शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
3
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
4
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
5
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
6
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
8
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
9
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
10
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
11
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
12
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
13
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
14
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
15
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
16
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
17
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
18
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
19
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
20
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल

...नको ते पुतना मावशीचे प्रेम; जनतेचा पुळका आणण्याचा उपद्व्याप थांबवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2020 18:45 IST

कोरोनाने थैमान घातले असताना लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते कुठे आहेत?

>> मिलिंद कुलकर्णी

कोरोनाच्या आपत्ती काळात जनता भयभीत, दहशतीत असताना राजकीय मंडळी मात्र राजकारणात मश्गुल आहेत. ६९ दिवसांच्या लॉकडाऊनमुळे सामान्य माणूस, नोकरदार, उद्योजक-व्यापारी-व्यावसायिक यांच्यापुढे अडचणींचा डोंगर आहे. मजुरांचे स्थलांतर हे फाळणीनंतरचे सर्वात मोठे स्थलांतर असल्याचे वर्णन केले जात आहे.

कोरोना या जागतिक आपत्तीचे आकलन, अंमलबजावणी, मदतकार्य याविषयी केंद्र व राज्य सरकार, सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यात वादंग सुरु झाला आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देशातील २१ राजकीय पक्षांची बैठक घेऊन केंद्र सरकारच्या भूमिकेवर टीकास्त्र सोडले. ‘स्पीक अप इंडिया’ या उपक्रमाच्या माध्यमातून काँग्रेसचे नेते कोरोना स्थितीचे गांभीर्य आणि मागण्या डिजिटल स्वरुपात केंद्र सरकारपुढे मांडत आहेत.

महाराष्ट्रात विरोधी पक्ष असलेल्या भाजपानेशिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीसरकारविरोधात ‘काळा दिवस’ पाळला. कोरोना काळात आंदोलन करु नका, आंदोलने नंतर करु असे आवाहन प्रत्येक राजकीय पक्ष करीत असला तरी बैठका, स्पीक अप इंडिया, काळा दिवस या स्वरुपात राजकारण केले जात आहे. विशेष म्हणजे, हे राजकारण नव्हे तर जनतेच्या प्रश्नांसाठी सरकारला जागे करण्याचा हा प्रयत्न असल्याची प्रत्येक राजकीय पक्षाची भूमिका असते. गंमत म्हणजे, जनतेच्या प्रश्नाची एवढी कळकळ असलेली राजकीय मंडळी आंदोलन देखील अंगणात रणांगण थाटून करतात तर काही घरात बसून व्हीडीओ काढून सरकारला प्रश्नांची जाणीव करुन देतात. जनतेचे प्रश्न जाणून घेण्यासाठी कोणीही घराबाहेर पडत नसल्याचे चित्र संपूर्ण देशात आहे.

कोरोनाने थैमान घातले असताना लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते कुठे आहेत? कोविड रुग्णालय, क्वारंटाईन कक्ष, प्रतिबंधात्मक क्षेत्र, निवारागृह या ठिकाणी येणाऱ्या अडचणी, समस्या सोडविण्यासाठी केवळ आणि केवळ प्रशासन धडपडत आहे. त्यात त्रुटी, कमतरता, निष्काळजीपणा, अकार्यक्षमता, वाद, हेवेदावे आहेत, नाही असे नाही. पण तरीही महसूल विभाग, आरोग्य विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस दल, शिक्षक, अंगणवाणी सेविका अहोरात्र झटून कोरोनाशी लढत देत आहे. ‘कोरोना योध्दा’ खरे ते आहेत. पण लोकांनी ज्यांना निवडून दिले, ते लोकप्रतिनिधी कोठे आहेत? अजिबात दर्शन नाही. अलिकडे विमानसेवा, रेल्वेसेवा बंद असल्याने मंत्रीगण वाहनाद्वारे प्रवास करीत आहे. कुणाला मराठवाड्यात तर कुणाला विदर्भात जायचे आहे, म्हणून रस्त्यातील खान्देशात थांबून आढावा बैठका, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्याचे उपचार पार पाडले जातात. याठिकाणी नेते, कार्यकर्ते आवर्जून दिसतात. एका पदाधिकाऱ्याने तर स्वपक्षीय पदाधिकाऱ्याविषयीच मंत्र्यांकडे तक्रार केली, की तुमच्यासारखे मंत्री, राज्यस्तरीय नेते आले तरी आम्हाला कल्पना दिली जात नाही. राजकारण याला म्हणतात. कोठे काय मागणी करावी, यालाही धरबंद राहिलेला नाही. एका फ्रंटल पदाधिकाºयाने नेत्याला फोन करुन विधान परिषदेसाठी आपल्या नावाचा विचार व्हावा, अशी मागणी केली. विद्यापीठातील प्रकारांविषयी गृहमंत्र्यांकडे तक्रार करण्यात आली. या राजकारणाला मंडळींकडे वेळ आहे, पण सामान्य रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय, उप जिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयात निम्मी पदे रिक्त आहेत, इमारतींची डागडुजी करण्याची आवश्यकता आहे, औषधीसाठा पुरेसा नाही, त्यासाठी आरोग्यमंत्र्यांकडे कोणी पाठपुरावा केल्याचे आढळून आले नाही.

कोरोनाकाळात अपवाद वगळता कोणी आरोग्यसेवेसाठी मदत उपलब्ध करुन दिल्याची उदाहरणे आहेत काय? स्वस्त धान्य दुकानांमधील धान्यावरुन केंद्र व राज्य सरकारमधील पक्ष आरोप-प्रत्यारोप करीत आहे, पण आपल्या वॉर्डात जे उपलब्ध धान्य आहे, त्याचे वाटप तरी व्यवस्थित होत आहे का, यासाठी किती नगरसेवक प्रयत्नशील आहेत. खरीप आढावा बैठकीचा उपचार कृषीमंत्र्यांनी उरकला. लिंकींगचा रोग तसाच आहे, त्याच्यापासून शेतकऱ्याची सुटका होत नाही. नव्या हंगामाची तयारी असताना कापसाची मोजणी संथगतीने सुरु आहे, तिचा वेग वाढविणे, अतिरिक्त केंद्र सुरु करणे या घोषणा केवळ कागदावर राहिल्या आहेत. जनतेचा पुळका आणण्याचा उपद्व्याप तरी थांबवा, असे सांगायची वेळ आली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस