शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Policy: कर्जदारांना खूशखबर, हप्ता कमी होणार; दरकपात का होणार?
2
Philippines Protest 2025: फिलिपिन्समध्ये लोक रस्त्यावर; भ्रष्टाचाराविरोधात देशभरात आंदोलन पेटले
3
आजचे राशीभविष्य, १ डिसेंबर २०२५: भविष्यासाठी आर्थिक नियोजन करण्यास आजचा दिवस अनुकूल
4
Local Body Elections: नगरांच्या निवडणुकांमध्ये 'दुसरा' टप्पा, काही ठिकाणी २० डिसेंबरला मतदान
5
अग्रलेख : शेवटी मरण कार्यकर्त्यांचेच! अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार?
6
फोनमध्ये सिम नसल्यास अॅप्स वापरता येणार नाहीत; दर सहा तासांनी व्हॉट्सअॅप वेब थेट लॉगआउट होणार!
7
नगर परिषद, नगर पंचायत निवडणूक २०२५:  रात्री दहापर्यंत पडणार आश्वासनांचा 'पाऊस'!
8
विशेष लेख: इम्रान खान जिवंत आहेत की नाहीत?
9
Vande Bharat Depot: पुण्यासह राज्यात तीन ठिकाणी वंदे भारत 'कोचिंग डेपो' वाढविणार
10
मध्य रेल्वेवर लवकरच २० प्लॅटफॉर्म वाढणार, कोकणसाठी अतिरिक्त मेल, एक्स्प्रेस चालवणे शक्य
11
IND vs SA 1st ODI : टॉस गमावला, पण मॅच जिंकली! कसोटीतील बिघाडीनंतर टीम इंडियाची वनडे मालिकेत आघाडी
12
हाताला सलाइन, नाकाला ऑक्सिजन पाइप; छगन भुजबळांचा रुग्णालयातून प्रचार, भावनिक होत म्हणाले...
13
“कितीही करा कल्ला, मालवण शिवसेनेचाच बालेकिल्ला”: एकनाथ शिंदे; निलेश राणेंचेही केले कौतुक
14
“मुंबईत ठाकरेंचे काही चालणार नाही, उद्धव यांनी राज यांना सोबत घेऊन चूक केली”; कुणाचा दावा?
15
“नवरा १००₹ देत नव्हता, पण देवाभाऊ लाडक्या बहिणींना १५०० देतात”; भाजपा नेत्यांचे विधान चर्चेत
16
SIR तपासात गडबड उघड! गोव्यात ९० हजार मतदारांवरील मोठी विसंगती आली समोर; अधिकारी म्हणाले...
17
०१ डिसेंबरला रेल्वे नियम बदलणार! तत्काळ तिकिटासाठी लागणार OTP; मुंबईतील ‘या’ ट्रेनपासून सुरू
18
IND vs SA 1st ODI : कुलदीपनं ३ चेंडूत फिरवली मॅच! एकाच ओव्हरमध्ये २ विकेट्स अन्...
19
VIDEO : "समझने वालों को इशारा काफी!" विराटला गंभीरची मिठी; पण रोहितची रिअ‍ॅक्शनच ठरली 'शोस्टॉपर'
20
दिल्लीतील पराभवानंतर अवध ओझा सरांचा राजकारणाला रामराम; AAP मधून बाहेर पडले...
Daily Top 2Weekly Top 5

यापुढील लढा संविधानयुक्त भारतासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2016 02:44 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीला वेगळा संदर्भ व अर्थ आहे. सध्या संघाच्या नेतृत्वाखालील भाजपाकडे देशाची धुरा आहे. त्यामुळे संघ परिवारालाही बळ मिळाले आहे. अशा स्थितीत

- अर्जुन डांगळेडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीला वेगळा संदर्भ व अर्थ आहे. सध्या संघाच्या नेतृत्वाखालील भाजपाकडे देशाची धुरा आहे. त्यामुळे संघ परिवारालाही बळ मिळाले आहे. अशा स्थितीत भारतीय संविधानाची मूल्ये रुजविण्याची, जोपासण्याची जबाबदारी या देशातील वंचित, कष्टकऱ्यांसाठी लढणाऱ्यांच्या खांद्यावर आली आहे. भाजपाकडून बाबासाहेबांच्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्मारकांच्या घोषणा होत आहेत. मात्र, सामाजिक परिवर्तनाचा विचार रुजविण्यासाठी केंद्र शासन पावले उचलताना दिसत नाही. डॉ. आंबेडकर विशिष्ट समाजाची मक्तेदारी नाही. त्यांचा लढा देशाच्या विकासासाठी होता. वंचित, कष्टकऱ्यांना माणूसपणाचे हक्क मिळवून देण्यासाठी होता. महिलांना बाळंतपणाची तीन महिन्यांची रजा, कर्मचाऱ्यांना आठ तास ड्युटी, एम्प्लॉयमेंट एक्स्चेंज या बाबी त्यांच्या संकल्पनेतून आल्या. नद्याजोडणी प्रकल्पाची संकल्पनाही त्यांची होती. शेती, सिंचन, वीज, अर्थकारण या सर्व विषयांवर त्यांनी विपुल विचार मांडले. अशा द्रष्ट्या नेत्याचे तत्कालीन नतद्रष्ट सरकारने न ऐकल्याने देशासमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.पँथरने झंजावात निर्माण केला होता. पण पँथरला कोणीच स्वाभाविकपणे वाढू दिले नाही. आजचे रिपब्लिकन पक्षही आपल्या कलेने चालावेत, असा सर्वच पक्षांचा प्रयत्न असतो. त्याला काही बळी पडतात. आंबेडकरी चळवळ गटातटांत विभागली आहे. ऐक्य होत नाही, टिकत नाही, तरुणांचा पुढाऱ्यांवर विश्वास नाही आणि कुठल्याही गटाची स्वतंत्रपणे लढण्याची ताकद नाही. त्यामुळै रिपब्लिकन पक्षाचा एकजातीय पाया नष्ट करणे आवश्यक आहे. ‘सबका साथ सबका विकास’ हा नारा देत भाजपाने देशाची सत्ता मिळविली. भाजपाच्या प्रचारात समान नागरी कायदा, गोवंश हत्याबंदी, राम मंदिर, ३७० वे कलम, हिंदू राष्ट्र, वंदे मातरम् हे मुद्दे नव्हते. मात्र आता ते असे मुद्दे उकरून काढत देशाला सरंजामी मनोवृत्तीकडे घेऊन जाऊ पाहत आहेत. अनिष्ट प्रथा-परंपरांविरुद्ध सध्याच्या सुरू असलेल्या लढ्याबाबत संघाची चुप्पी दिसत आहे. क्रांतीचे चाक वेगाने फिरत असते. त्याच वेळी प्रतिक्रांतीही गतिमान होते. हा संघर्ष सतत चालू आहे. आज तो नव्या स्वरूपात सुरू झाला आहे. कोण देशभक्त आणि कोण देशद्रोही, हे ठरविणारे तुम्ही कोण? बाबासाहेब एकेकाळी गांधींना म्हणाले होते, ‘आय हॅव नो मदरलँड’. असे म्हणण्याची वेळ आज तुम्ही आमच्यावर येऊ देऊ नका. यातून केवळ असुरक्षितताच जन्म घेईल. या असुरक्षिततेतून तुम्हाला सत्ता मिळेलही, पण ती सत्ता अराजकता आणि यादवीच्या दिशेने घेऊन जाणारी असेल. रिपब्लिकन जनशक्ती संघटनेच्या माध्यमातून हाच प्रयत्न सुरू आहे. आंबेडकरी पक्षांच्या राजकारणाची कोंडी फोडण्याचे काम तरुणच करू शकतात. यातूनच समविचारी व्यक्ती, संघटनांना घेऊन सर्वसमावेशक भूमिका असणारी नवीन ताकद निर्माण होईल.