शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

निर्भया न्याय दिन! अखेर न्याय झाला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 6:09 AM

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणि राष्ट्रपतींनी दयेचा अखेरचा अर्ज फेटाळून लावला असतानाही आरोपींनी केलेल्या याचिकांवर सुनावणी होत राहिली. आठ वर्षांनी या प्रकरणाचा निकाल लागणे, हा न्याय उशिरा देण्यातील प्रकार आहे.

निर्भयाच्या मारेकऱ्यांना अखेर शुक्रवारी पहाटे फासावर लटकविण्यात आले. हा ख-या अर्थाने ‘निर्भया न्याय दिन’ ठरला आहे. निर्भयावर १६ डिसेंबर २०१२ च्या रात्री बसमध्ये सहा नराधमांनी सामुदायिक बलात्कार केला. तिला चालत्या बसमधून फेकून देण्यात आले. त्यानंतर सिंगापूर येथे सुरू असलेल्या १३ दिवसांच्या उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. निर्भयाचे आई-वडील सलग आठ वर्षे या खटल्यातील चारही आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी संघर्ष करीत होते. निर्भयावर ज्या पद्धतीने अत्याचार करण्यात आले, त्या घटनेनंतर देशभर संतापाची लाट उसळली होती. गुन्हेगारांना तातडीने फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी देशभर करण्यात येत होती. त्यासाठी सत्र न्यायालय, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात खटला चालला. सर्वच स्तरांवरील न्यायालयांनी चारही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली.अखेरचा प्रयत्न म्हणून आरोपींनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे दयेचा अर्ज केला. तोदेखील फेटाळून लावण्यात आला; तरीदेखील पतियाला हाउस सत्र न्यायालय ते सर्वोच्च न्यायालयात विविध प्रकारच्या याचिका दाखल करून आरोपी फाशीची शिक्षा टाळण्याचा प्रयत्न करीत होते. त्यावरही जनतेतून संताप व्यक्त होत होता. दुर्दैवाची बाब म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणि राष्ट्रपतींनी दयेचा अखेरचा अर्ज फेटाळून लावला असतानाही आरोपींनी केलेल्या याचिकांवर सुनावणी होत राहिली. देशाच्या राजधानीत घडलेल्या या संतापजनक प्रकारानंतर आठ वर्षांनी निकाल लागणे, हा न्याय उशिरा देण्यातील प्रकार आहे. खटल्यातील कोणते ना कोणते कच्चे दुवे शोधून फाशीची शिक्षा टाळण्याचा प्रयत्न आरोपींकडून होईल; अशीच जनभावना होती, हे धक्कादायक आहे. न्याय व्यवस्थेवरील विश्वासास नख लागण्याचा प्रकार होता.सत्र न्यायालयाने अखेर चौथ्यांदा डेथ वॉरंट जारी केल्यानंतर गुरुवारी अखेरचा प्रयत्न म्हणून चारपैकी मुकेश हा आरोपी घटना घडली तेव्हा राजस्थानात होतो; शिवाय आपण त्या वेळी अल्पवयीन होतो, असा दावा करून शिक्षा टाळण्याचा प्रयत्न करीत होता. घटनेतील आरोपी, त्यांचे साक्षी-पुरावे, सर्व काही तपासून झाले असताना फाशी देण्याची वेळ काही तासांवर आल्यावर असे मुद्दे कसे उपस्थित होतात? त्यावर सुनावणी तरी कशी होते? हे सर्वसामान्य जनतेच्या मनात उत्पन्न होणारे प्रश्न विचार करायला लावणारे आहेत. पहाटे फाशीची शिक्षा देण्यात येणार आहे, असे सांगितल्यावर आरोपींनी अखेरचा प्रयत्न म्हणून मध्यरात्री याचिका दाखल केली. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीही केली आणि पहाटे ३ वाजून ३२ मिनिटांनी म्हणजे फाशी देण्यास केवळ दोन तासांचा अवधी राहिला असताना याचिका फेटाळण्यात आली. अशावेळी त्या निर्भयासाठी लढणाºया आई-वडील तसेच नातेवाईक आदींच्या मनाची काय घालमेल झाली असेल, याचा तरी मानवतेच्या स्तरावर विचार व्हायला हवा. फाशी दिल्यावर निर्भयाच्या वडिलांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया खूप महत्त्वाची आहे. ते म्हणतात, आजचा दिवस हा ‘निर्भया न्याय दिन’ आहे. भारतीय संस्कृती महान असल्याच्या गप्पा मारणाऱ्यांनी आपल्या समाजाची मानसिकता बदलण्यासाठी, सांस्कृतिक बदलांसाठी प्रयत्न करायला हवे आहेत. निर्भयाच्या मृत्यूनंतर जो संताप व्यक्त करण्यात आला त्याने देश हादरून गेला; मात्र, न्यायदानाची प्रक्रिया संथपणेच चालत राहिली.देशात त्यानंतरही हजारो अत्याचाराच्या घटना घडत गेल्या. त्यातील असंख्य गुन्हेगार उजळमाथ्याने फिरत आहेत. अनेक खटले विविध पातळीवरील न्यायालयांमध्ये पडून आहेत. बालिका आणि महिलांवरील अत्याचारांचे प्रकार काही थांबलेले नाहीत. न्यायव्यवस्था गतिमान आहे असे वातावरण भारतात नाही. निर्भया अत्याचारासारखेच क्रूर प्रकार अनेक घडले आहेत. त्याची चर्चा प्रसारमाध्यमांत कमी झाली आहे. पण त्यांच्या नातेवाइकांना संरक्षण कमी मिळाले असेल आणि कायदेशीर साहाय्यताही कमी मिळाली असेल. त्यामुळे ‘निर्भया न्याय दिन’ सर्व बळी पडलेल्या महिलांच्या जीवनात यायचा असेल तर आपल्या समाजात बदलासाठी खूप प्रयत्न करायला हवे आहेत.

टॅग्स :Nirbhaya Gang-rapeनिर्भया गॅंगरेपdelhiदिल्ली