शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

हे विस्मरण क्षम्य नाही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 17:06 IST

नव्या पिढीला रामभाऊ तुपे ठाऊक नाहीत. ज्या विधिमंडळात त्यांनी पुण्याचे प्रतिनिधित्व केले त्या पुणेकरांच्याही स्मरणात आता ते नाहीत. म्हणूनच त्यांच्या निधनाच्या तीन वर्षानंतर महाराष्ट्र विधिमंडळाला त्यांची आठवण झाली आणि नंतर श्रद्धांजलीचा संसदीय सोपस्कार पार पडला.

- गजानन जानभोरनव्या पिढीला रामभाऊ तुपे ठाऊक नाहीत. ज्या विधिमंडळात त्यांनी पुण्याचे प्रतिनिधित्व केले त्या पुणेकरांच्याही स्मरणात आता ते नाहीत. म्हणूनच त्यांच्या निधनाच्या तीन वर्षानंतर महाराष्ट्र विधिमंडळाला त्यांची आठवण झाली आणि नंतर श्रद्धांजलीचा संसदीय सोपस्कार पार पडला. प्रशासकीय निर्लज्जपणाचा हा कळस अक्षम्य आहे.आपले संपूर्ण आयुष्य समाजासाठी वाहून घेतलेल्या सेवाभावी माणसांचे विस्मरण ही समाजाने त्या माणसाबद्दल दाखवलेली कृतघ्नता असते. ‘मी गेल्यानंतर माझी आठवण ठेवा, जयंती-पुण्यतिथी करा, पुतळे उभारा’ असे ही माणसे कधीच सांगत नाहीत. ती मुळातच सत्शील आणि विरक्त वृत्तीची असल्याने तशी सोयदेखील करून ठेवीत नाहीत. त्यांच्या पश्चात समाजालाच त्यांची कृतज्ञ आठवण ठेवावी लागते. ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते आणि पुण्याचे दिवंगत आमदार रामभाऊ तुपे धनवंत नव्हते. त्यांनी उद्योगपती, बिल्डरांच्या भ्रष्टहिताचे राजकारण कधी केले नाही. समाजवादाविषयीची निष्ठा आणि साने गुरुजींनी शिकवलेली कर्तव्यबुद्धी या ज्येष्ठ कार्यकर्त्याने आयुष्यभर जपली. लोकाग्रहास्तव ते पुण्यातून विधानसभा निवडणुकीत एकदा उभे राहिले व निवडून आले. नव्या पिढीला रामभाऊ तुपे ठाऊक नाहीत. ज्या विधिमंडळात त्यांनी पुण्याचे प्रतिनिधित्व केले त्या पुणेकरांच्याही स्मरणात आता ते नाहीत. म्हणूनच त्यांच्या निधनाच्या तीन वर्षांनंतर महाराष्ट्र विधिमंडळाला त्यांची आठवण झाली आणि नंतर श्रद्धांजलीचा संसदीय सोपस्कार पार पडला. सरकारला रामभाऊंच्या निधनाची माहिती कळायला तब्बल तीन वर्षे लागतात, हा प्रशासकीय निर्लज्जपणाचा कळस आहे. मुख्यमंत्र्यांनी त्याबद्दल नाराजी व्यक्त केली खरी. पण, त्यात या अक्षम्य अपराधाबद्दलच्या प्रायश्चिताची भावना दिसली नाही. रामभाऊ स्वातंत्र्य संग्राम सैनिक आणि गोवामुक्ती आंदोलनातील ज्येष्ठ कार्यकर्ते होते. आमदार म्हणून त्यांनी पैसे खाल्ले असते, गडगंज संपत्ती, शिक्षण संस्था उभारल्या असत्या, जमिनी हडपल्या असत्या तर ते नक्कीच विधिमंडळाला लक्षात राहिले असते. पण, जिथे अशा निर्मोही माणसाचे जगणेच समाज दुर्लक्षित करतो तिथे राज्यकर्त्यांना त्यांच्या मृत्यूचे विस्मरण होणे स्वाभाविक आहे. या ज्येष्ठ आमदाराने सभागृहात राजदंड पळवला नाही, ते चप्पल घेऊन सभागृहात कुणाच्या अंगावर धावून गेले नाहीत आणि अध्यक्षांच्या आसनाकडे कधी पेपरवेटही भिरकावला नाही. त्यामुळे असेल कदाचित विधिमंडळाच्या कामकाजाच्या इतिहासात त्यांच्या कार्याची नोंद झाली नाही.रामभाऊ हे ए. बी. बर्धन, सुदामकाका देशमुख, भाई मंगळे या निष्काम लोकसेवकांच्या परंपरेतील. सुदामकाका निवडणूक हरले तेव्हा अचलपुरातील गरिबांच्या घरात त्या दिवशी चूल पेटली नव्हती. हातात ठिगळं लावलेली पिशवी घेऊन उभे असलेले आमदार भाई मंगळे तिवस्याच्या बसस्टँडवर नेहमी दिसायचे. ग. प्र. प्रधान या भल्या माणसाने तर आपले राहते घर साधना साप्ताहिकाला देऊन टाकले. पत्नीच्या निधनानंतर प्रधान सर सदाशिव पेठेतील घरात एकटेच राहायचे. मात्र गतकाळातील आठवणी दाटून येऊ लागल्याने त्यांनी घर सोडले व ते आपल्या जीवलग मित्राच्या घरी राहायला आले. तो मित्र म्हणजे, रामभाऊ तुपे. प्रधान सर असोत किंवा रामभाऊ ही माणसे नि:स्पृहतेने जगली आणि निर्मोही मनाने त्यांनी देह ठेवला. प्रधान सरांनी ‘मृत्यूनंतर माझे कोणतेही स्मारक उभारू नका. माझ्याबद्दल प्रेम वाटणाºयांनी एक झाड लावावे आणि ते जगवावे’ एवढेच लिहून ठेवले. ही भली माणसे जिवंतपणी स्वत:हून स्वत:च्या विरक्तीची अशी परीक्षा घेत असतात म्हणून या जगाचा निरोप घेताना ती कृतार्थ असतात. आपण मरतो तेव्हा आपल्या घरचे लोकं तेरवी करतात आणि वर्षश्राद्धानंतर विसरूनही जातात. प्रधान सर, सुदामकाका, रामभाऊंसारखे निष्कांचन कार्यकर्ते त्या अर्थाने अमर ठरतात. विधिमंडळातील श्रंद्धाजलीच्या सोेपस्कारातून त्यांचे मोेठेपण कधीच ठरत नसते.आता इथे शेवटी प्रश्न उरतो, समाजाच्या कृतघ्न विस्मरणाचा. अलीकडे अशा घटनाही अस्वस्थ करीत नाहीत इतके कोडगेपण आपल्यात आले आहे. परवा ते विधिमंडळातही दिसले. रामभाऊ तुपेंसारख्या देवमाणसाला स्मरणात ठेवले की आपल्यातील दानवीपण ठसठशीतपणे जाणवते व मग उगाच अपराधीपण छळायला लागते. त्यामुळे अशा माणसांना आपण सोईस्कर मन:पटलावरून पुसून टाकतो. रामभाऊंच्या विस्मरणातही कदाचित तोच अर्थ दडलेला असावा...

टॅग्स :Puneपुणे