शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

हा ‘राष्ट्रधर्म’ नव्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 02:21 IST

मदरसा ही मुस्लीम धर्माचे मूलभूत शिक्षण देणारी व त्याच धर्माच्या ताब्यात असलेली शिक्षणसंस्था आहे. या मदरसांमधून काही वेळी अतिरेकी डोक्याची मुले बाहेर पडली हे नाकारता येत नाही.

मदरसा ही मुस्लीम धर्माचे मूलभूत शिक्षण देणारी व त्याच धर्माच्या ताब्यात असलेली शिक्षणसंस्था आहे. या मदरसांमधून काही वेळी अतिरेकी डोक्याची मुले बाहेर पडली हे नाकारता येत नाही. मात्र त्याचवेळी हिंदू धर्म व हिंदुत्वाचा संस्कार करणाºया संस्थांमधूनही असे माथेफिरू बाहेर पडले हेही कुणाला नाकारता येऊ नये. बहुतेक सारे धार्मिक हिंसाचार अशा संस्थांकडून अतिरेकी संस्कार घेऊन बाहेर पडलेल्यांनीच केले हे सत्यही दृष्टीआड करून चालणार नाही. मात्र त्यासाठी त्या संस्थांवर इतर धर्मांच्या शिक्षणाची सक्ती करणे, त्यात अन्य धर्माचे पाठ पढविणे वा त्या बंद करणे हा उपाय नव्हे. त्यातील शिक्षण व्यवहारावर लक्ष ठेवून त्या राष्टÑीय संस्कारासोबत व त्यातील सर्वधर्मसमभावासोबत राहण्याचा संस्कार मुलांवर घडवितील हे पाहणे हे सरकारचे काम आहे. हिमाचल प्रदेशात नव्याने सत्तारूढ झालेल्या सरकारजवळ याविषयीचे तारतम्यच नव्हे तर साधे शहाणपणही नाही. त्याने त्या राज्यातील या मदरशांमधून संस्कृत शिकविण्याचे धोरण आखले असून ते अमलात आणण्याचा फतवाही काढला आहे. एखाद्या अरब देशाने तेथील हिंदूंच्या शाळांमध्ये उर्दू, पुश्तू वा अरबी भाषा किंवा ‘कुराण-शरीफ’ शिकविले जावे असा आदेश काढण्यासारखा हा प्रकार आहे. काश्मिरातल्या सरकारलाही तसे करता येणे जमणारे आहे. मात्र तेथील सरकारची बुद्धी अजून एवढी चळली नाही. मदरशांमधून संस्कृत भाषा व त्या भाषेतील ग्रंथ वा पुस्तकांचे शिक्षण देण्याचा प्रकार हा अन्य धर्मीयांवर दुसºया धर्माचे संस्कार लादण्याचा प्रयत्न आहे व तो कमालीचा निंदनीय व निषेधार्ह आहे. देशात धार्मिक तेढ माजविण्याचे व समाजाला भडकावण्याचे प्रयत्न जोरात सुरू आहे. एका वर्गाला दुसºयाच्या विरोधात उभे करण्याचा व देशात दुही माजविण्याचा प्रयत्नही याच काळात होत आहे. ‘या देशात रहायचे असेल तर ....’ अशी धमकीवजा भाषा अल्पसंख्यकांना ऐकविण्यात केंद्रीय मंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत आणि भाजपाचे गावोगावचे पुढारीही आहेत. खरे तर या प्रकारांना आळा घालून या देशाचे सामाजिक ऐक्य कायम राहील हे पाहणे ही केंद्राची जबाबदारी आहे. मात्र सरकार या प्रश्नांकडे पाहून न पाहिल्यासारखे व प्रसंगी प्रोत्साहन दिल्यासारखेच दिसणारे आहे. उद्या एखाद्या शाळेने वा महाविद्यालयाने आपल्या विद्यार्थ्यांना बायबल, तोराह वा कुराणासारखे धर्मग्रंथ शिकविण्याचा आग्रह धरला तर देशातील बहुसंख्य समाजाला काय वाटेल. माणसे सर्वत्र सारखीच असतात. त्यांची मनेही तशीच जपावी लागतात. तुम्ही तुमच्या मार्गाने चालले पाहिजे, आमच्या धर्मांची पुस्तके (ती त्याच भाषेतील असल्याने) वाचली पाहिजेत, अमूकच पदार्थ खाल्ले पाहिजेत आणि आम्ही जे निषिद्ध ठरवू ते तुम्हीही निषिद्ध मानले पाहिजे असे म्हणणे ही बळजोरी आहे. ती अल्पसंख्याकांवर लादलेली असो वा बहुसंख्याकांवर. या बळजोरीविरुद्धच देशातील विचारवंतांएवढाच आता तरुणाईनेही आवाज उठविला आहे. सरकार तो ऐकणार नसेल तर या संतापाचा स्फोट कधीही व कसाही होऊ शकेल. धर्म ही प्रत्येकाची श्रद्धेची वा उपासनेची बाब आहे. ती ज्याला त्याला त्याच्या इच्छेनुसार अवलंबिता व अनुसरता आली पाहिेजे. ती लादणे हे सरकारचे काम नव्हे. हिमाचलचे सरकार असे काही करीत असेल तर त्याला केंद्राने अडविले पाहिजे. त्याविरुद्ध विरोधकांनीच नव्हे तर देशातील सर्व लोकशाहीवादी प्रणालींनी त्यांचा आवाज उठविला पाहिजे. भारत हा धर्मबहुल व संस्कृतीबहुल देश आहे. तसे असण्यातच त्याचे सारे बळ व सौंदर्य सामावले आहे. त्याला एकरंगी बनविण्याचा अट्टाहास या साºया सामर्थ्यांची वाट लावणारा व सौंदर्याची माती करणारा आहे. हिमाचलचे सरकार केंद्राचे ऐकणार नसेल तर किमान संघानेही राष्टÑधर्म म्हणून त्याला हे सांगण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. हिमाचलच्या सरकारचा आग्रह चालू देणे ही घटनाविरोधी बाब आहे. त्यामुळे ही देशाच्या एकात्मतेविरुद्धच नव्हे तर त्याच्या संवैधानिक चौकटीविरुद्धही जाणारी आहे.