शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट नव्हे, आता चर्चा साध्या, ‘बोरिंग’ आणि ‘डम्ब’ फोनची!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2024 08:18 IST

स्मार्टफोनच्या मायावी जाळ्यातून वाचण्यासाठी, काळाची चक्रं उलटी फिरवण्यासाठी पुन्हा जुन्या, बटनांच्या कीपॅडच्या मोबाइलची चर्चा आणि निर्मिती सुरू झाली आहे..

प्रसाद शिरगावकर, आंतरराष्ट्रीय स्तरावर मुक्तस्रोत तंत्रज्ञान प्रशिक्षक आणि वक्ते 

तुमचा पहिला मोबाइल फोन जर तुम्ही वीस-पंचवीस वर्षांपूर्वी वापरला असेल तर तुम्ही नोकिया किंवा मोटोरोला कंपनीचा छोटासा स्क्रीन आणि बटनांचं कीपॅड असलेला मोबाइल वापरला असेल. त्या फोनमधून तेव्हा फक्त दुसऱ्याला फोन करणं किंवा एसएमएस पाठवणं ह्या दोनच गोष्टी करता यायच्या. 

पुढे आयफोन आणि ॲण्ड्रॉइडचे स्मार्टफोन बाजारात आले. मोठं ‘टच स्क्रीन’, इंटरनेट सतत जोडलेलं, कॅमेरा, जीपीएस, ॲप्स अशा असंख्य सोयी ह्या फोनमध्ये झाल्यामुळे आपण झपाटल्यासारखे स्मार्टफोन वापरायला लागलो. आपल्या रोजच्या आयुष्यात स्मार्टफोनचा वापर चिंताजनक पातळीपर्यंत वाढला आहे. जगभर सगळीकडेच हे घडत आहे. फक्त भारतातला डेटा बघितला तर, सर्वसामान्य वापरकर्ता प्रत्येक दिवशी सरासरी सात तास मोबाइल वापरतो. जगभरातले आकडेही ह्याच्या जवळपास आहेत. मोबाइलच्या अतिवापरामुळे अनेक प्रकारच्या मानसिक आणि शारीरिक समस्या निर्माण होताना दिसत आहेत.  यावर उपाय म्हणून, ‘आपण काळाची चक्रं उलटी फिरवून बघूया का’ असा विचार काही कंपन्यांनी केला ! 

त्यांनी एक प्रयोग करून स्मार्टफोनच्या ऐवजी जुने ‘साधे’ फोन तयार केले. ह्या फोनमधून फक्त कॉल्स आणि मेसेजेस करता येतील अशी सोय ठेवली. ह्या कंपन्यांपैकी एक गंमतशीर उदाहरण म्हणजे ‘हायनिकेन’ नावाची बिअर तयार करणारी कंपनी! हायनिकेनने ‘बोरिंग फोन’ नावाचा फोन तयार केला आहे. जुन्या काळी जसे उघडता मिटता यायचे तसा हा फ्लिप फोन. मोठी बटणं आणि छोटा स्क्रीन असलेला. आणखी एक गंमत म्हणजे, एकेकाळी जगभर सगळ्यांच्या लाडक्या असलेल्या नोकिया कंपनीनेही त्यांच्या त्याकाळी सर्वाधिक विक्री झालेल्या Nokia 3310 ह्या मॉडेललाही २०२४ मध्ये नव्या रूपात बाजारात आणलं आहे.

स्मार्टफोन्सची सद्दी असलेल्या सध्याच्या जगात ह्या जुन्या प्रकारच्या साध्या ‘फीचर फोन्स’ना कसा प्रतिसाद मिळेल असा प्रश्न पडू शकतो. पण ह्या दोन्ही कंपन्यांच्या फोन्सना सध्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. एक आकडेवारी सांगते, आजही अमेरिकेत साध्या फोन्सना तब्बल एक अब्ज डॉलर्स इतकी बाजारपेठ मिळू शकते! भारतीय बाजारपेठेतून साधे फीचर फोन्स हे कधी पूर्णपणे गायब झालेच नव्हते. स्मार्टफोन्स बरोबरच गेली अनेक वर्ष भारतात नोकिया, मोटोरोला, लावा इत्यादी कंपन्यांचे छोटी स्क्रीन्स, बटणं आणि कमीत कमी फीचर्स असलेले साधे फोन विकले जात होतेच आणि अजूनही ते मिळतात. हे फोन पाच-सातशे ते हजार दीड हजार रुपयांत मिळतात आणि खणखणीत चालतात. कष्टकरी, छोटे व्यावसायिक.. ह्या वर्गाला फक्त फोन करण्या-घेण्यासाठी अत्यंत स्वस्तातले हे फोन नेहमीच वरदान ठरले आहेत. नोकियाने तर अशा काही साध्या फोन्सच्या मॉडेल्समध्ये इंटरनेटची सुविधा देऊन त्यावर यूपीआय ॲपदेखील दिलं आहे. म्हणजे हा फोन फक्त कॉल करणे, एसएमएस करणे ह्या पुरता मर्यादित न राहता रोजच्या आयुष्यात यूपीआयने व्यवहार करण्यासाठीही वापरता येऊ शकतो. एक विचार असा येतो की, ज्या फोनमधून सेल्फी काढता येत नाहीत, इन्स्टाग्राम फीड स्क्रोल करता येत नाही, यू-ट्यूबवरचे व्हिडीओज बघता येत नाहीत, ऑनलाइन शॉपिंग करता येत नाही, गूगल मॅप्स लावता येत नाही, गूगलवर सर्च करता येत नाही, असे फोन्स आजच्या काळात आपण पुन्हा वापरायला लागू का? 

स्मार्टफोन वापरून आपण करत असलेल्या किती गोष्टी आपल्या आयुष्यात खरोखर महत्त्वाच्या असतात, आपल्या आयुष्यात खरोखर काही योगदान त्या देतात का आणि त्यातल्या किती गोष्टी आपल्या वेळेचा आणि शक्तीचा पूर्णपणे अपव्यय करत असतात, हा विचार आपण कधीच करत नाही. हा विचार, हे विश्लेषण आणि आत्मपरीक्षण करणं अत्यंत गरजेचं आहे.हे करायचंच तर, एखादा जुन्या पद्धतीचा, मोठी बटणं-छोटं स्क्रीन-कमीत कमी सुविधावाला फोन काही महिने वापरून बघायला हवा. हे केलं तर खरंच या स्मार्टफोनवरच्या असंख्य ॲप्सच्या फाफट पसाऱ्याला काही अर्थ का हे आपल्या लक्षात येऊ शकेल. आणि मोबाइलच्या सततच्या वापरापासून आपली कदाचित सुटका होऊ शकेल... करून बघितलं पाहिजे!prasad@aadii.net

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोन