शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदेंमध्ये दुरावा? बिहारला ना एकत्र गेले, ना एकत्र आले, एकमेकांकडे पाहून कोरडंच हसले; नेमके काय घडले? 
2
Malegaon Dongrale: चिमुकलीवर अत्याचार, लोकांच्या संतापाचा कडेलोट; थेट न्यायालयात शिरण्याचा प्रयत्न, पोलिसांचा लाठीचार्ज
3
'एनडीएने बिहारची मते ५.५ रुपये प्रतिदिन दराने खरेदी केली', प्रशांत किशोर यांचा मोठा दावा
4
"पुरस्कार घेण्यास परदेशात गेलीस तर…’’, नोबेल विजेत्या महिलेला सरकारने दिली धमकी  
5
क्रिप्टो मार्केटमध्ये हाहाकार! २४ तासांत १७ लाख कोटींची फोडणी, क्रिप्टो मार्केट आपटलं; Bitcoin ७% पेक्षा अधिक घसरलं
6
धक्कादायक खुलासा! डॉक्टर शाहीन निघाली दहशतवादी फंडिंगची मास्टरमाईंड; बिटकॉइन आणि हवालातून कोट्यवधींचा व्यवहार
7
ST महामंडळाचा आर्थिक शिस्तीवर भर; नवी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर, पारदर्शकतेसाठी विशेष नोंदवही
8
Numerology 2026: ६ मूलांकांचे दु:खाचे दिवस सरणार, सुवर्ण काळ येणार; २०२६ला मालामाल-भाग्योदय!
9
आमदार-खासदारांशी कसं वागावे? शासनानं काढलं परिपत्रक; कर्मचाऱ्यांना दिला ९ कलमी कार्यक्रम
10
IND vs SA 2nd Test Pitch Report: गुवाहाटीत ‘मुंबई पॅटर्न’? पिच ‘कोणाला’ देणार साथ?
11
Health Crisis: कितीही अँटिबायोटिक खाल्ले तरीही होईना काही परिणाम; जीवाणूंची शक्ती वाढली, आरोग्य धोक्यात!
12
'मुलगा गोरा कसा?'; संशयी पतीने क्रौर्याची सीमा ओलांडली! बाळाच्या रंगावरून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला अन्.. 
13
एक-एक घुसखोराला हाकलून लावू..; गृहमंत्री अमित शांहाचा हल्लाबोल
14
कराची शेअर बाजारात तेजी... पाकिस्तानची सर्वात मोठी कंपनी कोणती? रिलायन्सच्या तुलनेत कुठे?
15
Mumbai Crime: ऑफिसमधून बाहेर पडताच कारच्या समोरून आले आणि घातल्या गोळ्या; मुंबईतील घटनेचा व्हिडीओ आला समोर
16
JCB वर बसून काढत होते पदयात्रा, अचानक घडलं असं काही, रस्त्यावर धपकन पडले भाजपाचे नेते 
17
Jara Hatke : जगातील अद्भुत कोपरा, जिथे सूर्य दोन महिने 'सुट्टीवर' जातो; तापमानही जाते शून्याच्या खाली!
18
Sangli: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नवा अध्याय; 'तारा'चा मुक्त संचार सुरू, रेडिओ कॉलरद्वारे ठेवणार लक्ष
19
BMC Election: शरद पवार गट मुंबईत कोणाशी करणार युती, उद्धवसेना की काँग्रेस?
20
उदयपूरमध्ये शाही विवाह सोहळा, ज्युनियर ट्रम्पपासून VVIP पाहुणे येणार; कोण आहे वधू आणि वर?
Daily Top 2Weekly Top 5

आता सर्वसमावेशक काँग्रेस हाच आधार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2020 02:21 IST

देशाच्या राजकीय पटलावर विविध राजकीय पक्ष सत्तेवर येतात आणि जातात.

- मोहन जोशी

अस्वस्थतेच्या  वातावरणातला देश काँग्रेसकडे आशेने पाहत आहे ! आज काँग्रेस पक्षाचा वर्धापनदिन; त्यानिमित्ताने...

आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या व त्यानंतर देशाच्या विकासाचा भक्कम पाया रचणाऱ्या काँग्रेस पक्षाचा २८ डिसेंबर हा वर्धापनदिन म्हणजे कोट्यवधी कार्यकर्ते व जनतेच्या दृष्टीने ऐतिहासिक प्रेरणादिनच होय. स्वातंत्र्यानंतर प्रदीर्घ काळ काँग्रेसने देशाला नेतृत्व दिले. पंडित जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी, पी. व्ही. नरसिंहराव, डॉ. मनमोहनसिंग अशा काँग्रेसच्या पंतप्रधानांनी देशाच्या वाटचालीचा भक्कम पाया रचला, देशाला आत्मनिर्भर केले. त्याचबरोबर  लोकशाही, राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्मसमभाव आणि सामाजिक समता ही मूल्येदेखील समाजात खोलवर रुजवली. हे काँग्रेस पक्षाचे फार मोठे पायाभूत कार्य मानावे लागेल. हाच ऐतिहासिक वारसा यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी आणि सर्व ज्येष्ठ नेते समर्थपणे पुढे चालवत आहेत.

भारतासारख्या कृषिप्रधान देशात कष्टकरी शेतकरी, दलित, पददलित, मागासवर्गीय, भटकेविमुक्त, आदिवासी, अल्पसंख्याक आणि त्याचबरोबर देशात काँग्रेसच्या धोरणांमुळे मोठ्या प्रमाणात उदयास आलेल्या मध्यमवर्गाला केंद्रबिंदू मानून त्यासाठीची धोरणे काँग्रेसने सतत आखली. महिला आणि युवावर्गाच्या आशा आकांक्षांनादेखील सातत्याने मोठे बळ दिले. त्यामुळेच केवळ राजकीय पक्ष न राहता काँग्रेस हा देशाचा विचार बनला. १८९१, १९२० (नागपूर) आणि स्वातंत्र्यानंतर १९५९ अशा तीनवेळा महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाची अधिवेशने झाली. त्यातील २६ डिसेंबर १९२० रोजी नागपूर येथे झालेल्या काँग्रेस महाअधिवेशनाची शताब्दी नुकतीच संपन्न झाली. भारतीय असंतोषाचे जनक असणाऱ्या लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर महात्मा गांधींचे नेतृत्व पुढे आले. त्याच कालखंडातील हे अधिवेशन होते.  काँग्रेसचा  सर्व घटकांना सामावून घेऊन पुढे जाण्याचा निर्धार आजही अबाधित राहिला आहे. काँग्रेसने कोट्यवधी गरीब जनतेला दारिद्र्यरेषेच्या वर आणले. राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्मसमभाव आणि सामाजिक समता या त्रिसूत्रीला शिरोधार्य मानून सारा समाज एकसंघ ठेवला.

गेल्या पाच-सहा वर्षांत मात्र देशात काही शक्ती चक्रे उलटे फिरविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. जाती व धर्मांमध्ये तेढ वाढवून समाजात असुरक्षित वातावरण निर्माण होत आहे. न्यायव्यवस्था, निवडणूक आयोग, प्रसार माध्यमे यांच्या स्वातंत्र्याचा संकोच होताना दिसतो. मूठभर उद्योगपतींच्या हितासाठी खासगीकरण मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आता रेल्वेही यास अपवाद राहणार नाही.  काँग्रेस पक्षाने दिलेली किमान हमीदराची तरतूदही गुंडाळून मोठ्या भांडवलदार, कॉर्पोरेट जगताला कृषी क्षेत्र खुले केले जात आहे. ही सगळी धोरणे सर्वसामान्य जनतेच्या हिताची निश्चित नाहीत. देशात शेतकऱ्यांचा उद्रेक झालेला दिसतो तो याच पार्श्वभूमीवर ! कोरोना काळातील अवघ्या चार तासांचा कालावधी देऊन नोटबंदीप्रमाणेच लॉकडाऊनही जाहीर केले गेले. त्यात कोट्यवधी स्थलांतरित गरीब, कष्टकरी मजुरांचे अतोनात हाल झाले. त्यांना आधार दिला तो काँग्रेस पक्षानेच !

देशाच्या राजकीय पटलावर विविध राजकीय पक्ष सत्तेवर येतात आणि जातात. १९८० मध्ये काँग्रेसने फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घेतली. आता पुन्हा कोट्यवधी तरुणांचे आशास्थान बनलेल्या व बेकारीचा प्रश्न सोडविण्याची धमक असणाऱ्या काँग्रेस पक्षाकडे साऱ्या लोकशाहीवादी आणि प्रागतिक विचारांची जनता आशेने पाहत आहे. त्यातूनच काँग्रेसच्या विचारांचा प्रभाव वाढत राहील.

 

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीSonia Gandhiसोनिया गांधी