शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

राजकारणाचा नको, माणुसकीचा वाजवूया भोंगा!

By किरण अग्रवाल | Updated: May 2, 2022 15:43 IST

Not politics, let's sound the horn of humanity : विकासाचे सारे मुद्दे संपले म्हणून की काय, राज्यात सध्या भोंग्याच्या विषयावरून राजकीय गहजब सुरू आहे.

 -  किरण अग्रवाल

राज्यात राजकीय भोंग्यांचे कर्कश आवाज येत असले तरी, त्यात अडकण्यापेक्षा सामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठीचा जागर अगोदर व्हायला हवा. तप्त उन्हात कासावीस होणाऱ्या जिवांची तृष्णातृप्ती करण्यासाठी यंत्रणांच्या कानाशी भोंगे वाजविणे प्राधान्याचे आहे, पण ते सोडून भलतेच सुरू आहे.

 

एकीकडे उन्हाचा कडाका वाढून सामान्यांच्या घशाला कोरड पडली असताना दुसरीकडे राज्यात भोंग्यांवरून राजकीय वातावरण गढूळ होऊ पाहताना दिसत आहे; त्यामुळे हे भोंगेपुराण आवरा आणि तहानलेल्यांना पाणी पुरवा असे ओरडून सांगण्याची वेळ आली आहे.

विकासाचे सारे मुद्दे संपले म्हणून की काय, राज्यात सध्या भोंग्याच्या विषयावरून राजकीय गहजब सुरू आहे. प्रार्थना स्थळावरील भोंग्यांवरून हा विषय पुढे आल्याने त्याचा संबंध धर्माशी जोडला जात आहे; पण धार्मिक तणाव अनुभवून झालेली जागोजागची सामान्य जनता यापासून हात झटकून दूर असलेली दिसत आहे ही खूप मोठी समाधानाची बाब आहे. याचे कारणही साफ आहे, ते म्हणजे भोंग्यांपेक्षा जगण्या मरण्याशी निगडित सामान्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत; त्यामुळेच राजकीय पातळीवर चर्चित या विषयावर स्थानिक व सामाजिक पातळीवर प्रतिध्वनी उमटलेले नाहीत. परस्परातील सामाजिक सलोख्याची व बंधुत्व भावाची वीण घट्ट असल्याची खात्री यातून पटून जावी.

 

आज स्वयंपाकाचा गॅस महाग झाला आहे. इंधनाचे दरही वाढले असून, डाळींचे भाव वाढल्याने गृहिणींच्या किचनचे बजेटही कोलमडले आहे, ई पास मशीन बंद पडल्याने रेशनवरचे धान्य मिळण्यात अडचणी येत आहेत, पण राजकारण्यांना भलतेच भोंगे वाजविण्यात स्वारस्य दिसत आहे. भलेही ध्वनिप्रदूषण व पर्यावरणाच्या दृष्टीने भोंग्यांचा विषय उपस्थित केला गेला असेल, पण त्यासंबंधीचे भोंगे वाजविण्यापेक्षा जनसामान्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांकडे यंत्रणांचे लक्ष वेधण्यासाठी भोंगे का वाजविले जाऊ नयेत? काँग्रेसने समयसूचकता दाखवीत तेच केले म्हणायचे. त्यांनी महागाई वाढल्याबद्दल भोंगे वाजविले.

 

महत्त्वाचे म्हणजे सध्या उन्हाळा सुरू असून, यंदा जागतिक विक्रम नोंदविण्याइतके तापमान वाढलेले आहे. प्रथेप्रमाणे उन्हाळ्याच्याअगोदर सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांनी पाणी टंचाईचे आराखडे तयार करून लाखो रुपयांच्या निधीची तरतूदही करून ठेवली आहे; पण प्रत्यक्षात अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची बोंब होताना दिसत आहे. अकोला, बुलडाणा, वाशिमसारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी चार दिवसांआड पाणीपुरवठा होत असून, ग्रामीण भागात तर यापेक्षा वाईट स्थिती आहे. मनुष्याच्याच नव्हे तर गुराढोरांच्या व पशुपक्ष्यांच्या चारा पाण्याची व्यवस्थादेखील बिकट बनत चालली आहे. यावरील उपाय योजनाबाबत स्वस्थ असलेल्या लोकप्रतिनिधी व प्रशासनालाही जागे करण्यासाठी खरे तर भोंगे वाजविण्याची गरज आहे.

 

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून निर्णय प्रक्रिया लांबल्याने अकोला महापालिकेत लोकप्रतिनिधींची राजवट संपुष्टात आली असून, प्रशासनाचे राज्य सुरू आहे. बरे, निवडणुकाही लांबल्याने आता तर माजी झालेले नगरसेवकही नागरी समस्यांपासून तोंड लपवू पाहताना दिसत आहेत. मग आपल्या चालीने वा गतीने काम करू पाहणाऱ्या प्रशासनाच्या कानाशी भोंगे कोण वाजविणार? बाहेर उन्हाचा चटका बसतो म्हणून जिल्हा परिषदांमधील वातानुकूलित कक्षात बसून कारभार रेटणाऱ्या लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांना ग्रामीण भागात हंडाभर पाण्यासाठी होणारी दमछाक कशी दिसणार? असे इतरही अनेक विषय आहेत ज्याकडे तातडीने लक्ष पुरविणे गरजेचे आहे, पण आपले राजकारणी भलत्याच विषयात गुंतलेले दिसत आहेत.

 

सारांशात, राजकीय धबडग्यात क्षीण होत चाललेल्या माणुसकीचाच जागर गरजेचा आहे. गेल्या कोरोनाच्या संकटात पद, पैसा, प्रतिष्ठा, आदी सारे व्यर्थ ठरून माणुसकीच कामात आल्याचे प्रकर्षाने बघावयास मिळाले होते, या संकटातून नवा जन्म लाभलेल्यांनी भलत्या भोंग्यांच्या आवाजात आपल्या कानठळ्या बसू न देता माणुसकी व सर्वधर्मसमभाव जपणुकीचा भोंगा वाजविण्याची भूमिका घ्यायला हवी इतकेच यानिमित्ताने.