शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

ही पर्यावरण रक्षणासाठी दिलेली आहुती नव्हे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 00:17 IST

१५ फेब्रुवारी १९३५ रोजी अमरावतीमधील मेळघाट वनविभागात वनांचे आगीपासून संरक्षण करीत असताना हरिसालचे तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी मोहम्मद नाझीर यांनी मरण पत्करले होते. पुढे हरिसाल येथे नाझीर यांचे एक स्मारकही बांधण्यात आले.

१५ फेब्रुवारी १९३५ रोजी अमरावतीमधील मेळघाट वनविभागात वनांचे आगीपासून संरक्षण करीत असताना हरिसालचे तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी मोहम्मद नाझीर यांनी मरण पत्करले होते. पुढे हरिसाल येथे नाझीर यांचे एक स्मारकही बांधण्यात आले. ब्रिटिशकाळात असे घडू शकते मग स्वतंत्र भारतात का नाही?पुण्याच्या भोर वनपरिक्षेत्रातील काही भागात गेल्या आठवड्यात वणवा पेटला होता. वन विभागाचे कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता ही आग आटोक्यात आणण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करीत होते. आग विझविण्यासाठी कुठलीही आधुनिक साधनसामुग्री त्यांच्याकडे नव्हती. यापैकी काही जण झुडपांच्या पानांच्या साहाय्याने ही आग विझवित होते. पण येथील उंच वाढलेल्या गवतात आगीचा भडका रौद्ररूप धारण करीत होता. अशा या भीषण परिस्थितीत जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावत असलेले वनरक्षक सदाशिव नागठाणे ७० टक्के जळाले अन् बुधवारी त्यांची मृत्यूशी झुंज संपली. गेल्या एप्रिल महिन्यात भंडारा जिल्ह्यातील नागझिरा अभयारण्यात जंगलातील आग विझवितानाच एका वनमजुरास मरण आले होते. भोर येथील या आगीत आणखी काही वनकर्मचा-यांचे जीव थोडक्यात बचावले. नागठाणे यांनी पर्यावरण रक्षणासाठी दिलेली ही आहुतीच म्हणायला हवी. पण आपल्या व्यवस्थेचे दुर्दैव असे की नागठाणे असोत वा अन्य वनकर्मचारी त्यांच्या या अशा बलिदानाची पर्वा समाज तर सोडा सरकारही करताना दिसत नाही. त्यांच्या सेवाकाळापर्यंतचा पगार देण्याव्यतिरिक्त इतर कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत त्यांना मिळत नाही. एरवी सीमेवर लढताना शहीद होणारे जवान अथवा पोलिसांच्या कुटुंबीयांच्या मदतीला सारा देश धावून जातो. मग वनांचे संरक्षण करताना मरण पत्करणाºयांसोबत असा दुजाभाव का?यासंदर्भात ब्रिटिश काळातील एका घटनेचा येथे आवर्जून उल्लेख करावा लागेल. १५ फेब्रुवारी १९३५ रोजी अमरावतीमधील मेळघाट वनविभागात वनांचे आगीपासून संरक्षण करीत असताना हरिसालचे तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी मोहम्मद नाझीर यांनी मरण पत्करले होते.मेळघाटसाठी जीवाची बाजी लावून बलिदान देणारे ते पहिले व्यक्ती होते, अशी माहिती आहे. पुढे हरिसाल येथे नाझीर यांचे एक स्मारकही बांधण्यात आले. ब्रिटिशकाळात असे घडू शकते मग स्वतंत्र भारतात का नाही? भोर येथील घटना तर फारच गंभीर आहे. आगीत होरपळलेल्या नागठाणे यांना त्यांच्या सहकाºयांनी अक्षरश: स्वत:च्या शर्टाचा स्ट्रेचर बनवून बाहेर काढले. आग विझविण्यासाठी गेलेल्या या वनकर्मचा-यांकडे ब्लोअर्स नव्हते का? वनकर्मचारी एवढ्या भीषण आगीत अडकले असताना आपत्कालीन स्थितीत त्यांच्यासाठी अत्याधुनिक सुविधा तसेच रुग्णवाहिकेची सोय का करण्यात आली नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. देशातील वनक्षेत्र ही एक खुली संपत्ती आहे. सागवान माफिया, शिकारी, अतिक्रमणधारक याशिवाय वेळोवेळी लागणाºया आगी अशा प्रचंड दबावात वनकर्मचारी या संपत्तीचे रक्षण करीत असतात. कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावर जीवघेणे हल्लेसुद्धा होतात. धुळ्यात अतिक्रमण हटविण्यासाठी गेलेल्या एका आरएफओला जिवंत जाळण्यात आले होते. इतरही भागात अशाप्रकारच्या घटना घडल्या आहेत. पण त्यांची फारशी दखल घेतली जात नाही, हे वास्तव आहे. मागील काही वर्षात जंगलांवरील दबाव वाढला असताना ते सांभाळणाºया कर्मचाºयांनी संख्या मात्र तोकडीच आहे. या वनरक्षकांना मिळणारे वेतनही त्यांच्या कामाच्या तुलनेत अत्यल्प आहे. हा त्यांच्यावरील अन्याय नाही का? देशाची ही अमूल्य संपत्ती सांभाळणा-यांनाही संरक्षण मिळायला नको का?- सविता देव हरकरे savita.harkare@lokmat.com

टॅग्स :fireआग