्या कक्षा रुंदावत नेणं. बालसाहित्य हे मुलांना शिकवत नाही, तर शिकण्याच्या अनेकानेक पद्धती, विविध पर्याय मुलांसमोर सहजी उलगडून ठेवत आणि मुलाला त्याच्यातील सूप्त शक्ती व सर्जनशीलता यांची जाणीव करून देतं. कारण बालसाहित्याचा पाया हा ‘मुलांना गृहित धरणे’ हा नसून ‘मुलांवरचा अपार विश्वास आणि मुलांवर निरपेक्ष प्रेम’ हा आहे.आज मुलं खरंच वाचतात का, याचं उत्तर हो आणि होच आहे, पण प्रश्न असा आहे की, मुले वाचताना पाहतात का? ऐकतात का? आणि वाचनानुभव सोबत घेऊन जगतात का? आज कुठलीही साहित्यकृती यशस्वी होत आहे, असे दिसू लागले की, तिच्यावर विविध माध्यमांतून बाजारू आक्र मण होते. उदाहरण घ्यायचे झाले, तर हॅरी पॉटरच्या पुस्तकांची तडाखेबंद विक्र ी होऊ लागली आणि काही काळातच हॅरी पॉटरचे सिनेमे जगातल्या सर्व भाषांत झळकू लागले. त्याला पूरक म्हणून मुलांच्या टी शर्टवर, पेनावर, चॉकलेटवर हॅरी पॉटर चमकू लागला आणि याचा मोठा दुष्परिणाम म्हणजे सगळ्या वाचकांना वाचताना एकच एक हॅरी पॉटर दिसू लागला. वाचताना ‘आपला हॅरी पॉटर’ पाहण्याची क्षमताच दुबळी झाली. वाचताना मी काय पाहायचं हे आता इतरच ठरवू लागले. आपला हॅरी पॉटर ठरवताना जी कल्पनाशक्ती रमेनाशी झाली.मुलांना जसे वेगवेगळे साहित्य प्रकार वाचायला मिळायला हवेत, तसेच वेगवेगळे प्रकार लिहायलाही मिळायला हवेत. शाळेत मुलांना खूपच चाकोरीबद्ध लेखन करावं लागतं. ठरलेल्या पद्धतीनेच निबंध लिहिणे. विशिष्ट प्रकारेच कवितेचे रसग्रहण करणे किंवा टिपा लिहिणे. काही वेळा तो त्या सिस्टीमचा एक भागही असतो, पण सततची चाकोरी ही सर्जनशीलतेला कमालीची मारक ठरते. मग कोवळ्या वयातच मुलांची सर्जनशीलता कठोरपणे ठेचली जाते आणि त्यांचे शिस्तबद्ध सैनिकांत रूपांतर होते.

प्रत्येक शाळेत महिन्यातून किमान दोन तासिका जरी ‘मुलांच्या सर्जनशील उपक्रमांसाठी’ राखून ठेवल्या तरी खूप फरक पडू शकेल. यावेळी मुलांना पुस्तकाबाहेरचं शिकणं निर्भयपणे अनुभवता आलं पाहिजे. ‘निर्भयपणे’ म्हणजे या तासिकांच्या वेळी मुलांना ‘नाही’ म्हणण्याचे स्वातंत्र्यही असावे. या दोन तासिकांच्या वेळी मुले त्यांना जे पाहिजे ते लिहितील, वाचतील, चित्र काढतील किंवा त्यांना जे काही सांगायचं असेल, ते वर्गासमोर मोकळेपणाने मांडतील, पण या तासिकांचा अभ्यासक्र म मात्र तयार करायचा नाही.प्रत्येक वर्गाची भित्तीपत्रिका (वॉल पेपर) जरी सुरू केली, तरी त्यावर मुलांना त्यांच्या आवडीचं त्यांच्या पद्धतीने लिहिता येईल. जेव्हा मुले लेखनाच्या वेगवेगळ्या प्रकारातून स्वत:ला व्यक्त करू लागतील किंवा आपल्या मनातील विचार आपल्याच भाषेत मांडण्यासाठी अनेकानेक अभिनव प्रकार शोधू लगतील, तेव्हा साहजिकच मुले साहित्यातील विविध प्रकार वाचण्यासाठी उद्युक्त होतील.रवींद्रनाथांनी वयाच्या ऐंशीव्या वर्षी बालशिक्षणाचा ध्यास घेतला. बंगाली भाषा शिकण्यास मदत करणाऱ्या ‘सहज पाठ’ या तीन पुस्तिका लिहिल्या. त्यानंतर लिहिली अंकलिपी. बंगालमधील प्रत्येक मुलाच्या हे सहज पाठ, तोंडपाठ आहेत, ते शासनाने सक्ती केली म्हणून नव्हे, तर ते मुलांना आपले वाटतात म्हणून. हे सहज पाठ म्हणजे ‘शरीर शिक्षणाचे, पण आत्मा म्हणजे गाणी, गोष्टी, कविता, संगीत व गमती-जमती.’ मुलांचं नातं हे आत्म्याशी असतं शरीराशी नाही, याची रवींद्रनाथांना जाणीव होती. मुले गोष्टी वाचत, गाणी म्हणत, गमती-जमती करत कधी शिकली हे त्यांना कळतंच नसे. केवळ मनोरंजन नाही, तर ‘करी मनोरंजनातून शिक्षण जो मुलांचे जडेल नाते प्रभूशी तयाचे’ असा त्यांचा दृष्टिकोन होता.
मला इथे एक कल्पना सुचवाविशी वाटते. ‘जगातले सर्वश्रेष्ठ बालसाहित्य त्या-त्या वयोगटाचा विचार करून एकत्रितपणे प्रकाशित करायला हवं.’ इतर भाषांत व वेगवेगळ्या देशात काय-काय मजा आहे, हे मुलांना समजायलाच हवं. निवडक बालसाहित्याचा १00 पुस्तकांचा एक संच करायला हवा. किंबहुना जागतिक बालसाहित्याची एक वेबसाइट तयार व्हायला हवी. त्याला निश्चितच उत्तम प्रतिसाद मिळेल. सांगा कधी करू या सुरुवात? म्हणजे मग खºया अर्थाने ‘वाचनातून शिक्षण आणि शिक्षणातून वाचन’ नक्की सुरू होईल.(बालसाहित्यिक)