शहरं
Join us  
Trending Stories
1
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
2
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या
3
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
4
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
5
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी
6
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
7
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
8
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
9
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
10
पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
11
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक
12
जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण
13
विशिष्ट समुदायासाठी उभारली जाते इमारत; गृहनिर्माण संस्थांना सदस्य निवडीचा अधिकार आहे का?
14
धगधगत्या ज्वालेतून आली जगन्माता, भक्ती दाटते नाव घेता...; कुलस्वामिनीच्या उत्सवाचे विविध रंग
15
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
16
दिवाळीच्या फटाक्यांवर सरसकट बंदीने प्रदूषणाचा प्रश्न सुटेल काय?
17
सुंदर पिचाई, नाडेला यांची ‘अळी मिळी गुपचिळी’ का?; आयटी क्षेत्रात मोठी अस्वस्थता
18
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
19
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
20
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन

शाश्वत विकासासाठी अणुऊर्जेचा पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 06:52 IST

लगाम विकासाच्या मागे धावणाऱ्या मानवाने आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतलेली आहे. विकासासाठी आवश्यक असणारी ऊर्जा निर्माण करताना असो किंवा ...

लगाम विकासाच्या मागे धावणाऱ्या मानवाने आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतलेली आहे. विकासासाठी आवश्यक असणारी ऊर्जा निर्माण करताना असो किंवा त्या विकासाची फळे चाखताना असो, माणसाने कधीच निसर्गाचा विचार केला नाही. आजचे चित्रही फारसे वेगळे नाही.

आजमितीला जगात निर्माण केल्या जाणाऱ्या ऊर्जेपैकी जवळजवळ ८0 टक्के ऊर्जा ही जीवाश्म इंधन म्हणजे कोळसा, खनिज तेल किंवा खनिज वायू वापरून निर्माण केली जाते. याशिवाय घरगुती इंधन म्हणून, तसेच वाहनांसाठीही फार मोठ्या प्रमाणावर आपण जीवाश्म इंधन वापरतो. यातून आपल्याला आपल्या जीवनाला आणि विकासाला हवी असलेली ऊर्जा मिळते, यात शंका नाही, पण या वापरामधून, तसेच इतरही अनेक उद्योगधंद्यांमधून आपण वातावरणात मोठ्या प्रमाणावर कार्बनडाय आॅक्साइड, मिथेन, हायड्रोफ्लुरोकार्बन्स, क्लोरोफ्लुरोकार्बन्स, नायट्रस आॅक्साइड यासारखे हरितगृह वायू उत्सर्जित करतो. हे वायू वातावरणात उष्णता साठवून ठेवतात. गेल्या कित्येक शतकांमधील मानवी कृतीमुळे या वायूंचे वातावरणातील नैसर्गिक संतुलन बिघडल्यामुळे पृथ्वीचे सरासरी तापमान सातत्याने वाढत आहे. या शतकाच्या शेवटास ही वाढ १.५ अंश सेल्सिअस एवढी असेल, असा तज्ज्ञांचा अंदाज होता आणि आता तर ती २.0 अंश सेल्सिअस एवढी होईल, अशी भीती या शास्त्रज्ञांना वाटत आहे.

दिसायला हा वाढीचा आकडा जरी छोटा दिसला, तरी याचे परिणाम फार भयंकर आहेत. भीषण दुष्काळ, महापूर, महाविनाशकारी वादळे, मोठ्या प्रमाणावर बर्फ वितळल्यामुळे सागराच्या पातळीत वाढ आणि त्यामुळे बुडणारी हजारो बेटे, किनाºयावरच्या शहरांचे बुडणारे मोठमोठे विभाग, वाढती रोगराई, असे अनेक महाभयंकर दुष्परिणाम या तापमान वाढीमुळे संभवतात. हे रोखण्यासाठी तातडीने प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण या चक्राचा कालावधी फार मोठा आहे. म्हणजे, अगदी आजच्या आज जरी आपण या हरितगृह वायुंची निर्मिती आजच्या पातळीला रोखली, तरी त्याचा हवामान बदलावरील परिणाम दृश्य होण्यासाठी सुमारे शंभर वर्षे जावी लागतील.यामुळेच या संकटातून कसे बाहेर पडायचे, याचा अभ्यास करण्याकरिता संयुक्त राष्ट्रसंघ आणि जागतिक हवामान संस्था यांनी १९८८ मध्ये आंतरशासकीय हवामान बदल मंडळ या आंतरराष्ट्रीय मंडळाची स्थापना केली. हे मंडळ या समस्येचा सखोल अभ्यास करून सदस्य राष्ट्रांनी या संकटाची घोडदौड रोखण्यासाठी काय पावले उचलावीत, याबाबत वेळोवेळी मार्गदर्शन करते. या मंडळाच्या ताज्या अहवालात या संकटाशी सामना करण्यासाठी, त्याची तीव्रता कमी करण्यासाठी जे अनेक उपाय सुचविले आहेत, त्यात एक आहे अणुऊर्जेचा वाढत्या प्रमाणात वापर. अणुऊर्जेच्या निर्मितीत हरितगृह द्रव्यनिर्मिती नगण्य प्रमाणात होत असल्याने, वीजनिर्मितीमध्ये पुननिर्माणक्षम ऊर्जेच्या बरोबरीने अणुशक्तीचा वापर व्हावा, अशी या मंडळाची धारणा आहे.

थ्री माइल आयलँड, चेर्नोबिल आणि फुकुशिमाच्या घटना आणि अणुभट्टीतून निर्माण होणाºया दीर्घ आणि अतिदीर्घ अर्धायुष्य असणाºया किरणोत्सारी कचºयाच्या सुरक्षित विल्हेवाटीचा प्रश्न या दोन गोष्टींनी आज जनमानस बव्हंशी अणुऊर्जेच्या विरोधात आहे. जनमताच्या या रेट्यामुळे अनेक विकसित देशांनी, विशेषत: युरोपीयन देशांनी त्यांच्या अणुऊर्जा कार्यक्र मात कपात केली आहे किंवा तो टप्प्याटप्प्याने बंद करण्याचे राजकीय आश्वासन दिले आहे. अशा परिस्थितीत आंतरशासकीय हवामान बदल मंडळाची ही शिफारस पाहून अनेकांच्या भुवया वर जातील यात शंकाच नाही.

परंतु या प्रश्नाचा म्हणजेच मानवजातीच्या अस्तित्वाच्या प्रश्नाचा साकल्याने विचार केला, तर असे लक्षात येईल की, वरवर विसंवादी वाटणारी ही शिफारस सखोल विचारांती करण्यात आलेली आहे. कारण अणुशक्तीच्या सुरक्षिततेत आज खूपच सुधारणा झालेली आहे, नव्या पिढीच्या अणुभट्ट्या अत्यंत सुरक्षित आहेत. किरणोत्सारी कचºयाच्या विल्हेवाटीच्या प्रश्नावरसुद्धा आधुनिक तंत्रज्ञान मार्ग शोधेल, याचे आशाकिरण आज दिसू लागले आहेत. त्वरक प्रेरित प्रणाली ही दीर्घ आणि अतिदीर्घ अर्धायुष्य असणाºया किरणोत्सारी समस्थानिकांचे रूपांतर तुलनेने लघू अर्धायुष्य असणाºया समस्थानिकांमध्ये करू शकेल, अशी खात्री शास्त्रज्ञांना वाटत आहे. यामुळेच सुरक्षितरीत्या आणि पर्यावरणाची हानी न करता, अणुऊर्जा निर्माण करून शाश्वत विकास साधता येईल, असे या शास्त्रज्ञांना वाटते.थोडक्यात, आपल्यापुढे दोन पर्याय आहेत. पहिला म्हणजे पृथ्वीच्या तापमानातील सातत्याने होणाºया वाढीमुळे येणाºया भीषण परिस्थितीला मुकाट शरण जायचे किंवा हातातले विज्ञान आणि तंत्रज्ञान वापरून, कोणताही अभिनिवेश न बाळगता, शक्य त्या सर्व पर्यायांचा वापर करून येणाºया या संकटाचा सामना करायचा. निर्णय आपल्यालाच घ्यायचा आहे.

- शशिकांत धारणेविज्ञान विषयाचे अभ्यासक