शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

ऑनलाईन कागदपत्रांचा गुन्हा; आरोपीच्या पुढे जाऊन विचार करायला हवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 16:00 IST

नवीन तंत्रज्ञान आले की त्याचे औत्सुक्य सर्वांनाच असते. खास करून गुन्हेगार सर्वात आधी तंत्रज्ञानाचा सखोल अभ्यास करतात. निर्मात्यापेक्षा अधिक बारकाईने गुन्हेगार त्याची तपासणी करतात.

विनायक पात्रुडकर

नवीन तंत्रज्ञान आले की त्याचे औत्सुक्य सर्वांनाच असते. खास करून गुन्हेगार सर्वात आधी तंत्रज्ञानाचा सखोल अभ्यास करतात. निर्मात्यापेक्षा अधिक बारकाईने गुन्हेगार त्याची तपासणी करतात. त्याच्यातील पळवाटा शोधतात. मग त्यांना जायबंद करण्यासाठी प्रशासनाला गुन्हा नोंदवण्यापलीकडे काहीच कारवाई करता येत नाही. त्यामुळे तंत्रज्ञान विकसित करणाऱ्याच्या कार्यक्षमतेवर बोट ठेवले जाते. अशीच काहीशी अवस्था सध्या महापालिकेची झाली आहे. नागरिकांना घरबसल्या प्रमाणपत्रं मिळावीत या उद्देशाने पालिकेने ऑनलाईनचा पर्याय उपलब्ध केला. मात्र ऑनलाईनद्वारे बनावट कागदपत्रे सादर करून प्रमाणपत्र घेतली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्याची गंभीर दखल घेत पालिकेने बनावट कागदपत्रं सादर करणाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवला जाणार असल्याचे जाहीर केले. ऑनलाईन यंत्रणा पारदर्शक आहे हे यातून स्पष्ट झाले. थेट कागदपत्रे जमा करण्याच्या प्रक्रियेत कदाचित हा घोळ समोर आला नसता. 

हे केवळ पालिकेच्याबाबतीत घडले असे नाही. आजवर अनेक ऑनलाईन घोटाळे झाले आहेत. दुसऱ्याचे क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड वापरून खरेदी करणे, पैसे ट्रान्सफर करणे, असे प्रकार दर आठवड्याला घडत असतात. अशा गैरप्रकारांना आळा घालणे गरजेचे आहे. कारण भविष्यात सर्वच व्यवहार ऑनलाईनच होतील. त्यासाठी आताच उपाययोजना करायला हव्यात. इंटरनेटमुळे संपूर्ण जग हातात आले आहे. हॅकर्स नवनवीन पर्याय शोधून सर्रास ऑनलाईन चोरी करतात. ऑनलाईन चोरी रोखण्यासाठी उपाययोजना आहेत, पण त्या तोकड्या पडत आहेत. त्याची व्याप्ती वाढवणे आवश्यक आहे. 

विशेष म्हणजे, ऑनलाईन पद्धत आपल्यासाठी नवीन नाही. आधारकार्ड, पॅनकार्ड, या सर्व गोष्टीत ऑनलाईनच माहिती भरली गेली आहे. सरकारी कार्यालये डिजिटल होत आहेत. सर्व जुनी सरकारी कागदपत्रे डिजिटल होत आहेत. त्यामुळे ऑनलाईन व्यवहारांची खबरदारी घ्यायला हवी. अगदी गंभीर उदाहरण द्यायचे झाले तर, अतिरेकी संगणकीय ज्ञानात पोलिसांच्या पण पुढे गेले आहेत. ते आता सॅटेलाईटद्वारे संभाषण करतात म्हणे. असे असताना तपास यंत्रणांनी किंवा जनहिताचे नियोजन करणाऱ्यांनी आरोपीच्या एक पाऊल पुढे जाऊन विचार करायला हवा. तंत्रज्ञानाला पळवाटा राहणार नाहीत, याची काळजी घ्यायला हवी. कारण फौजदारी कारवाईत शिक्षा व्हायला किती वेळ लागतो हे स्वतंत्रपणे सांगायला नको.

 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमtechnologyतंत्रज्ञान