शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

पुढच्या पिढीसाठी हे कराच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 00:14 IST

पुढच्या पिढीला सुखात पहायचे असेल तर त्यांच्यासाठी पैशाच्या गुंतवणुकीपेक्षाही शुद्ध हवा आणि शुद्ध पाणी मिळण्यासाठी आजच्या पिढीने योग्य गुंतवणूक करणे गरजेचे आहे.

- मनोज ताजनेयावर्षी पावसाच्या कमतरतेमुळे देशभरातील जलाशयांमध्ये पाणीसाठा कमी आहे. त्यात विदर्भ वगळता उर्वरित महाराष्टÑात गेल्यावर्षीपेक्षा पाणीसाठ्याची स्थिती चांगली असली तरीही पाणीटंचाई नाही असा एकही जिल्हा राज्यात नाही. विदर्भात आणि त्यातही पश्चिम विदर्भात यावर्षी पाण्याचे दुर्भिक्ष्य अधिकच तीव्र आहे. पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे ही स्थिती उद्भवल्याचे म्हटले जात आहे, मात्र ते पूर्णसत्य नाही. देश-विदेशात अनेक ठिकाणी आपल्या भागात पडणाऱ्या पावसाच्या निम्माही पाऊस पडत नसताना त्यांच्यावर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ येत नाही. योग्य नियोजनातून पिण्यासाठीच नाही तर शेतीसाठीही पाणी पुरवून भरमसाठ पीक घेणाºया इस्रायलसारख्या देशाचे उदाहरण यासाठी देता येईल. इस्रायल किंवा इतर देशांना हे जमते तर आपल्याला का नाही? या प्रश्नाची उकल करणे सरकारच्या धोरणाचा भाग आहे, पण एक सामान्य नागरिक म्हणून आपण यात काय योगदान देऊ शकतो याचा विचार प्रत्येकाला करावा लागणार आहे. आज पाऊस कमी पडला काय किंवा जास्त पडला काय, आपल्याला फारसा फरक पडणार नाही. उन्हाळ्याचे दोन महिने थोडा त्रास होईल, तो आपण सहनही करू. पण आता उन्हाळ्याचे दोन-तीन महिने होणारा त्रास पुढे आपल्या मुला-बाळांना वर्षभरासाठी सहन करावा लागला तर त्यावेळचे चित्र काय असेल, याची आपण कल्पनाही करू शकत नाही.ज्यांच्या सुखासाठी, चांगल्या भविष्यासाठी आपण आज स्वत:ला झिजवून पै-पै साठवतो, त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी तडफडावे लागले तर त्यांच्याकडे असलेला पैसा, संपत्ती हे सर्व निरर्थक ठरणार आहे. त्यामुळे आपल्या पुढच्या पिढीला सुखात पहायचे असेल तर त्यांच्यासाठी पैशाच्या गुंतवणुकीपेक्षाही शुद्ध हवा आणि शुद्ध पाणी मिळण्यासाठी आजच्या पिढीने योग्य गुंतवणूक करणे गरजेचे आहे. त्यासाठी किमान आपण घराच्या परिसरात, गावात, शहरात मिळेल त्या जागेवर झाडं लावून ती जगवणे गरजेचे आहे. दिवसागणिक वाढणाºया प्रदूषणातून वाचण्यासाठी झाडातून शुद्ध आॅक्सिजन मिळेल. एवढेच नाही तर पावसाचे पडणारे पाणी जमिनीत मुरवण्याचे काम झाडं करतात. त्यातून जमिनीतील पाण्याची पातळी कायम राहते. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार तीन वर्षांपासून दरवर्षी विविध विभागांना विक्रमी झाडे लावण्याचे टार्गेट देत आहेत. त्यांचा हेतू खूप दूरदर्शी असला तरी सर्व यंत्रणा हे काम ‘सरकारी’ पद्धतीने करत आहे. त्यामुळे झाडे किती लावली आणि त्यातील किती जगली याचा हिशेब जुळत नाही.पूर्वी काही मोठ्या शहरांमध्येच दिसणारे सिमेंटचे रस्ते आता २५ घरांच्या छोट्या गावातही तयार होत आहेत. मातीची घरे लुप्त होऊ झोपडीची जागा सिमेंटच्या घराने व्यापत आहे. पाणी जमिनीत मुरण्याऐवजी नाल्यांमधून वाहून जात आहे. हे वाहून जाणारे पाणी ठिकठिकाणी अडवून जमिनीत जिरवणे गरजेचे आहे. पण माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईकांच्या ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ संकल्पनेचा सर्वांनाच विसर पडला आहे. गडचिरोलीसारख्या जिल्ह्यात जिथे चार-पाच मोठ्या नद्या वाहात असतानाही वनकायद्यामुळे धरण होऊ शकत नाही तिथे नद्यांवर मोठे, छोटे बंधारे बांधून शेतकºयांसाठी बारमाही सिंचनाची व्यवस्था होऊ शकते. पण आजपर्यंत ते झाले नाही, त्यामुळेच या जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक राज्यात शेवटून दुसरा आहे. राज्य शासन काही वर्षांपासून जलयुक्त शिवार अभियान राबवत आहे. दोन वर्षे हे अभियान जोमात चालले, पण आता त्याकडेही काहीसे दुर्लक्ष होत आहे. भरमसाठ कामे हाती घेण्यापेक्षा मोजकीच कामे घेऊन ती तडीस नेली तर काही उपयोग होईल. 

टॅग्स :Waterपाणीwater scarcityपाणी टंचाईMaharashtraमहाराष्ट्र