शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

वाचनीय लेख - एक पृथ्वी, एक कुटुंब... आणि एक भविष्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2022 12:00 IST

आजपासून भारत जी-20 च्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेत आहे. कोलाहलात सापडलेल्या जगाला भारत नवी दिशा दाखवेल, हे नक्की!

नरेंद्र मोदी

जी-20 समूहाच्या या आधीच्या सतरा अध्यक्ष देशांनी विविध स्तरावर अतिशय लक्षणीय कामगिरी केली आहे. आर्थिक स्थैर्य, आंतरराष्ट्रीय कररचनेचे सुसूत्रीकरण, देशांवर असलेले कर्जाचे ओझे कमी करणे या त्यातल्या महत्त्वाच्या उपलब्धी!

- या भक्कम पायावर भारताला आपल्या अध्यक्षपदाची कारकीर्द घडवायची आहे.- ही जबाबदारी घेत असताना मी स्वत:लाच  असे विचारले, जी-20 आज जिथे आहे, त्याच्या पलीकडे जाऊ शकेल का? जगाच्या  मानसिकतेत एक मूलभूत परिवर्तन करण्यासाठी आपण उत्प्रेरक ठरू शकू का?- हे शक्य आहे! निश्चितच शक्य आहे!!

आपली मानसिकता आजूबाजूच्या परिस्थितीनुसार बनत असते. आपल्या आजवरच्या संपूर्ण इतिहासात माणुसकीकडे दुर्लक्षच केले गेले. आपण, आपल्या मर्यादित संसाधनांसाठी भांडलो, कारण इतरांना ती न मिळू देण्यात, ती नाकारण्यावर आपले अस्तित्व अवलंबून होते.  दुर्दैवाने, आजही आपण त्याच जुन्या शून्य बेरजेच्या मानसिकतेत अडकलो आहोत. आजही अनेक देश भूभाग बळकावण्यासाठी,  संसाधनांसाठी लढाया लढतात. जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याचा वापर एखाद्या शस्त्रासारखा केला जातो. कोट्यवधी लोकांचा जीव धोक्यात आहे हे माहिती असूनही, लसींचा साठा केला जातो. कुणी म्हणेल, संघर्ष आणि लोभ या मानवाच्या नैसर्गिक प्रवृत्ती आहेत. पण मी याच्याशी असहमत आहे. माणूस सुरुवातीपासून स्वार्थी असता, तर मग एकत्व या मूलभूत तत्त्वाचा उपदेश करणाऱ्या आध्यात्मिक परंपरांनी आपला चिरस्थायी ठसा समाजावर कसा उमटवला असता?

भारतीय विचार सांगतो, की सर्व सजीव प्राणिमात्र; एवढेच नव्हे, तर अगदी निर्जीव गोष्टीसुद्धा, पंचमहाभूतात सामावलेल्या आहेत! ही पंचमहाभूते म्हणजे पांच तत्त्वे आहेत- पृथ्वी, आप, तेज, वायू आणि अवकाश. या सर्व घटकांमधील सौहार्द, एकत्व हेच आपल्यामध्ये आहे आणि ते आपल्या भौतिक, सामाजिक तसेच पर्यावरणीय कल्याणासाठी अत्यंत आवश्यक आहे. भारताचे जी-20 चे अध्यक्षपद, हीच सार्वत्रिक एकत्वाची भावना अधिक दृढ करण्यासाठी काम करेल. 

भारताने निवडलेली संकल्पना आहे : “एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’’! आज आपल्याकडे, जगभरातील सर्व लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण होतील, एवढे उत्पादन करण्यासाठी पुरेशी साधने उपलब्ध आहेत. आपल्याला आपल्या अस्तित्वासाठी झगडण्याची गरज उरलेली नाही. हे युद्धाचेही युग नाही ! हवामानबदल, दहशतवाद आणि महामारी ही आपल्यासमोरची सर्वात मोठी आव्हाने आहेत. या आव्हानांचा सामना एकमेकांशी भांडून नव्हे, तर एकत्रित काम करूनच करणे शक्य होणार आहे. सुदैवाने, आधुनिक तंत्रज्ञान मानवतेसमोरील व्यापक समस्यांचा सामना करण्यासाठीची साधने उपलब्ध करून देत आहे. आपल्या विशाल आभासी जगात डिजिटल तंत्रज्ञानाच्या सर्वव्यापकतेचा अनुभव आपण घेतो आहोत. भारतात जागतिक लोकसंख्येचा सहावा हिस्सा राहतो.  भाषा, धर्म, चालीरीती आणि धारणा यामध्ये आपल्या देशात कमालीची विविधता आहे! आपला देशही एका अर्थाने  संपूर्ण जगाची एक लहानशी प्रतिकृतीच आहे. सामूहिक निर्णय प्रक्रियेची सर्वात प्राचीन परंपरा असलेल्या भारताचे लोकशाहीचा पाया घालण्यामध्ये महत्त्वाचे योगदान आहे. भारतामध्ये कोण्या एका व्यक्तीच्या हुकुमाने नव्हे तर लाखो लोकांच्या मुक्त आवाजाच्या मिश्रणातून निर्माण होणाऱ्या सुसंवादाच्या एका सुरामधून राष्ट्रीय सहमती निर्माण होते. आज भारत ही जगातील सर्वाधिक वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था आहे. नागरिक-केंद्री शासनाच्या मॉडेलमध्ये उपेक्षितांची काळजी घेतली जाते, तरुणांच्या सर्जनशील गुणवत्तेची जोपासना केली जाते.

खुली, समावेशक आणि परस्परांमध्ये प्रक्रिया करता येण्याजोग्या डिजिटल सार्वजनिक सामग्रीची निर्मिती करण्यासाठी भारताने तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. यामुळे सामाजिक सुरक्षा, आर्थिक समावेशन आणि इलेक्ट्रॉनिक पेमेंट्स अशा विविध क्षेत्रात क्रांतिकारक प्रगती झाली आहे. जागतिक समस्यांच्या निराकरणासाठी भारताच्या अनुभवांमधून संभाव्य तोडगे मिळू शकतात. भारत आपल्या जी-20 अध्यक्षपदाच्या कार्यकाळात विकासाची विविध प्रारूपे जगासमोर सादर करील. ही प्रारूपे इतरांसाठी, विशेषतः विकसनशील देशांसाठी उपयुक्त ठरू शकतील. भारताचे जी-20 चे प्राधान्यक्रम केवळ सदस्य राष्ट्रांसोबतच नव्हे; तर अन्य  सहप्रवासी देशांसोबत सल्लामसलत करून ठरवले जातील. भारताचे प्राधान्य आपल्या ‘एकसंध कुटुंबातल्या (वन फॅमिली)’ सुसंवादाने आपल्या ‘सामायिक भविष्यात (वन फ्युचर)’मध्ये आशा उत्पन्न करून आपली ‘एक वसुंधरा (वन अर्थ)’ संपन्न करण्याला असेल. पृथ्वी या आपल्या ग्रहाची स्थिती सुधारण्यासाठी निसर्गाचा विश्वस्त म्हणून जीवन जगण्याच्या भारतीय परंपरेवर आधारित शाश्वत आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीला भारत प्रोत्साहन देईल! अन्न, खते आणि वैद्यकीय उत्पादने यांचा जागतिक पुरवठा राजकारणरहित राहील, हे सुनिश्चित करण्याचा भारताचा प्रयत्न असेल, जेणेकरून भू-राजकीय तणावांमध्ये भर पडणार नाही. ज्यांना सर्वात जास्त गरज आहे त्यांना नेहमीच प्राधान्य देण्याची भारताची भूमिका असेल. महाविनाशकारी शस्त्रांमुळे निर्माण झालेले धोके कमी करण्यासाठी सर्वाधिक शक्तिशाली देशांदरम्यान प्रामाणिक संवाद व्हावा, असा भारताचा प्रयत्न असेल! भारताचा ‘‘जी-20 जाहीरनामा’’ सर्वसमावेशक, महत्त्वाकांक्षी, कृती आधारित आणि निर्णायक असेल. चला, आपण सगळे भारताचा जी-20 अध्यक्षपदाचा कार्यकाळ यशस्वी व्हावा, यासाठी एकत्र येऊन काम करू या!

(लेखक देशाचे पंतप्रधान आहेत)

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारत