शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

‘विरोधासाठी विरोध’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2018 07:04 IST

नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत आणि देशातील अनेक नेते त्या पदाचे इच्छुक असले तरी त्यापैकी राहुल गांधी वगळता दुसऱ्या कुणालाही राष्ट्रीय पातळीवर मान्यता नाही

२०१९ च्या मे महिन्यात होणारी लोकसभेची निवडणूक जसजशी जवळ येईल तसतसे देशाचे राजकारण तापत जाईल व त्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी वाढत जातील. त्या अधिकाधिक धारदार व प्रसंगी विषारीही होतील. लोकसभेची निवडणूक ही आता प्रत्यक्षात पंतप्रधानांचीच निवडणूक झाली असल्याने त्या पदावर असलेले वा येऊ शकणारे नेते या आरोपांच्या फैरींचे लक्ष्यही असतील. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत आणि देशातील अनेक नेते त्या पदाचे इच्छुक असले तरी त्यापैकी राहुल गांधी वगळता दुसऱ्या कुणालाही राष्ट्रीय पातळीवर मान्यता नाही वा तशी प्रतिमा लाभलेली नाही. एका इंग्रजी नियतकालिकाने सर्वेक्षणात राहुल गांधी हे २७ टक्के जनतेच्या मान्यतेसह विरोधी नेत्यातील सर्वात आघाडीवर असलेले तरुण नेते असल्याचे म्हटले आहे. मोदींची मान्यता त्या नियतकालिकाने ४७ टक्के एवढी सांगितली आहे. त्यामुळे यापुढे काँग्रेसकडून मोदींवर आणि भाजपकडून राहुल गांधींवर टीकेचा भडिमार होईल हे अपेक्षित आहे. तो व्हावा आणि तसा तो होणे लोकशाहीत अपेक्षितही आहे. मात्र या टीकेत काही तारतम्य, विवेक किंवा निदान खरेपण असावे हेही त्याचवेळी अपेक्षित आहे. देशातली सगळी माध्यमे आणि प्रचाराच्या यंत्रणा त्यांच्या मालक व संचालकांसह सध्या मोदींच्या व भाजपच्या नियंत्रणात आहेत. त्यांचा पक्ष सत्तेवर आणि परिवार देशातील बहुसंख्यकांवर त्याचा हक्क सांगणारा आहे. एवढे मोठे पाठबळ मागे असताना त्यांच्याकडून राहुल गांधींवर होत असलेल्या टीकेचा सूर व त्यातले विखारीपण पाहिले की सत्ताधाºयांना त्यांच्या सत्ताकाळाची शाश्वती वाटते की नाही असा प्रश्न एखाद्याला पडावा. राहुल गांधी हे नको तशी बदनामी व टवाळी ऐकून आता राष्ट्रीय पातळीवर मान्यता पावलेले नेते झाले आहेत. मात्र अजूनही त्यांच्याविषयी केला जाणारा खोटा व दुटप्पी प्रचार पाहिला की उपरोक्त शंकाच अधिक बळावत जाते. या आठवड्यात राहुल गांधींनी इंग्लंड, जर्मनी व अन्य पाश्चात्त्य देशांचा दौरा करून तेथील भारतीयांसमोर भाषणे केली. त्यांचे एक भाषण इंग्लंडच्या पार्लमेंटच्या सभासदांसमोरही झाले. त्या भाषणात बोलताना राहुल गांधींनी ‘भारतातील वाढते दारिद्र्य व विषमता येथील तरुणाईला आतंकवादाकडे आकर्षित करील, उपेक्षितांना गप्प राहू न देता रस्त्यावर आणील आणि सरकारचे याकडे होत असलेले दुर्लक्ष या विघटनाला जास्तीची गती देईल’ असे उद्गार काढले. त्यात खोटे वा विपर्यस्त असे काही नव्हते. शिवाय ते विदेशातील भारतीयांनाच देशाची स्थिती सांगत होते. ते देशाविषयी बोलले, राजकारण बोलले नाहीत. तरीही राहुल गांधींनी विदेशात जाऊन स्वदेशाची बदनामी केली असा कांगावा भाजपच्या प्रवक्त्यांनी आता चालविला आहे. त्या बिचाºयांना विस्मरणाचा आजार असावा. २०१४ ची निवडणूक जिंकल्यानंतर नरेंद्र मोदींनी अमेरिकेतील न्यूयॉर्क स्क्वेअरवर व चीनमधील शांघाय या शहरात जी भाषणे केली ती पूर्णपणे राजकारणी होती. त्यात काँग्रेसच्या जुन्या राजवटींवर टीका होती. डॉ. मनमोहनसिंग यांच्या सरकारच्या उत्तरकाळाचे वाभाडे होते. १९४७ नंतरची सगळी सरकारे अकार्यक्षम व भ्रष्ट होती हा प्रचार होता. राहुल गांधींच्या भाषणात देश होता, पक्ष नव्हते. द्वेषाचे राजकारण जगात दुही व विषाक्त वातावरण उभे करील याउलट गांधीजींचा विचार व प्रेमाचा संदेश जगात शांतता राखील असे ते म्हणाले. नरेंद्र मोदींवर अविश्वासाचा ठराव आणल्यानंतरही आपण त्यांना जी मिठी मारली ती याच स्नेहाची द्योतक होती असेही त्यांनी त्या भाषणात सांगितले. जगभरातील आजची अस्वस्थता भारतासह जगालाही चांगले जगू देणार नाही हा त्यांचा संदेश तर त्यांच्या विरोधकांनीही लक्षात घ्यावा असा आहे. दुर्दैव याचे की ‘विरोधासाठी विरोध आणि सत्तेसाठी वाट्टेल ते’ असे धोरण अंगिकारणाºयांकडून तशा समंजसपणाची अपेक्षा करण्यात फारसा अर्थ नसतो एवढेच.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधी