शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

‘या’ची सांगता निवडणुकीतच

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2018 05:45 IST

पराभवाची चिन्हे दिसू लागताच भाजपाने आपली पातळी सोडून अत्यंत घृणास्पद अशा खासगी आरोपांना सुरुवात केली आहे. अशा आरोपांसाठी सामान्यपणे स्त्रियांना लक्ष्य बनविले जाते.

पराभवाची चिन्हे दिसू लागताच भाजपाने आपली पातळी सोडून अत्यंत घृणास्पद अशा खासगी आरोपांना सुरुवात केली आहे. अशा आरोपांसाठी सामान्यपणे स्त्रियांना लक्ष्य बनविले जाते. भाजपानेही त्याच मार्गाने जाऊन अगुस्ता वेस्टलॅण्डच्या सौद्यातल्या दलालामार्फत सोनिया गांधींचे नाव त्यात समोर आणले आहे. हे नाव पुढे आणतानाही त्याने त्याच्या कुजबुजीच्या पद्धतीनुसार पूर्ण आरोप समोर न आणता ते नाव काहीशा गूढ पद्धतीने व समाजात संशय उत्पन्न होईल अशा तºहेने समोर केले आहे. राफेल प्रकरणातील मोदी सरकारची व त्याने नेमलेल्या अनिल अंबानी या दलालाची ४० हजार कोटींची दलाली पुढे येताच भाजपाला असे काही करणे आवश्यकही होते. अगुस्ता वेस्टलॅण्ड हा खटला गेले कित्येक महिने सुनावणीला आला आहे व आर्थिक चौकशी करणाऱ्या यंत्रणा त्याचा तपास पूर्ण करीत आल्या आहेत. त्यात आजवर अनेक नावे पुढे आली. पण सोनिया गांधी व गांधी कुटुंबातील कुणाचेही नाव त्यात कधी घेतले गेले नाही. त्यामुळे हा वार वाया जाणार असे लक्षात येताच कोणत्या तरी अनधिकृत चिठ्ठीत सोनिया गांधींचे नाव आल्याचे पुढे करून त्यांना या प्रकरणात गोवण्याचा दुष्ट डाव भाजपाने रचला आहे. सुमारे ३६०० कोटी रुपयांच्या या घोटाळ्यात आजवर कोणत्याही बड्या व्यक्तीचे नाव आले नसले तरी त्याच्या बातम्या जोरात येतील याची काळजी सरकारने घेतली आहे. आताही या खटल्यातील आरोपी ख्रिस्तियन मिशेल याने एका कागदावर ‘इटालियन स्त्री व तिचा मुलगा’ असे कोणतेही नाव न लिहिता ती चिठ्ठी आपल्या वकिलाकडे दिली. ती स्त्री कोण याची माहिती आर्थिक तपासणी यंत्रणेला नाही, सरकारला नाही व संबंधित न्यायासनासमोरही ती आली नाही. भाजपाच्या प्रवक्त्यांनी मात्र हाती हत्यार आल्यासारखे सोनिया गांधींचे नाव पुढे करून जणू काही या साºया खटल्यामागे त्याच आरोपी आहेत, असा कांगावा सुरू केला आहे. मुळात देशातील सगळ्या आर्थिक तपासणी यंत्रणा आता सरकारच्या हातच्या बाहुल्या बनल्या आहेत. सार्वत्रिक निवडणुका समोर आहेत आणि ६ मार्चला त्यांची आचारसंहिता लागू होत आहे. पुढे आरोप करता येत नाहीत. नव्या योजना जाहीर करता येत नाहीत. रामाचे मंदिर तेवढ्यात बांधून होत नाही. मात्र या काळात राफेल विमानांच्या खरेदीचा घोटाळा त्याच्या निकालापर्यंत जाऊ शकतो. त्याआधी आपल्या बचावासाठी एक आक्रमक हत्यार मोदींना आणि त्यांच्या पक्षाला हवे आहे. शिवाय ते गूढ असेल व त्यातून फक्त संशय निर्माण होईल असेही ते हवे होते. ते आता त्याला या रूपाने मिळाले आहे. आता ‘हा आर कोण’ आणि ‘ही इटालियन आई कोण’ एवढे जरी प्रचारात आणले तरी मोदींना त्याचे राजकारण करता येणार आहे. मात्र हा कमालीच्या हीन पातळीवरचा प्रकार आहे आणि काँग्रेसच्या आनंद शर्मांनी तसे म्हटलेही आहे. मात्र कुजबुज चालू ठेवणे व गुप्त पातळीवरील प्रचाराला ऊत आणणे यावर संघ परिवाराचा भर नेहमीच राहत आला आहे. त्याचाच उपयोग ते या वेळीही करतील. कोणत्याही संशयावर त्याला बचावाची संधी न देता व त्यातील आरोपांची पूर्ण माहिती न देता त्याला कोर्टाबाहेर बदनाम करीत सुटणे हा प्रकार केवळ बेकायदेशीरच नाही तर पातळीहीन आहे. तो खासगी व संस्थात्मक पातळीवर केला गेला तरी तो कायद्याच्या कक्षेत येत नसल्याने निर्भयपणे करताही येतो. असा प्रचार एकेकाळी संघ परिवाराने राजीव गांधींना बदनाम करण्यासाठी बोफोर्स विमानांबाबत केला. मात्र एवढ्या वर्षांनंतरही त्यातून काही निष्पन्न झाले नाही. आताचे हेलिकॉप्टर प्रकरण त्याच प्रकाराचा वापर करून सोनिया व राहुल गांधी यांच्याविरुद्ध चालविले जाईल. ते तसे चालू ठेवणाºया यंत्रणा मोदींजवळ आहेत शिवाय त्यांच्या ताब्यात असलेल्या माध्यमांच्या व ड्रोन्सच्या फौजाही त्यांना या कामात जुंपता येणार आहेत. त्यामुळे बदनामीची ही मोहीम आता दीर्घकाळ चालणारही आहे. तिला उत्तर द्यायचे ते मतपेटीतून द्यावे लागणार आहे. कारण संशयांना उत्तर देता येत नाही आणि ज्याला उत्तर देता येईल, असे आरोप या प्रकरणात कुणी करताना दिसत नाहीत. तीन राज्यांत आपटी खाल्ल्यानंतरही ज्याची बुद्धी ताळ्यावर आली नाही, त्या सूडबुद्धीने पेटलेल्या पक्षाच्या या मोहिमेची सांगता येत्या निवडणुकीतच करावी लागणार आहे.

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेस