शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

‘विरोधासाठी विरोध’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2018 07:04 IST

नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत आणि देशातील अनेक नेते त्या पदाचे इच्छुक असले तरी त्यापैकी राहुल गांधी वगळता दुसऱ्या कुणालाही राष्ट्रीय पातळीवर मान्यता नाही

२०१९ च्या मे महिन्यात होणारी लोकसभेची निवडणूक जसजशी जवळ येईल तसतसे देशाचे राजकारण तापत जाईल व त्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी वाढत जातील. त्या अधिकाधिक धारदार व प्रसंगी विषारीही होतील. लोकसभेची निवडणूक ही आता प्रत्यक्षात पंतप्रधानांचीच निवडणूक झाली असल्याने त्या पदावर असलेले वा येऊ शकणारे नेते या आरोपांच्या फैरींचे लक्ष्यही असतील. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत आणि देशातील अनेक नेते त्या पदाचे इच्छुक असले तरी त्यापैकी राहुल गांधी वगळता दुसऱ्या कुणालाही राष्ट्रीय पातळीवर मान्यता नाही वा तशी प्रतिमा लाभलेली नाही. एका इंग्रजी नियतकालिकाने सर्वेक्षणात राहुल गांधी हे २७ टक्के जनतेच्या मान्यतेसह विरोधी नेत्यातील सर्वात आघाडीवर असलेले तरुण नेते असल्याचे म्हटले आहे. मोदींची मान्यता त्या नियतकालिकाने ४७ टक्के एवढी सांगितली आहे. त्यामुळे यापुढे काँग्रेसकडून मोदींवर आणि भाजपकडून राहुल गांधींवर टीकेचा भडिमार होईल हे अपेक्षित आहे. तो व्हावा आणि तसा तो होणे लोकशाहीत अपेक्षितही आहे. मात्र या टीकेत काही तारतम्य, विवेक किंवा निदान खरेपण असावे हेही त्याचवेळी अपेक्षित आहे. देशातली सगळी माध्यमे आणि प्रचाराच्या यंत्रणा त्यांच्या मालक व संचालकांसह सध्या मोदींच्या व भाजपच्या नियंत्रणात आहेत. त्यांचा पक्ष सत्तेवर आणि परिवार देशातील बहुसंख्यकांवर त्याचा हक्क सांगणारा आहे. एवढे मोठे पाठबळ मागे असताना त्यांच्याकडून राहुल गांधींवर होत असलेल्या टीकेचा सूर व त्यातले विखारीपण पाहिले की सत्ताधाºयांना त्यांच्या सत्ताकाळाची शाश्वती वाटते की नाही असा प्रश्न एखाद्याला पडावा. राहुल गांधी हे नको तशी बदनामी व टवाळी ऐकून आता राष्ट्रीय पातळीवर मान्यता पावलेले नेते झाले आहेत. मात्र अजूनही त्यांच्याविषयी केला जाणारा खोटा व दुटप्पी प्रचार पाहिला की उपरोक्त शंकाच अधिक बळावत जाते. या आठवड्यात राहुल गांधींनी इंग्लंड, जर्मनी व अन्य पाश्चात्त्य देशांचा दौरा करून तेथील भारतीयांसमोर भाषणे केली. त्यांचे एक भाषण इंग्लंडच्या पार्लमेंटच्या सभासदांसमोरही झाले. त्या भाषणात बोलताना राहुल गांधींनी ‘भारतातील वाढते दारिद्र्य व विषमता येथील तरुणाईला आतंकवादाकडे आकर्षित करील, उपेक्षितांना गप्प राहू न देता रस्त्यावर आणील आणि सरकारचे याकडे होत असलेले दुर्लक्ष या विघटनाला जास्तीची गती देईल’ असे उद्गार काढले. त्यात खोटे वा विपर्यस्त असे काही नव्हते. शिवाय ते विदेशातील भारतीयांनाच देशाची स्थिती सांगत होते. ते देशाविषयी बोलले, राजकारण बोलले नाहीत. तरीही राहुल गांधींनी विदेशात जाऊन स्वदेशाची बदनामी केली असा कांगावा भाजपच्या प्रवक्त्यांनी आता चालविला आहे. त्या बिचाºयांना विस्मरणाचा आजार असावा. २०१४ ची निवडणूक जिंकल्यानंतर नरेंद्र मोदींनी अमेरिकेतील न्यूयॉर्क स्क्वेअरवर व चीनमधील शांघाय या शहरात जी भाषणे केली ती पूर्णपणे राजकारणी होती. त्यात काँग्रेसच्या जुन्या राजवटींवर टीका होती. डॉ. मनमोहनसिंग यांच्या सरकारच्या उत्तरकाळाचे वाभाडे होते. १९४७ नंतरची सगळी सरकारे अकार्यक्षम व भ्रष्ट होती हा प्रचार होता. राहुल गांधींच्या भाषणात देश होता, पक्ष नव्हते. द्वेषाचे राजकारण जगात दुही व विषाक्त वातावरण उभे करील याउलट गांधीजींचा विचार व प्रेमाचा संदेश जगात शांतता राखील असे ते म्हणाले. नरेंद्र मोदींवर अविश्वासाचा ठराव आणल्यानंतरही आपण त्यांना जी मिठी मारली ती याच स्नेहाची द्योतक होती असेही त्यांनी त्या भाषणात सांगितले. जगभरातील आजची अस्वस्थता भारतासह जगालाही चांगले जगू देणार नाही हा त्यांचा संदेश तर त्यांच्या विरोधकांनीही लक्षात घ्यावा असा आहे. दुर्दैव याचे की ‘विरोधासाठी विरोध आणि सत्तेसाठी वाट्टेल ते’ असे धोरण अंगिकारणाºयांकडून तशा समंजसपणाची अपेक्षा करण्यात फारसा अर्थ नसतो एवढेच.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधी