शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

नितीशकुमारांचे ‘बंड’!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 12:35 AM

नितीशकुमारांच्या जनता दल (युनायटेड) या पक्षाने मोदींच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरुद्ध बंड पुकारण्याची भूमिका आपल्या दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनात घेतली आहे. आगामी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा बिहारमधील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून नितीशकुमारांना मान्यता द्या ही त्या पक्षाची मोदींकडे मागणी आहे

नितीशकुमारांच्या जनता दल (युनायटेड) या पक्षाने मोदींच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरुद्ध बंड पुकारण्याची भूमिका आपल्या दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनात घेतली आहे. आगामी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा बिहारमधील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून नितीशकुमारांना मान्यता द्या ही त्या पक्षाची मोदींकडे मागणी आहे. सध्याही तेच बिहारचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांना रालोआचा पाठिंबा आहे. हीच स्थिती त्या पक्षाला यापुढेही कायम राहायला हवी आहे. अशी मागणी मोदींचा भाजप किंवा रालोआ निवडणुकीपूर्वी मान्य करील अशी त्यांची मानसिकता नाही. भाजपची भूमिका आरंभी सहकार्याची राहिली तरी पुढे ती आक्रमकच नव्हे तर सर्वंकष होते. आपली गरज म्हणून त्या पक्षाने आज नितीशकुमारांचे मुख्यमंत्रिपद स्वीकारले असले तरी त्याला त्या राज्यात स्वत:ची सत्ता आणायची आहे. भाजप हा पक्ष तसाही नितीशकुमारांचे पद वा मुख्यमंत्रिपद राखायला त्याचे राजकारण करीत नाही. त्याचे बिहारमधील नेते व उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी हे स्वत:च मुख्यमंत्रिपदाची बाशिंगे बांधून आहेत व त्यांचे तसे असणे हे गैरही नाही. नितीशकुमारांच्या पक्षाला मात्र बिहारमध्ये व देशातही त्यांच्या नेतृत्वावाचून तारून नेणारी दुसरी कोणतीही शक्ती नाही. त्यामुळे आपला भविष्यकाळ सुरक्षित करण्यासाठी त्याने आपली मागणी अगोदरच पुढे रेटली आहे. नितीशकुमारांनी लालूप्रसाद यादवांचा राष्ट्रीय जनता दल व काँग्रेस यांच्या मदतीने बिहारची निवडणूक जिंकली. मात्र पुढे त्या दोन्ही पक्षांचा विश्वासघात करून भाजपसोबत आताचे आपले सरकार बनविले. परिणामी त्यांना भाजपेतर पक्षात मान नाही व स्थानही नाही. त्यामुळे भाजपचा विश्वास राखणे व आपल्या मागण्या वाढवीत नेणे हे महाराष्ट्रातील शिवसेनेचे राजकारण करण्याचा मार्ग त्यांनी आता अनुसरला आहे. त्याचसाठी राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड व मणिपूर या चार राज्यात होऊ घातलेल्या विधानसभांच्या निवडणुकीत भाजपसोबत न राहता त्यातील अनेक जागांवर आपले उमेदवार उभे करण्याचा निर्णयही त्यांनी जाहीर केला आहे. आपल्या मागणीचा दबाव वाढविण्याचाच त्यांचा हा पवित्रा आहे. भाजपने त्याबद्दल आपली प्रतिक्रिया अजून व्यक्त केली नसली तरी ते याला भीक घालील असे त्याने काश्मिरातील मेहबुबा मुफ्ती सरकारबाबत घेतलेल्या भूमिकेवरून वाटत नाही. तसे तो वागला तर मात्र नितीशकुमारांच्या व त्यांच्या पक्षाच्या वाट्याला एक राजकीय निर्वासितपण येणार आहे. भाजप त्यांना जवळ करणार नाहीत आणि भाजपेतर त्यांना सोबत घेणार नाहीत. एका अर्थाने नितीशकुमारांनी ओढवून घेतलेले हे दुर्दैवी प्राक्तन आहे. दोन वर्षांपूर्वीपर्यंत त्यांच्याकडे मोदीचा पर्याय म्हणून देश पाहू लागला होता. त्यांनी लालूप्रसादांच्या मदतीने बिहार हे राज्य जिंकले तेव्हाची त्यांची प्रतिमा राष्ट्रीय होती. आता ती नुसती प्रादेशिकच नाही तर अर्धप्रादेशिक बनली आहे. ती फुगवून मोठी करण्याचे त्यांचे आत्ताचे राजकारण त्यांना मोठे करण्याऐवजी मोडित काढणारेच अधिक आहे. एकेकाळचा हा समाजवादी नेता भाजपच्या आहारी गेला असेल आणि आता तो त्याच्याशीही राजकारण करीत असेल तर त्याचा विश्वास कुणाला वाटेल? राजकारण हा केवढ्याही व कशाही तडजोडींचा खेळ असला तरी त्यालाही जनतेच्या विश्वासाची गरज आहे. नितीशकुमारांनी अल्पावधीत एवढ्या कोलांटउड्या घेतल्या आहेत की त्यांना हा विश्वास प्राप्त होणे आता अवघडही ठरणार आहे.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBiharबिहारBJPभाजपा