शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

आता आम आदमी पक्षालाच अपात्र ठरविणार? अरविंद केजरीवालांची वर्तणूक महागात पडणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2024 08:31 IST

केजरीवाल ईडीचे समन्स सातत्याने चुकवत आहेत. आता ईडी कदाचित ‘आप’लाच आरोपी करील आणि मग पक्षाची मान्यता रद्द करण्याची वेळ येईल, अशी चर्चा आहे!

-हरीष गुप्ता, नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली

देशातील राजकीय व्यवस्था स्वच्छ होऊ शकते अशी आशा २०१३ साली आम आदमी पक्षाचे निमंत्रक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी निर्माण केली. काँग्रेस आणि भाजप या दोन्ही प्रमुख पक्षांना त्यांनी दिल्लीत पराभूत केले; नंतर पंजाबमध्येही विजय मिळवला. देशाच्या इतर भागात शिरकाव करण्याचा अयशस्वी प्रयत्न  केला. परंतु राजकीय व्यवस्था सुधारेल ही आशा काही फलद्रूप काही झाली नाही. आता तर ते मृगजळच वाटू लागले आहे. आपच्या विरोधात एकामागून एक वाद उभे राहिले. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर ५० कोटी रुपयांचा खर्च केल्याचे प्रकरण असो किंवा नियमांचा भंग करून स्वपक्षीयांवर खैराती केल्याचे आरोप असोत, या ना त्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात केजरीवालांचे सहकारी तुरुंगात जाऊन बसले. दारू घोटाळ्याने तर कहरच केला.

ईडीने पाठवलेले समन्स केजरीवाल वेगवेगळी कारणे पुढे करून चुकवत आहेत. दारू घोटाळा प्रकरणात ईडी कदाचित आम आदमी पक्षालाच आरोपी करील आणि मग पक्षाची मान्यता रद्द करण्याची वेळ येईल असे बोलले जाते. असे घडले तर देशाच्या ७५ वर्षांच्या लोकशाहीच्या इतिहासात ही अत्यंत दुर्मिळ घटना ठरेल. ‘आप’ला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यासंबंधीची फाइल मान्यतेच्या प्रतीक्षेत आहे. कारण वरिष्ठ कायदेतज्ज्ञांनी आजवर अशा प्रकारचे प्रकरण हाताळलेले नाही. ईडीने यापूर्वी कंपन्या, ट्रस्ट, सोसायट्या यांना विविध प्रकरणांमध्ये आरोपी केलेले आहे. ईडीला पीएमएलए कायद्याखाली ‘आप’ला आरोपी करता येईल, असे एक मत मांडले जाते. निमंत्रक आणि खजिनदार यांना आरोपी केले तर आपोआपच पक्षाकडे रोख वळतो; नंतर न्यायालय काय ते ठरवेल. २००१ साली भाजपचे अध्यक्ष बंगारू लक्ष्मण १ लाखाची रोकड घेताना कॅमेऱ्यात बंदिस्त झाले होते. मात्र यूपीए सरकारने त्यावेळी भाजपला आरोपी केले नव्हते. एखाद्या पक्षाला गैरमार्गाने पैसे घेतल्याप्रकरणी अपात्र ठरवणे तसे कठीणच आहे.

एन. डी. गुप्ता असण्याचे महत्त्व

७८ वर्षीय एन. डी. गुप्ता यांना अरविंद केजरीवाल यांनी राज्यसभेत आणखी एका कार्यकाळासाठी मुदतवाढ दिली तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या. गुप्ता हे मृदुभाषी असून २०१८ साली सदस्य झाल्यापासून ते सभागृहात क्वचितच बोलले आहेत.  त्यांचे महत्त्व केजरीवाल जाणून असावेत आणि त्यासाठीच चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या गुप्ता यांना मुदतवाढ मिळाली असावी. आपच्या आर्थिक व्यवहारांची जबाबदारी गुप्ता यांच्याकडे आहे. प्रारंभापासूनच ते पक्षाचे खजिनदार आहेत. पक्षाच्या खातेवहीत काही गैर सापडलेले नाही. दारू घोटाळा उघडकीस आला तेव्हा ईडीच्या अधिकाऱ्यांनी गुप्ता यांची वारंवार चौकशी केली. परंतु त्यांच्या हाती काहीच लागले नाही. ‘आप’ची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव ईडी पुढे नेत नाही, याचे कारणही गुप्ता यांचीच कौशल्ये. केजरीवाल यांच्याविरुद्ध दिवंगत नेते अरुण जेटली यांनी त्यावेळी दाखल केलेला बदनामीचा खटला गुप्ता यांनीच अयशस्वी ठरवला होता. त्या प्रकरणात केजरीवाल दोषी धरले जाण्याची पुरेपूर शक्यता होती. लेखी माफीनामा घेऊन प्रकरण मिटवावे असे गुप्ता यांनीच जेटलींना सुचवले आणि ते मान्य झाले.

राहुल यांच्या यात्रेतून अयोध्या गायब का?

राहुल गांधी ‘भारत जोडो न्याय यात्रा’ १४ जानेवारीला इम्फाळपासून सुरू करत आहेत. या यात्रेच्या मार्गाचा नकाशा काँग्रेस नेत्यांनी प्रसिद्ध केला; त्यात अयोध्या दिसत नाही. उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांतून ही यात्रा जाईल. अमेठी, रायबरेली, वाराणसी, प्रयागराज आणि लखनौ या शहरांतूनही ती जाईल. परंतु गेली काही वर्षे राहुल आणि प्रियांका वारंवार देवळांना भेट देत असले तरी या यात्रेत अयोध्येचा समावेश नाही.  २२ जानेवारीला राहुल गांधी अयोध्येला जाणार नाहीत हे नक्की आहे. परंतु आपल्या दुसऱ्या यात्रेत ते अयोध्येचा समावेश करू शकले असते. त्यांचे पिताश्री राजीव गांधी यांनी रामलल्लाची मंदिरात पुनर्स्थापना करून शिलान्यासही केला होता. या पार्श्वभूमीवर त्यांनी अयोध्येला भेट देणे खरेतर उचित ठरले असते. १९८९ सालचा निवडणूक प्रचार अयोध्येजवळच्या फैजाबादहून सुरू करताना राजीव गांधी यांनी ‘रामराज्य आणण्याचे’ अभिवचनही दिले होते.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयdelhiदिल्ली